शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

कर्नाटकात तिढा; आघाडीसाठी काँग्रेस पवार, चंद्राबाबूूंवर विसंबून

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2019 05:58 IST

आगामी लोकसभा निवडणुकांत कर्नाटकातील जागावाटपाबाबत जनता दल (एस) या पक्षाशी सुरू असलेल्या वाटाघाटींमध्ये काँग्रेसला अनेक अडथळे येत आहेत.

नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकांत कर्नाटकातील जागावाटपाबाबत जनता दल (एस) या पक्षाशी सुरू असलेल्या वाटाघाटींमध्ये काँग्रेसला अनेक अडथळे येत आहेत. या अनुभवापासून सावध झालेल्या काँग्रेसने विरोधी पक्षांची राष्ट्रीय आघाडी स्थापन करण्यामध्ये कोणतीही विघ्ने येऊ नयेत म्हणून आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुक अब्दुल्ला यांची प्राधान्याने मदत घ्यायचे ठरविले आहे.आघाडीसाठी विविध नेत्यांशी चर्चा करण्याकरिता नायडू यांनी पुढाकार घेतला आहे. या घडामोडींशी संबंधित सूत्रांनी सांगितले की, नायडू, पवार, फारुक अब्दुल्ला या तिघांची या महिन्याच्या मध्याला एक बैठक होणार आहे. त्यामध्ये आघाडी स्थापन करण्याकरिता करावयाच्या ठोस प्रयत्नांबाबत चर्चा होईल.तेलगू देसम पक्षाचे प्रवक्ते कम्बामपती राममोहन राव यांनी सांगितले की, योग्य वाटतील तितक्या जागा मागण्याचा प्रादेशिक पक्षांना अधिकार आहेच.लोकसभा निवडणुकांसाठी आघाडी स्थापन करताना जागावाटपाचा प्रश्नही चर्चेच्या माध्यमातून सोडविला जाईल. संसदेचे सध्या सुरू असलेले अधिवेशन ८ जानेवारीला संपत असून, त्यानंतर दोन्ही पक्षांच्या होणाऱ्या बैठकीत कर्नाटकमधील लोकसभा जागावाटपाचा तिढा सुटेल, अशी आशाही माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी व्यक्त केली आहे.हव्या आहेत १२ जागाकर्नाटकामध्ये आघाडी सरकार स्थापन करण्याआधी काँग्रेस व जनता दल (एस)मध्ये सर्व पदे २:१ या प्रमाणात वाटून घेण्याचे ठरले होते. या सूत्रानुसार लोकसभा निवडणुकीतील जागावाटपात राज्यातील २८ जागांपैकी जनता दल (एस)च्या वाट्याला १० व काँग्रेसला १८ जागा येणार आहेत.मात्र, जनता दल (एस)चे प्रमुख एच. डी. देवेगौडा आता १२ जागा मिळाव्यात म्हणून हटून बसले आहेत. ते म्हणाले की, जर ही मागणी पूर्ण झाली नाही तर काँग्रेसशी मैत्रीपूर्ण लढत देण्याची तयारी आम्ही करीत आहोत.

टॅग्स :congressकाँग्रेस