'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2025 17:46 IST2025-12-13T17:45:09+5:302025-12-13T17:46:57+5:30

केरळमध्ये भाजपची ऐतिहासिक झेप, तिरुवनंतपुरम महापालिकेवर एनडीएचा भगवा

Thank you Thiruvananthapuram PM Modi reacts to NDA historic victory in kerala | 'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार

'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार

PM Modi On Kerala Local Body Polls:केरळमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीने ऐतिहासिक यश मिळवले आहे. विशेषतः तिरुवनंतपुरम महानगरपालिकेत एनडीए सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला असून, त्यांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखालील आघाडीचा ४५ वर्षांचा बालेकिल्ला उद्ध्वस्त केला आहे. या अभूतपूर्व विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळच्या जनतेचे आभार मानत विरोधकांवर जोरदार टीका केली आहे.

१०१ वॉर्ड असलेल्या तिरुवनंतपुरम महापालिकेच्या निकालांमध्ये एनडीएने लक्षणीय कामगिरी केली आहे. एनडीएने ५० जागा जिंकून सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष बनला आहे, ज्यामुळे ते पुढील महापालिका सरकार स्थापन करण्याच्या मजबूत स्थितीत आहेत. या विजयामुळे शहराच्या राजकीय समीकरणात मोठे बदल झाले आहेत. तिरुवनंतपुरम हा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार शशी थरूर यांचा बालेकिल्ला मानला जातो, त्यामुळे भाजपच्या या यशाचे महत्त्व अधिक वाढले आहे. तसेच, एनडीएने त्रिपुनिथुरा नगरपालिकेवरही कब्जा मिळवला आहे.

पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया

तिरुवनंतपुरममधील ऐतिहासिक निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवर पोस्ट करत आपला आनंद व्यक्त केला आणि केरळच्या जनतेचे आभार मानले.

"धन्यवाद तिरुवनंतपुरम! तिरुवनंतपुरम नगर निगममधील भाजप-एनडीएला मिळालेला जनादेश हा केरळच्या राजकारणातील एक ऐतिहासिक क्षण आहे. जनतेचा आता पूर्ण विश्वास आहे की, केवळ आमचा पक्षच राज्याच्या विकासाच्या आकांक्षा पूर्ण करू शकतो, " असं पंतप्रधान मोदी म्हणाले. त्यांनी पुढे म्हटले की, भाजप या जीवंत शहराचा विकास आणि लोकांना जीवन जगणे अधिक सुलभ बनवण्याच्या दिशेने काम करेल.

कार्यकर्त्यांचे आभार

पंतप्रधानांनी या शानदार निकालासाठी भाजपच्या सर्व मेहनती कार्यकर्त्यांचे आभार मानले. ते म्हणाले, "आजचा दिवस केरळमध्ये पिढ्यानपिढ्या काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे परिश्रम आणि संघर्ष आठवण्याचा आहे, ज्यामुळे हे यश शक्य झाले. आमचे कार्यकर्ते आमची ताकद आहेत आणि आम्हाला त्यांचा अभिमान आहे"

विरोधकांवर टीका

केरळच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील निकालांवर बोलताना मोदींनी विरोधी आघाड्यांवर निशाणा साधला. ते म्हणाले, "केरळच्या त्या सर्व लोकांचे मी मनापासून आभार मानतो, ज्यांनी स्थानिक निकाय निवडणुकांमध्ये भाजप आणि एनडीएच्या उमेदवारांना मतदान केले."

"केरळची जनता आता यूडीएफ आणि एलडीएफला कंटाळली आहे. त्यांना आता एनडीए हाच एकमेव पर्याय दिसतो, जो सुशासन देऊ शकतो आणि सर्वांसाठी संधींनी भरलेल्या विकसित केरळची निर्मिती करू शकतो," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Web Title : तिरुवनंतपुरम में एनडीए ने 45 साल का शासन खत्म किया; मोदी ने सराहा।

Web Summary : तिरुवनंतपुरम में एनडीए ने ऐतिहासिक जीत दर्ज की, सीपीएम के नेतृत्व वाले मोर्चे का 45 साल का शासन समाप्त किया। पीएम मोदी ने केरल के लोगों को धन्यवाद दिया, विपक्ष की आलोचना की और भाजपा कार्यकर्ताओं को श्रेय दिया। एनडीए ने त्रिपुनिथुरा भी जीता।

Web Title : NDA ends 45-year reign in Thiruvananthapuram; Modi hails 'historic moment'.

Web Summary : NDA secured a historic win in Thiruvananthapuram, ending the CPM-led front's 45-year rule. PM Modi thanked Kerala's people, criticizing opposition and crediting BJP workers. NDA also won Tripunithura.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.