शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
2
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : मतदानानंतर सुप्रिया सुळे थेट अजित पवारांच्या घरी दाखल
3
Baramati Lok Sabha Election 2024 : 'ही चिडचिड खूप काही सांगून जाते...', रोहित पवारांनी दत्तात्रय भरणेंचा व्हिडीओ केला शेअर, म्हणाले...
4
"भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप
5
महाराष्ट्राची लढाई बारामतीत होते की काय? संजय राऊतांची मोदी-शाह यांच्यावर टीका
6
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
7
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
8
"वडील गेल्यापासून आई गेली १२ वर्ष...", विलासराव देशमुखांच्या आठवणीत रितेश देशमुख भावुक
9
अक्षय्य तृतीया: ‘ही’ कामे अवश्य करा, सुख-समृद्धी मिळवा; लक्ष्मीकृपेने भरभराट, धनलाभ योग!
10
"इंग्रजांनी उभारलेल्या व्यवस्थेला गंज लागलाय..," UPSCचा उल्लेख करत माजी RBI गव्हर्नरांनी उपस्थित केला प्रश्न
11
लेकीसाठी शरद पवार बनले बारामतीचे मतदार; मुंबईच्या मतदार यादीतून नाव काढलं
12
अजबच! गणितात २०० पैकी २१२, तर भाषेमध्ये २११ गुण, मुलीचं प्रगती पुस्तक होतंय व्हायरल  
13
'मेरी माँ मेरे साथ है'... मतदानादिवशीच आईला सोबत आणलं, अजित पवारांचं श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर
14
Video - हृदयस्पर्शी! वडिलांच्या मृत्यूनंतर सोडून गेली आई; 10 वर्षांचा मुलगा चालवतोय घर
15
१०० वर्षांनी वृषभेत चतुर्ग्रही योग: ५ राशींना वरदान काळ, बंपर फायदा; सुवर्ण संधी, अपार लाभ!
16
खलिस्तानी संघटनांकडून AAP ला १३० कोटी फंडिंग?; NIA चौकशीची शिफारस, अडचणी वाढणार?
17
बाळासाहेबांच्या शिवसेनेला नकली म्हणणे, शरद पवारांसाठी मडके फोडणे महाराष्ट्राला आवडलेले नाही - रमेश चेन्निथला
18
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL च्या शेअरमध्ये तेजी, HCL टेक घसरला
19
Ananya Birla : आता वडिलांचा व्यवसाय सांभाळण्याची तयारी, संगीतातून ब्रेक; अनन्या बिर्लाची भावूक पोस्ट
20
Bigg boss marathi 3 फेम अभिनेत्यासोबत स्पॉट झाली गौतमी; सोशल मीडियावर चर्चेला उधाण

खीर भवानी मंदिरातील जलकुंडाचा रंग बदलला, काश्मिरी पंडित म्हणाले, ही तर मोठ्या संकटाची चाहूल!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2022 9:05 PM

Kheer Bhawani Mandir: मध्य काश्मीरमधील गांदरबल जिल्ह्यामध्ये तुलमुला परिसरात असलेल्या माता खीर भवानीच्या जलकुंडाचा रंग गेल्या काही दिवसांमध्ये बदलला आहे. हा रंग लाल होताना दिसत आहे. स्थानिक काश्मिरी पंडितांनी दिलेल्या माहितीनुसार मंदिरातील जलकुंडातील पाण्याचा बदललेला रंग हा संभाव्य संकटाचा इशारा आहे.

श्रीनगर - मध्य काश्मीरमधील गांदरबल जिल्ह्यामध्ये तुलमुला परिसरात असलेल्या माता खीर भवानीच्या जलकुंडाचा रंग गेल्या काही दिवसांमध्ये बदलला आहे. हा रंग लाल होताना दिसत आहे. स्थानिक काश्मिरी पंडितांनी दिलेल्या माहितीनुसार मंदिरातील जलकुंडातील पाण्याचा बदललेला रंग हा संभाव्य संकटाचा इशारा आहे. ज्या काश्मिरी पंडितांचं माता खीर भवानी हे कुलदैवत आहे त्यांनी सांगितले की, जेव्हा काश्मिर खोऱ्यामध्ये काही आपत्ती येते तेव्हा जलकुंडाचा रंग बदलल्याने त्याचे संकेत मिळतात. तुलामुला गावात असलेल्या माता खीर भवानीच्या या मंदिराचे जलकुंड हे माता भवानीचेच स्वरूप मानले जाते. तसेच ते आपला रंग बदलून येणाऱ्या स्थितीचे संकेत देत असते.

गेल्या काही दिवसांपासून या जलकुंडाचा रंग लाल झालेला दिसत आहे. त्यामुळे येथे येणारे आईचे भक्त चिंतीत आहे. एक महिला भक्त गुडी जुतशी यांनी सांगितले की, येथे १०-१५ दिवस झाले, पण कुंडातील पाण्याचा रंग अद्याप पूर्वपदावर आलेला नाही. यापूर्वीही कुंडातील पाण्याचा रंग असाच झाला होता. त्यानंतर कोरोनाचा फैलाव होण्यास सुरुवात झाली होती. आता पुन्हा असा रंग झाला आहे. असे वाटते की, पुन्हा परिस्थिती बिघडणार आहे. त्यांनी सांगितले की, जेव्हा कुठलीही आपत्ती येणार असते, तेव्हा या जलकुंडातील पाणी बदलत राहते.

गुडी यांनी सांगितले की, कुंडातील पाण्याचा रंग बदलून तो लालसर झाला आहे. याचा अर्थ काही होणार आहे. रक्तपात होऊ शकतो. कारण जेव्हा पलायन झालं होतं तेव्हा पाण्याचा रंग काळा झाला होता. आमच्यापैकी काहीजण येथून निघून गेले होते. तर अनेक जण मृत्युमुखी पडले होते. त्यानंतर कोरोनामध्येही मोठ्या प्रमामावर हानी झाली होती. आता पुन्हा असं होत आहे. याचा अर्थ जेव्हा राहुल भट्टचा मृत्यू झाला, त्याआधी काही दिवसांपूर्वी या कुंडातील पाण्याचा रंग बदलला होता. नंतर तो लालेलाल झाला. राहुल भट मारला गेला. आता पुढे काही वाईट होऊ नये, अशी अपेक्षा करूया.

या कुंडातील पाण्याचा रंग लाल, पिवळा किंवा काळा होऊ लागतो तेव्हा कुठलीतरी मोठी आपत्ती येईल, अशी श्रद्धा आहे. तर पांढरा, निळा किंवा सौम्य रंगाचे पाणी असेल तर ते शुभ मानले जाते. या कुंडातील पाण्याचा रंग बदलताना पाहिले गेले आहे. विशेषकरून ९० च्या दशकात जेव्हा काश्मीरमधील परिस्थिती बिघडली होती. तेव्हा यातील पाण्याचा रंग हा काळा झाला होता. त्यानंतर काश्मिरी पंडितांचे विस्थापन आणि हत्या झाल्या होत्या. १९९९ च्या कारगिल युद्धापूर्वी या जलकुंडातील पाण्याचा रंग लाल झाला होता. २०१४ मध्ये पूर येण्यापूर्वी यातील पाण्याचा रंग बदलला होता. तसेच कोविडपूर्वीही या तलावातील पाण्याचा रंग बदलला होता.   

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरHinduismहिंदुइझमAdhyatmikआध्यात्मिक