शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

ठरलं! ज्योतिरादित्य शिंदेंना मिळणार 'हे' मंत्रालय?; मोदींच्या कॅबिनेटमध्ये होणार समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2020 03:52 IST

व्होडाफोन आयडियासारख्या कंपन्या एजीआर रक्कमेमुळे व्यवसाय बंद करावा लागू शकेल असे म्हटलेल्या आहेत.

संतोष ठाकूर । हरीष गुप्तानवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ज्योतिरादित्य शिंदे भाजपमध्ये आल्यानंतर मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू असून त्यांना राज्यसभेत पाठवून केंद्रीय मंत्रिमंडळातही जागा मिळेल, असे दिसते. शिंदे यांचा अनुभव वाणिज्य क्षेत्रात असल्यामुळे त्यांना त्याच मंत्रालयाची जबाबदारी दिली जाऊ शकते. शिंदे यांच्यासाठी जे मंत्रालय योग्य मानले जात आहे त्यात रेल्वे, अवजड उद्योग, दूरसंचार, उर्जा मंत्रालयाचाही समावेश आहे.

सूत्रांनुसार शिंदे यांनी काँग्रेसच्या राजवटीत दूरसंचार आणि वाणिज्यसह उर्जा मंत्रालयाचाही कार्यभार पाहिला आहे. ते दिवसरात्र काम करू शकतात. त्यामुळे सरकार त्यांच्या अनुभवाचा चांगला उपयोग होईल अशा मंत्रालयात आणू शकते. सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात एकापेक्षा जास्त मंत्रालयांची जबाबदारी असलेले अनेक मंत्री आहेत. माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे अवजड उद्योग मंत्रालयाचाही अतिरिक्त प्रभार आहे. शिवसेना राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडल्यानंतर जावडेकर यांना ही अतिरिक्त जबाबदारी दिली गेली. सध्या आर्थिक आघाडीवर देशच नव्हे तर जगाचीही प्रकृती खराब आहे. वाहन उद्योगही सुस्तावला असल्यामुळे त्याला पूर्णवेळ मंत्र्याची बऱ्याच दिवसांपासून गरज आहे. कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांच्याकडे दूरसंचार आणि माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयदेखील आहे.

व्होडाफोन आयडियासारख्या कंपन्या एजीआर रक्कमेमुळे व्यवसाय बंद करावा लागू शकेल असे म्हटलेल्या आहेत. ज्योतिरादित्य शिंदे दूरसंचार मंत्री असतानाडाक विभागाचा कायापालट करण्यासाठी ऐरो योजना सुरूझाली होती. त्याचे सकारात्मक परिणाम दिसले होते.शिंदे व्यवसायाने इन्व्हेस्टमेंट बँकर होते. त्यामुळे ते मंत्रालयही त्यांच्यासाठी उचित मानले जात आहे. ते उर्जा आणि वाणिज्य मंत्रीही होते. परंतु, वाणिज्य मंत्रालय त्यांना दिल्यास जाणकारांना एक मोठी अडचण वाटते ती म्हणजे अमेरिकेसोबत व्यापार कराराची प्रारंभीची चर्चा पीयूष गोयल यांनी केली होती.शिंदे-राहुल भेटीचे प्रयत्न वायाकाँग्रेस पक्ष सोडण्याआधी ज्योतिरादित्य शिंदे यांंनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेण्यासाठी शेवटचा प्रयत्न केला; परंतु त्यांचे प्रयत्न वाया गेले. त्यांनी राहुल गांधी याच्या १२ तुघलक रोड निवास्थानी तीन फोन केले. ज्योतिरादित्य शिंदे हे राहुल गांधी यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जात असले तरी त्यांच्याकडे राहुल गांधी यांच्या मोबाईल फोनचा नवीन नंबर नाही. त्यांनी अलीकडेच मोबाईल नंबर बदलला आहे. अनेक नेत्यांकडे त्यांचा मोबाईल नंबर नाही. त्यामुळे ज्योतिरादित्य शिंदे यांनी मागच्या आठवड्यात राहुल गांधी याच्या निवासस्थानी फोन केला होता. उच्चपदस्थ सूत्रांनुसार राहुल गांधी यांना निरोप देण्याचे आश्वासन त्यांच्या स्वीय सचिवांनी दिले होते. मात्र, सर्व प्रयत्न वाया गेल्याने ते कमालीचे निराश झाले.

टॅग्स :Jyotiraditya Scindiaज्योतिरादित्य शिंदेcongressकाँग्रेसBJPभाजपा