शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

“धीरज साहू पक्षात आले तर क्लीन चिट देणार नाही, हे भाजप नेत्यांनी सांगावे”; ठाकरे गटाची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2023 16:01 IST

Thackeray Group MP Priyanka Chaturvedi: काँग्रेसवर भ्रष्टाचारी पक्षाची टीका करण्यापेक्षा असा भ्रष्टाचार करणारे भाजपमध्ये आल्यावर गंगास्नान करुन शुद्ध होणार नाहीत, हे आश्वासन द्यावे, अशी टीका ठाकरे गटाने केली.

Thackeray Group MP Priyanka Chaturvedi Slams Bjp:काँग्रेसचे राज्यसभा खासदार धीरज साहू यांच्या ओडिशा आणि झारखंड येथे असलेल्या बेहिशेबी मालमत्तेवर प्राप्तीकर विभागाने छापे टाकले. चार दिवसांपासून वेगवेगळ्या ठिकाणी बेहिशोबी रोख रकमेची मोजणी सुरू आहे. ही रक्कम ३०० कोटींच्या पुढे जाण्याची शक्यता असल्याचे प्राप्तीकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी सांगितले. बुधवारपासून प्राप्तीकर विभागाने कारवाई सुरू केली होती. एकाच धाडीत एवढ्या मोठ्या प्रमाणात काळा पैसा प्राप्त होण्याची ही पहिलीच वेळ आहे, असे प्राप्तीकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, यावरून भाजपने काँग्रेसवर सडकून टीका केली असून, शिवसेना ठाकरे गटाच्या खासदाराने भाजपला खोचक टोला लगावला आहे. 

ओडिशामधील बोध डिस्टलरी प्रा. लि. या कंपनीच्या कार्यालयात सर्वाधिक रोकड आढळली आहे. प्राप्तीकर विभागाने जप्त केलेल्या रोख रकमेची अद्यापही मोजणी सुरूच आहे. नोटा मोजण्यासाठी आम्ही ४० मोठ्या आणि काही छोट्या मशीन तैनात केल्या आहेत. जेणेकरून ही कारवाई लवकर पूर्ण केली जाईल. आम्ही बोलंगीर आणि संबलपूर जिल्ह्यातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेला विनंती केली आहे की, त्यांनी बँकेतील कर्मचारी नोटांजी मोजणी करण्याच्या कामासाठी द्यावेत, अशी माहिती प्राप्तीकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. यानंतर आता ठाकरे गटाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.

धीरज साहू पक्षात आले तर क्लीन चिट देणार नाही, हे भाजप नेत्यांनी सांगावे

एवढ्या प्रचंड प्रमाणात रोख स्वरुपात रक्कम बाळगणे आणि करचोरी करणे ही चुकीची गोष्ट आहे. करचोरीचे प्रकरण तर गुन्हेगारी स्वरुपाचे मानले जाते. धीरज साहू यांच्यावर भाजपचे नेते, मंत्री मोठ्या प्रमाणात टीका करत आहेत. आगामी काळात धीरज साहू भारतीय जनता पक्षात आले तर या सर्व प्रकरणात त्यांना क्लीन चिट दिली जाणार नाही, असे आश्वासन भाजप नेत्यांनी तसेच मंत्र्यांनी द्यावे, असा खोचक टोला प्रियांका चतुर्वेदी यांनी लगावला. तसेच पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, याचे कारण म्हणजे, महाराष्ट्रात ७० हजार कोटींचा घोटाळा झाला, परंतु, ते भाजपसोबत गेले आणि सगळे जण हा घोटाळा विसरले. आमचा पक्ष सोडून भाजपमध्ये किंवा भाजपसोबत गेलेल्या नेत्यांवरील ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआयची कारवाई थांबते. काँग्रेसवर भ्रष्टाचारी पक्ष अशी टीका करण्यापेक्षा असा भ्रष्टाचार करणारे भाजपमध्ये आल्यावर गंगास्नान करून शुद्ध होणार नाहीत, हे आश्वासन द्यावे, अशी टीका प्रियांका चतुर्वेदी यांनी केली.

दरम्यान, काँग्रेसने खासदार धीरज साहू यांच्या कारवाईनंतर हात झटकले आहेत. तर, हा नवा भारत आहे. येथे राजघराण्याच्या नावावर जनतेचे शोषण करू दिले जाणार नाही. तुम्ही पळून थकाल, पण कायदा तुमचा पिच्छा सोडणार नाही. काँग्रेस जर भ्रष्टाचाराची गॅरंटी असेल तर पंतप्रधान मोदी हे ‘भ्रष्टाचारावर कारवाईची गॅरंटी’ आहेत. जनतेकडून लुटलेला पै-पै परत करावा लागेल, अशी टीका भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी केली आहे.

 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेChhattisgarhछत्तीसगडcongressकाँग्रेसBJPभाजपा