शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

INDIA आघाडीत जागावाटपाचा तिढा आणखी वाढला; प्रादेशिक पक्षांचा काँग्रेसवर दबाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2024 10:05 IST

इंडिया आघाडीत २८ पक्ष मित्रपक्ष आहेत. आघाडीतील विरोधी पक्षांची दिल्लीत १९ डिसेंबर रोजी चौथी बैठक झाली.

नवी दिल्ली - India Alliance Seat Sharing ( Marathi News )  विरोधी पक्षांची आघाडी असलेल्या 'इंडिया'च्या मित्रपक्षांमध्ये जागावाटपावरून वाद आणि तणाव वाढला आहे. त्यात काँग्रेसला सर्वाधिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. आघाडीतील सर्वात मोठा आणि राष्ट्रीय पक्ष असल्याने सर्व पक्षांना सांभाळण्याचे आव्हान काँग्रेससमोर आहे. त्यात प्रादेशिक आणि सहकारी पक्ष आपापल्या राज्यात काँग्रेसशी जुळवून घेण्यासाठी दबाव आणत आहेत. पश्चिम बंगाल असो वा दिल्ली आणि पंजाब, बिहार असो वा यूपी. जागावाटपावरून मंथन होत असताना सर्वत्र वादाच्या बातम्या येत आहेत. त्यामुळेच मुदत संपून आठवडा उलटूनही एकमत होऊ शकले नाही. आता दिल्ली हायकमांड जागा निश्चित करणार आहे.

इंडिया आघाडीत २८ पक्ष मित्रपक्ष आहेत. आघाडीतील विरोधी पक्षांची दिल्लीत १९ डिसेंबर रोजी चौथी बैठक झाली. यामध्ये सर्व पक्षांनी आपापल्या राज्यात जागावाटपाचा फॉर्म्युला तयार करून त्यावर एकमत करण्याची अंतिम तारीख ३० डिसेंबर होती. मात्र कोणताही पक्ष तडजोड करण्यास किंवा मागे हटण्यास तयार नसल्याचे दिसून येत आहे. प्रत्येक पक्ष आपल्या राज्यात जास्तीत जास्त जागांवर निवडणूक लढवण्याचा विचार करत आहे. मात्र, हे शक्य नाही. अशा स्थितीत आघाडीतील पक्षांमध्ये राज्यस्तरावर वाद सुरू झाला आहे.

जागावाटपात काँग्रेससमोर सर्वात मोठी अडचण आणि आव्हान आहे. उत्तर ते दक्षिणेपर्यंत जागावाटपावर विचारमंथन आणि एकमत निर्माण करण्यात ते आतापर्यंत अपयशी ठरले आहेत. गुरुवारी, काँग्रेस नेतृत्वाने राज्य पदाधिकाऱ्यांना सांगितले की, आगामी लोकसभा निवडणुकीत पक्ष २५५ जागांवर लक्ष केंद्रित करेल. म्हणजेच पक्षाने या जागांवर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्या जिंकण्यायोग्य मानतात. मात्र, २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या तुलनेत ही संख्या कमी आहे. काँग्रेसने या जागा जिंकण्याच्या शक्यतेच्या यादीत ठेवल्या आहेत. 

काँग्रेस लवकरच लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर करणार आहे. त्यांनी राज्यांना ही प्रक्रिया तातडीने सुरू करण्यास सांगितले आहे. या प्रक्रियेचा एक भाग म्हणून पक्ष या आठवड्यात प्रत्येक राज्यासाठी स्क्रीनिंग समित्या देखील तयार करेल. त्याचसोबत तातडीनं इंडिया आघाडीच्या सहकाऱ्यांसोबत जागा वाटपावर चर्चा सुरू करेल. काँग्रेसच्या पाच सदस्यीय राष्ट्रीय आघाडी समितीला सर्वसहमतीची जबाबदारी देण्यात आली आहे. ती चर्चा करून सूत्र निश्चित करेल.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने ४२१ जागा लढवल्या आणि ५२ जागा जिंकल्या. काही राज्यांमध्ये काँग्रेसनं आघाडी केली होती. त्यात बिहारमध्ये RJD, महाराष्ट्रात NCP, कर्नाटकात JD(S), झारखंडमध्ये JMM आणि तामिळनाडूमध्ये DMK सोबत काँग्रेस रिंगणात होती. बिहारमध्ये ४० पैकी फक्त ९ जागा, झारखंडमध्ये १४ पैकी ७ जागा, कर्नाटकात २८ पैकी २१, महाराष्ट्रात ४८ पैकी २५ आणि तामिळनाडूत ३९ जागांपैकी ९ जागा काँग्रेसनं लढवल्या. उत्तर प्रदेशात काँग्रेसने ८० पैकी ७० जागा लढवल्या होत्या. 

टॅग्स :congressकाँग्रेसINDIA Opposition Allianceइंडिया आघाडीBiharबिहारMaharashtraमहाराष्ट्रElectionनिवडणूक