शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

ठरलं! ज्योतिरादित्य शिंदेंना मिळणार 'हे' मंत्रालय?; मोदींच्या कॅबिनेटमध्ये होणार समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2020 03:52 IST

व्होडाफोन आयडियासारख्या कंपन्या एजीआर रक्कमेमुळे व्यवसाय बंद करावा लागू शकेल असे म्हटलेल्या आहेत.

संतोष ठाकूर । हरीष गुप्तानवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ज्योतिरादित्य शिंदे भाजपमध्ये आल्यानंतर मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू असून त्यांना राज्यसभेत पाठवून केंद्रीय मंत्रिमंडळातही जागा मिळेल, असे दिसते. शिंदे यांचा अनुभव वाणिज्य क्षेत्रात असल्यामुळे त्यांना त्याच मंत्रालयाची जबाबदारी दिली जाऊ शकते. शिंदे यांच्यासाठी जे मंत्रालय योग्य मानले जात आहे त्यात रेल्वे, अवजड उद्योग, दूरसंचार, उर्जा मंत्रालयाचाही समावेश आहे.

सूत्रांनुसार शिंदे यांनी काँग्रेसच्या राजवटीत दूरसंचार आणि वाणिज्यसह उर्जा मंत्रालयाचाही कार्यभार पाहिला आहे. ते दिवसरात्र काम करू शकतात. त्यामुळे सरकार त्यांच्या अनुभवाचा चांगला उपयोग होईल अशा मंत्रालयात आणू शकते. सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात एकापेक्षा जास्त मंत्रालयांची जबाबदारी असलेले अनेक मंत्री आहेत. माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे अवजड उद्योग मंत्रालयाचाही अतिरिक्त प्रभार आहे. शिवसेना राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडल्यानंतर जावडेकर यांना ही अतिरिक्त जबाबदारी दिली गेली. सध्या आर्थिक आघाडीवर देशच नव्हे तर जगाचीही प्रकृती खराब आहे. वाहन उद्योगही सुस्तावला असल्यामुळे त्याला पूर्णवेळ मंत्र्याची बऱ्याच दिवसांपासून गरज आहे. कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांच्याकडे दूरसंचार आणि माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयदेखील आहे.

व्होडाफोन आयडियासारख्या कंपन्या एजीआर रक्कमेमुळे व्यवसाय बंद करावा लागू शकेल असे म्हटलेल्या आहेत. ज्योतिरादित्य शिंदे दूरसंचार मंत्री असतानाडाक विभागाचा कायापालट करण्यासाठी ऐरो योजना सुरूझाली होती. त्याचे सकारात्मक परिणाम दिसले होते.शिंदे व्यवसायाने इन्व्हेस्टमेंट बँकर होते. त्यामुळे ते मंत्रालयही त्यांच्यासाठी उचित मानले जात आहे. ते उर्जा आणि वाणिज्य मंत्रीही होते. परंतु, वाणिज्य मंत्रालय त्यांना दिल्यास जाणकारांना एक मोठी अडचण वाटते ती म्हणजे अमेरिकेसोबत व्यापार कराराची प्रारंभीची चर्चा पीयूष गोयल यांनी केली होती.शिंदे-राहुल भेटीचे प्रयत्न वायाकाँग्रेस पक्ष सोडण्याआधी ज्योतिरादित्य शिंदे यांंनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेण्यासाठी शेवटचा प्रयत्न केला; परंतु त्यांचे प्रयत्न वाया गेले. त्यांनी राहुल गांधी याच्या १२ तुघलक रोड निवास्थानी तीन फोन केले. ज्योतिरादित्य शिंदे हे राहुल गांधी यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जात असले तरी त्यांच्याकडे राहुल गांधी यांच्या मोबाईल फोनचा नवीन नंबर नाही. त्यांनी अलीकडेच मोबाईल नंबर बदलला आहे. अनेक नेत्यांकडे त्यांचा मोबाईल नंबर नाही. त्यामुळे ज्योतिरादित्य शिंदे यांनी मागच्या आठवड्यात राहुल गांधी याच्या निवासस्थानी फोन केला होता. उच्चपदस्थ सूत्रांनुसार राहुल गांधी यांना निरोप देण्याचे आश्वासन त्यांच्या स्वीय सचिवांनी दिले होते. मात्र, सर्व प्रयत्न वाया गेल्याने ते कमालीचे निराश झाले.

टॅग्स :Jyotiraditya Scindiaज्योतिरादित्य शिंदेcongressकाँग्रेसBJPभाजपा