शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

“धीरज साहू पक्षात आले तर क्लीन चिट देणार नाही, हे भाजप नेत्यांनी सांगावे”; ठाकरे गटाची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2023 16:01 IST

Thackeray Group MP Priyanka Chaturvedi: काँग्रेसवर भ्रष्टाचारी पक्षाची टीका करण्यापेक्षा असा भ्रष्टाचार करणारे भाजपमध्ये आल्यावर गंगास्नान करुन शुद्ध होणार नाहीत, हे आश्वासन द्यावे, अशी टीका ठाकरे गटाने केली.

Thackeray Group MP Priyanka Chaturvedi Slams Bjp:काँग्रेसचे राज्यसभा खासदार धीरज साहू यांच्या ओडिशा आणि झारखंड येथे असलेल्या बेहिशेबी मालमत्तेवर प्राप्तीकर विभागाने छापे टाकले. चार दिवसांपासून वेगवेगळ्या ठिकाणी बेहिशोबी रोख रकमेची मोजणी सुरू आहे. ही रक्कम ३०० कोटींच्या पुढे जाण्याची शक्यता असल्याचे प्राप्तीकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी सांगितले. बुधवारपासून प्राप्तीकर विभागाने कारवाई सुरू केली होती. एकाच धाडीत एवढ्या मोठ्या प्रमाणात काळा पैसा प्राप्त होण्याची ही पहिलीच वेळ आहे, असे प्राप्तीकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, यावरून भाजपने काँग्रेसवर सडकून टीका केली असून, शिवसेना ठाकरे गटाच्या खासदाराने भाजपला खोचक टोला लगावला आहे. 

ओडिशामधील बोध डिस्टलरी प्रा. लि. या कंपनीच्या कार्यालयात सर्वाधिक रोकड आढळली आहे. प्राप्तीकर विभागाने जप्त केलेल्या रोख रकमेची अद्यापही मोजणी सुरूच आहे. नोटा मोजण्यासाठी आम्ही ४० मोठ्या आणि काही छोट्या मशीन तैनात केल्या आहेत. जेणेकरून ही कारवाई लवकर पूर्ण केली जाईल. आम्ही बोलंगीर आणि संबलपूर जिल्ह्यातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेला विनंती केली आहे की, त्यांनी बँकेतील कर्मचारी नोटांजी मोजणी करण्याच्या कामासाठी द्यावेत, अशी माहिती प्राप्तीकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. यानंतर आता ठाकरे गटाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.

धीरज साहू पक्षात आले तर क्लीन चिट देणार नाही, हे भाजप नेत्यांनी सांगावे

एवढ्या प्रचंड प्रमाणात रोख स्वरुपात रक्कम बाळगणे आणि करचोरी करणे ही चुकीची गोष्ट आहे. करचोरीचे प्रकरण तर गुन्हेगारी स्वरुपाचे मानले जाते. धीरज साहू यांच्यावर भाजपचे नेते, मंत्री मोठ्या प्रमाणात टीका करत आहेत. आगामी काळात धीरज साहू भारतीय जनता पक्षात आले तर या सर्व प्रकरणात त्यांना क्लीन चिट दिली जाणार नाही, असे आश्वासन भाजप नेत्यांनी तसेच मंत्र्यांनी द्यावे, असा खोचक टोला प्रियांका चतुर्वेदी यांनी लगावला. तसेच पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, याचे कारण म्हणजे, महाराष्ट्रात ७० हजार कोटींचा घोटाळा झाला, परंतु, ते भाजपसोबत गेले आणि सगळे जण हा घोटाळा विसरले. आमचा पक्ष सोडून भाजपमध्ये किंवा भाजपसोबत गेलेल्या नेत्यांवरील ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआयची कारवाई थांबते. काँग्रेसवर भ्रष्टाचारी पक्ष अशी टीका करण्यापेक्षा असा भ्रष्टाचार करणारे भाजपमध्ये आल्यावर गंगास्नान करून शुद्ध होणार नाहीत, हे आश्वासन द्यावे, अशी टीका प्रियांका चतुर्वेदी यांनी केली.

दरम्यान, काँग्रेसने खासदार धीरज साहू यांच्या कारवाईनंतर हात झटकले आहेत. तर, हा नवा भारत आहे. येथे राजघराण्याच्या नावावर जनतेचे शोषण करू दिले जाणार नाही. तुम्ही पळून थकाल, पण कायदा तुमचा पिच्छा सोडणार नाही. काँग्रेस जर भ्रष्टाचाराची गॅरंटी असेल तर पंतप्रधान मोदी हे ‘भ्रष्टाचारावर कारवाईची गॅरंटी’ आहेत. जनतेकडून लुटलेला पै-पै परत करावा लागेल, अशी टीका भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी केली आहे.

 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेChhattisgarhछत्तीसगडcongressकाँग्रेसBJPभाजपा