शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यासाठी शिंदे मुख्यमंत्री, आमच्यासाठी फडणवीसच सर्वस्व; गणेश नाईकांचे ठाण्यात सूचक वक्तव्य
2
पाकिस्तान, पाकिस्तानसारखा खेळला! विजयासाठी आयर्लंडसमोर टाकाव्या लागल्या धापा
3
सीईटीची साईट क्रॅश, प्रचंड मनस्ताप; नागपूरचे साैम्या दीक्षित व पार्थ असाटी यांना १०० टक्के
4
पाकिस्तानची विझण्यापूर्वीची फडफड! गोलंदाजांना सूर गवसला, पण क्षेत्ररक्षणात गचाळपणा दिसला 
5
काँग्रेसला इतक्या जागा कशा मिळाल्या? चौकशी व्हावी, राहुल गांधींवर रामदास आठवलेंचा पलटवार
6
'...अन्यथा मी राजकारण सोडेन', वायभासे कुटुंबियांचे सांत्वन करताना पंकजा मुंडेंना अश्रू अनावर
7
लोकसभेत बालेकिल्ले राखले, आता विधानसभेच्या तयारीला लागा; CM शिंदेंचे शिवसैनिकांना निर्देश
8
“NDA सरकार कोसळून इंडिया आघाडीचे सरकार येईल, प्रणिती शिंदे मंत्री होतील”; काँग्रेसचा दावा
9
वायकरांच्या मुलीकडेही मोबाईल, तक्रार आमची, मध्येच तहसीलदार कुठून आले; उमेदवार शाह यांचा गौप्यस्फोट
10
निखळ सौंदर्य.. निरागस हास्य.. पिवळ्या फ्लोरल फ्रॉकमध्ये आलिया भटचा 'क्यूट' लूक (Photos)
11
गौतम गंभीरच्या मागण्या BCCI कडून मान्य, लवकरच टीम इंडियाचा प्रशिक्षक म्हणून होणार घोषणा 
12
EVM अनलॉक करण्यासाठी ओटीपी लागतो? वायकर प्रकरणात निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा
13
इलॉन मस्क यांच्या EVM वरील विधानाला आदित्य ठाकरेंचे समर्थन; म्हणाले, “काहीही होऊ शकते”
14
पुन्हा पावसाने मारली दांडी! राज्यात विदर्भात पावसाची प्रतीक्षा, इतर जिल्ह्यातही जोर कमी झाला
15
Rohit Sharma Shubman Gill Story: ऑल इज् वेल!! रोहित शर्माशी वादाच्या चर्चांदरम्यान शुबमन गिलच्या स्टोरीने साऱ्यांची 'बोलती बंद'
16
आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
17
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर
18
इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले
19
शाकिब अल हसनने भारताच्या वीरेंद्र सेहवागचा अपमान केलाच नाही; पाहा त्या घटनेचा पूर्ण Video 
20
तुम्ही प्रत्येकवेळी खेळाडूंना दोषी धरू शकत नाही, त्यांनी प्रयत्न केले...! माजी खेळाडूचा अजब दावा

कंपनीचं २०२० मधील पत्र समोर आलं, प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळेच हे घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 02, 2022 5:23 PM

पूल दुर्घटनेप्रकरणी पोलिसांनी जबाबदार असणाऱ्या ९ जणांना अटक केली आहे.

गुजरातमधील मोरबी येथे मच्छू नदीवरील पूल कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. दुर्घटनेत १४१ हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर १७७ जणांना वाचवण्यात आले असून जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या पुलावर दुर्घटनेच्यावेळी ५०० हून अधिक होते, ते सर्वचजण नदीच्या पात्रात पडले होते. या पुलाच्या दुरुस्तीचं कॉन्ट्रॅक्ट ओरेवा कंपनीला देण्यात आलं होतं. पण, आता या कंपनीच्या कार्यपद्धतीवर अनेक प्रश्न उपस्थित केले गेले आहेत. विशेष म्हणजे २ वर्षांपूर्वीच या घटनेची स्क्रीप्ट लिहिण्यात आली होती, पण बेजबाबदार अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षितपणामुळे मोठी दुर्दैवी घटना घडली. 

पूल दुर्घटनेप्रकरणी पोलिसांनी जबाबदार असणाऱ्या ९ जणांना अटक केली आहे. ओरेवा कंपनीचा मॅनेजर दीपक पारेखला (Deepak Parekh) अटक झाली. या ओरेवा कंपनीचे जानेवारी २०२० मधील एक लेटर समोर आले आहे. मोरबी जिल्हाधिकारी यांना हे पत्र लिहिण्यात आले होते. त्यामध्ये, पूल दुरुस्तीसाठी खोलण्यात यावा, तो दुरूस्त करण्यात येईल, असे लिहिले होते. मात्र, या पत्रावर अधिकाऱ्यांकडून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही, त्यामुळेच ही दुर्घटना घडल्याचं सांगितलं जात आहे. 

या पत्रानुसार पुलाचा ठेका दिलेल्या कंपनीत आणि प्रशासनात मोठा वाद सुरू होता. ओरेवा ग्रुपकडून पुलाच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठी कायमचे कामकाज मागण्यात येत होते. मात्र, जोपर्यंत स्थायी कंत्राट दिले जात नाही, तोपर्यंत कंपनीला अस्थायी कामकाज करावे लागणार आहे. मात्र, यामध्ये पुलाच्या दुरुस्तीसाठी ओरेवा कंपनी सामनाची ऑर्डर देणार नाही. तसेच, मागणी पूर्ण झाल्यानंतरच काम सुरू करेल. अखेर निष्काळजीपणानंतर ओरेवा ग्रुपला स्थायी म्हणजे कायमचं कंत्राट देण्यात आलं. २०२० मध्ये जारी केलेल्या या पत्रानुसार १५ वर्षांसाठी कंपनीला पुलाच्या देखभाल आणि दुरुस्तीचं काम देण्यात आलं होतं. विशेष म्हणजे मार्च २०२२ मध्ये मोरबी नगर निगम आणि अजंता ओरेवा कंपनीत करारावर हस्ताक्षर झाले. त्यानुसार,  हे काम २०३७ पर्यंत कंपनीकडे देण्यात आले होते. 

दरम्यान, मोरबी नगर पालिकेचे अधिकारी संदीप सिंह यांनी म्हटले की, ओरेवा कंपनीने नियम व अटींचे उल्लंघन केले आहे. नगरपालिकेला कुठलीही पूर्वसूचना न देता, कंपनीने ५ महिन्यांतच पुल खोलला होता. विशेष म्हणजे पुलासंदर्भात नगरपालिका प्रशासनाने कुठलेही प्रमाणपत्र जारी केले नव्हते. 

स्मशानभूमीत रांग, 

भीषण पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा हा मोठा असल्याने शहरातल्या स्मशानांमध्ये लांबच लांब रांगा लागल्या आहेत. अंत्यसंस्कारांसाठी खूप वाट पाहण्याची वेळ नातेवाईकांवर आली आहे. शहरातील चार कब्रस्तान आणि सातही स्मशानांत असंच चित्र पाहायला मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी सापडलेल्या मृतदेहांचं शवविच्छेदन करून ते कुटुंबीयांकडे सोपवले. त्यानंतर स्मशानभूमीत अंत्यसंस्कारांसाठी गर्दी झाली होती. शहरातल्या 4 कब्रस्तानमध्ये कबर खोदण्यासाठी वेळ लागत आहे. 

आत्तापर्यंत ९ जणांना अटक

पूल दुर्घटनेप्रकरणी पोलिसांनी जबाबदार असणाऱ्या ९ जणांना अटक केली आहे. ओरेवा कंपनीचा मॅनेजर दीपक पारेखला (Deepak Parekh) अटक झाली. कोर्टासमोर त्याने आता एक अजब आणि संतापजनक विधान केलं आहे. "देवाची इच्छा होती म्हणून ही दुर्दैवी घटना घडली" असं दीपक पारेख याने म्हटलं आहे. "कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकांपासून ते खालच्या स्तरावरील कर्मचार्‍यांपर्यंत सर्वांनी मेहनत घेतली. पण अशी दुर्दैवी घटना घडली हीच देवाची इच्छा होती" असं त्याने म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Morbi Bridge Collapseमोरबी पूलAccidentअपघातcollectorजिल्हाधिकारीGujaratगुजरात