शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
2
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
3
'भाजपचे सरकार कायम राहणार नाही, आज ना उद्या नक्की बदला घेईन', ममता बॅनर्जींचा इशारा
4
हैदराबादमध्ये पावसाचं थैमान! SRH vs GT सामना रद्द झाल्यास संपुष्टात येईल RCB चं आव्हान?
5
मुलगी हरवल्याप्रकरणी चौकशीसाठी नेलं अन् कोठडीतच तरूणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?
6
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
7
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
8
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
9
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
10
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
11
"लाचारीच्या सर्व मर्यादा सोडल्या"; जिरेटोप प्रकरणावरून शरद पवारांनी प्रफुल्ल पटेलांना फटकारलं!
12
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'
13
Hina Khan : "40 डिग्रीत वेदनादायक पीरियड क्रॅम्प्सने त्रस्त असताना..."; हिना खानने सांगितला अनुभव
14
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
15
‘पृथ्वीराज चव्हाण यांनी पोपट घेऊन भविष्यवाणी सांगण्यास बसावे’, अजित पवार गटाचा टोला 
16
‘मोदींनी एकदा मला फोन केला आणि म्हणाले, माझा अमेरिकेचा व्हिसा फेटाळलाय, तेव्हा मीच…’ शरद पवार यांनी सांगितली आठवण
17
मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत रिलेशनशीपमध्ये होता 'हीरामंडी'चा अभिनेता, आता ब्रेकअपबाबत केला खुलासा
18
"महिलांच्या कमावण्याच्या नादात वाढतंय घटस्फोटाचं प्रमाण"; सईद अन्वरचं वादग्रस्त विधान! VIDEO व्हायरल
19
T20 WC पूर्वी भारतीय संघाच्या सराव सामन्याची तारीख व संघ ठरला! जाणून घ्या अपडेट्स 
20
Adani Group : अदानींच्या 'या' कंपनीला मोठा झटका, नॉर्वेच्या सर्वात मोठ्या वेल्थ फंडानं केलं ब्लॅकलिस्ट

ब्रिटिशांना जशास तसे उत्तर! दिल्लीतील उच्चायुक्तालयाबाहेरील सुरक्षा हटविली

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2023 2:36 PM

कूटनीतीद्वारे भारत सरकारने नवी दिल्लीतील ब्रिटिश उच्चायुक्तालय आणि ब्रिटिश उच्चायुक्तांच्या निवासस्थानासमोरची सुरक्षा व्यवस्था काढून घेतली आहे.

दोन दिवसांपूर्वी खलिस्तानी समर्थकांनी भारतीय दुतावासावरील तिरंग्याचा अपमान केला होता. ब्रिटनमधील दुतावासासमोर खलिस्तानींनी आठवड्याभरात दोनदा हिंसक आंदोलन केले होते. यावर वारंवार निषेध नोंदवूनही ब्रिटीश सुरक्षा यंत्रणेने काही कारवाई केली नव्हती. यामुळे भारताने देखील ब्रिटिशांना जशास तसे उत्तर देण्यास सुरुवात केली आहे. 

कूटनीतीद्वारे भारत सरकारने नवी दिल्लीतील ब्रिटिश उच्चायुक्तालय आणि ब्रिटिश उच्चायुक्तांच्या निवासस्थानासमोरची सुरक्षा व्यवस्था काढून घेतली आहे. या दोन्ही इमारतींसमोर बॅरिकेड्स लावून बंदुकधारी पोलीस सुरक्षा असते. ती हटविण्यात आली आहे. महत्वाचे म्हणजे अन्य देशांच्या उच्चायुक्तालयासमोर नेहमीप्रमाणेच सुरक्षा आहे. या बॅरिकेड्सना सुरक्षा व्यवस्थेचा पहिली फळी मानली जाते. 

खलिस्तान समर्थकांनी अलीकडच्या काळात ब्रिटन, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा येथील भारतीय उच्चायुक्तालय किंवा वाणिज्य दूतावासांसमोर हिंसक निदर्शने केली आहेत. भारताने या सर्व देशांकडे चिंता व्यक्त केली होती. रविवारच्या घटनेनंतर भारत सरकारने ब्रिटनच्या भारतातील उपउच्चायुक्तांना बोलावून तीव्र निषेध व्यक्त केला होता. परराष्ट्र मंत्रालयाने अमेरिकेच्या प्रभारी राजदूतालाही बोलावले आणि सॅन फ्रान्सिस्कोमधील दूतावासावरील हल्ल्याबद्दल चिंता व्यक्त केली. भारताने या दोन्ही देशांना आपल्या दूतावासांची सुरक्षा वाढवावी, असे अनेकदा सांगितले आहे. 

आजचे हे पाऊल ब्रिटनला कुटनीतीत अडकविण्यासाठी उचलण्यात आल्याचे सांगितले जात आहे.  

टॅग्स :Punjabपंजाब