शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
2
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
3
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
4
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
5
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
6
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
7
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
8
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
9
"मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो, कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
10
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
11
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
12
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
13
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
14
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
15
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
16
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
17
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
18
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
19
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
20
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात

मुलांना घरीच शिकवा कुराण, 'मदरसा' शब्दाचं अस्तित्व संपायला हवं; 'या' मुख्यमंत्र्यानं केली मोठी मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2022 10:22 IST

Himanta Biswa Sarma Statement on Madrassa: बिस्वा सरमा पुढे म्हणाले, 'मुलांना त्यांच्या मानवाधिकाराचे उल्लंघन करून मदरशांमध्ये पाठवले जाते. शाळांमध्ये विज्ञान, इंग्रजी आणि गणितासारख्या विषयांवर भर असायला हवा.

आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा (Himanta Biswa Sarma) यांनी, देशातील सर्व शाळांमध्ये एकसमान आणि सामान्य शिक्षण असायला हवे, यावर भर दत, 'मदरसा' शब्दाचे अस्तित्व आता पूर्णपणे संपुष्टात यायला हवे. तसेच, मुलांनी डॉक्टर, इंजिनिअर, प्राध्यापक आणि शास्त्रज्ञ होण्यासाठी अभ्यास करायला हवा, असे म्हटले आहे. ते दिल्ली येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते.

'जोवर हा शब्द असेल, तोवर मुले डॉक्टर-इंजिनिअर होण्याचा विचार करू शकणार नाहीत' -आसामचे मुख्यमंत्री सरमा म्हणाले, जोवर हा शब्द (मदरसा) असेल, तोवर मुले डॉक्टर आणि इंजिनिअर होण्याच्या दृष्टीने विचारच करू शकणार नाहीत. खरे तर, मदरशांमध्ये शिकून तुम्हाला डॉक्टर अथवा इंजिनिअर होता येणार नाही, असे जेव्हा तुम्ही मुलांना सांगाल, तेव्हा ते स्वतःच मदरशात जाण्यास नकार देतील.

'धार्मिक ग्रंथ शिकवा पण घरात' -बिस्वा सरमा पुढे म्हणाले, 'मुलांना त्यांच्या मानवाधिकाराचे उल्लंघन करून मदरशांमध्ये पाठवले जाते. शाळांमध्ये विज्ञान, इंग्रजी आणि गणितासारख्या विषयांवर भर असायला हवा. धार्मिक ग्रंथ घरात शिकवले जाऊ शकतात. तर शाळांमध्ये मुलांना डॉक्टर, इंजिनिअर, प्रोफेसर आणि वैज्ञानिक बनवण्यासाठी शिकवायला हवे.'

मदरशातील विद्यार्थी हुशार असतात... यावर काय म्हणाले सरमा? -शिक्षणतज्ज्ञांच्या या सत्रात एका निवृत्य शिक्षणतज्ज्ञांने विचारले, की मदरशांतील विद्यार्थी खूप हुशार असतात. ते कुरानचा प्रत्येक शब्द सहजपणे लक्षात ठेवतात. यावर सरमा म्हणाले, 'सर्वच मुस्लीम आधी हिंदू होते. कुणीही मुस्लीम भारतात जन्माला आला नव्हता. भारतात प्रत्येक जण हिंदूच होता. यामुळे, जर एखादा मुस्लीम मुलगा खूप हुशार असेल, तर मी त्याच्या हिंदू पूर्वजांनाही त्याचे काही प्रमाणात श्रेय देईन.

टॅग्स :Educationशिक्षणAssamआसामSchoolशाळाdelhiदिल्ली