शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

जम्मू-काश्मिरच्या खोऱ्यात दहशतवाद्यांचा खात्मा होणार; NSG कमांडो कायमस्वरूपी तैनात करण्यास गृह मंत्रालयाची मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2024 08:59 IST

जम्मू विभागात वाढत्या दहशतवादी कारवाया आणि हल्ले पाहता केंद्रीय गृह मंत्रालयाने जम्मूमध्ये राष्ट्रीय सुरक्षा रक्षकांसाठी कायमस्वरूपी केंद्र स्थापन करण्यास मान्यता दिली आहे.

जम्मू विभागातील वाढत्या दहशतवादी कारवाया आणि हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह मंत्रालयाने जम्मूमध्ये राष्ट्रीय सुरक्षा रक्षक (NSG)साठी कायमस्वरूपी केंद्र स्थापन करण्यास मंजुरी दिली आहे. एनएसजीचे तीन ते चार घटक या केंद्रात कायमस्वरुपी तैनात केले जातील. एनएसजीने जम्मू शहराच्या विविध भागात तसेच बाहेरील भागात उंच इमारती, सुरक्षा आस्थापना आणि संवेदनशील सार्वजनिक ठिकाणांचे सुरक्षा ऑडिट करून कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी कृती आराखडा तयार केला आहे.

कोण होणार मुख्यमंत्री? विनोद तावडेंनी घेतली अमित शाहांची भेट; 40 मिनिटं चर्चा

केंद्राच्या या निर्णयामुळे आता जम्मू आणि आसपासच्या भागात विशेष गजबजलेल्या भागात दहशतवादी हल्ले आणि अशा कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी एनएसजीला दिल्ली किंवा चंदीगडहून पाचारण करावे लागणार नाही. आतापर्यंत, २०१८ पासून जम्मू-काश्मीरमधील श्रीनगरमध्ये NSG कायमस्वरूपी तैनात करण्यात आले होते. हे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या सूचनेनुसार करण्यात आले होते.

अधिकाऱ्यांनी दिलेली माहिती अशी, गेल्या काही वर्षांत जम्मू विभागात दहशतवादी कारवाया वाढल्या आहेत. जम्मू शहरात दहशतवाद्यांकडून मोठा हल्ला होण्याची शक्यताही गुप्तचर यंत्रणांनी व्यक्त केली आहे. गुप्तचर यंत्रणांच्या अहवालाच्या आधारेच केंद्रीय गृहमंत्रालयाने जम्मूमध्ये एनएसजीचे कायमस्वरूपी केंद्र मंजूर केले आहे. NSG जवानांचा एक गट आता कायमस्वरूपी जम्मूमध्ये उपस्थित राहणार आहे.

जम्मूमध्ये एनएसजीच्या तैनातीबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले की, जम्मू-काश्मीर पोलिसांनी जम्मू-काश्मीरसाठी तयार केलेल्या दहशतवादविरोधी कृती योजनेअंतर्गत एनएसजी कमांडोची तैनाती करण्यात आली आहे. पण एनएसजी कमांडोच्या तैनातीचा अर्थ असा होऊ नये की आता फक्त एनएसजी जम्मू आणि त्याच्या आसपासच्या भागात दहशतवादविरोधी कारवायांची जबाबदारी घेईल. ही जबाबदारी फक्त जम्मू आणि काश्मीर पोलिसांवर आहे आणि ते आणि त्यांची दहशतवादविरोधी पथके दहशतवाद्यांविरोधातील कारवाईत मोठी भूमिका बजावतील.

पर्यटकांना आता सियाचीन, कारगिल आणि गलवान या युद्धक्षेत्रांनाही भेट देता येणार आहे. जम्मू-काश्मीरमध्ये पर्यटनाला चालना देण्यासाठी लष्कर मोठा पुढाकार घेणार आहे. लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी बुधवारी सांगितले की, आम्ही पर्यटकांना सियाचीन ग्लेशियर, कारगिल आणि गलवान व्हॅलीच्या हिमशिखरांना भेट देण्याचे ठरवले आहे, जेणेकरून त्यांना या दुर्गम युद्धभूमींचा प्रत्यक्ष अनुभव घेता येईल.

जम्मू-काश्मीरमधील प्रबळ थीम दहशतवादापासून पर्यटनात बदलली आहे आणि लष्कराने हा बदल घडवून आणला आहे. सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या संरक्षण आणि धोरणात्मक अभ्यास विभागातर्फे आयोजित व्याख्यानमालेला संबोधित करताना जनरल द्विवेदी म्हणाले की, जम्मू-काश्मीरच्या पर्यटन क्षेत्रात प्रचंड क्षमता आहे.

जम्मू-काश्मीरला भेट देणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. पर्यटनाला चालना देण्यासाठी ४८ क्षेत्रे निश्चित करण्यात आली आहेत. या दिशेने उचललेल्या पावलांमुळे येत्या पाच वर्षांत पर्यटकांची संख्या दुप्पट करण्याची क्षमता आहे.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीर