शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
5
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
6
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
7
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
8
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
9
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
10
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
11
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
12
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
13
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
14
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
15
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
16
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
17
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
18
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
19
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
20
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!

"निवडणुकीनंतर तिन्ही पक्ष एकत्र येतील", अमित शाहांचा KCR, ओवैसी आणि काँग्रेसवर हल्लाबोल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2023 14:04 IST

telangana assembly elections : तेलंगणातील लोकांचे एक मत या राज्याचे आणि देशाचे भविष्य ठरवेल, असे अमित शाह यांनी सांगितले.

हैदराबाद : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सध्या तेलंगणा दौऱ्यावर आहेत. तेलंगणा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर याठिकाणी पत्रकार परिषदेत घेत अमित शाह यांनी राज्यातील मुख्यमंत्री के. चंद्रशेकर राव यांच्या सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. तसेच, तेलंगणातील लोकांचे एक मत या राज्याचे आणि देशाचे भविष्य ठरवेल, असे अमित शाह यांनी सांगितले.

बीआरएस सरकारमध्ये अनेक घोटाळे झाले. दारू घोटाळा आपल्या सर्वांना माहित आहे. २०२० च्या पूर मदतीतही घोटाळा झाला होता. कोणत्याही सरकारची विश्वासार्हता त्याच्या आश्वासनांची पूर्तता केल्यानंतर ठरवली जाते. बीआरएस सरकारमध्ये पेपरफुटीमुळे रोजगार उपलब्ध होऊ शकला नाही, असे सांगत अमित शाहांनी बीआरएस सरकारवर निशाणा साधला.

आम्ही केसीआर सरकारच्या पाठिंब्याशिवाय अनेक गरीब लोकांसाठी विकास कामे केली. जनसंघापासून ते आतापर्यंत भाजपने दिलेली सर्व आश्वासने पूर्ण केली आहेत. जर तुम्ही काँग्रेसला मत दिले तर ते टीआरएस-बीआरएसकडे जातील. हे सर्व घराणेशाहीला प्रोत्साहन देत आहेत. केसीआर हा 2 जी पक्ष आहे, ओवेसींचा पक्ष 3 जी पक्ष आहे, काँग्रेस 4 जी पक्ष आहे. येथे लोकशाही मूल्यांना स्थान नाही. निवडणुकीपूर्वी सगळे वेगळे होतात आणि निवडणुकीनंतर एकत्र येतात, असा शब्दांत हल्लाबोल अमित शाह यांनी केला.

बीआरएसने आपल्या जाहीरनाम्यात १ लाख नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले होते. तसेच, त्यांच्या सरकारमध्ये ८ पेक्षा जास्त पेपर लीक झाले, भरती होऊ शकली नाही. ४० लाख मुलांना केजी ते पीजीपर्यंत मोफत शिक्षण देणार होते, ते देऊ शकले नाहीत. ७ लाख गरीबांना घरे देण्याचे आश्वासन त्यांनी पूर्ण केले नाही. मात्र, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रयत्न केले. तसेच, बेरोजगारी भत्ता देऊ शकले नाहीत, अनेक विकासकामे करण्याचे आश्वासन दिले होते, मात्र त्या पैशांची उधळपट्टी करण्यात आल्याचे अमित शाह म्हणाले.

पुढे अमित शाह म्हणाले की, मी तेलंगणातील जनतेला योग्य पर्यायाने जाण्याचे आवाहन करतो. मला खात्री आहे की तेलंगणातील जागरूक मतदार प्रत्येक गोष्टीचे अचूक विश्लेषण करतील आणि मतदान करण्यापूर्वी प्रत्येक गोष्टीची पार्श्वभूमी लक्षात ठेवतील. यानंतर त्यांची निवड निश्चितच 'कमळ' असेल, निश्चितच भाजप असेल. आम्ही सत्तेत आल्यास तेलंगणातील धर्मावर आधारित आरक्षणाची व्यवस्था संपुष्टात आणू. तसेच, आम्ही मुस्लिमांसाठी 4 टक्के आरक्षण काढून टाकू आणि त्याऐवजी मागासवर्गीय, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठी ते सुनिश्चित करू, असेही अमित शाह यांनी सांगितले.

याचबरोबर, बीआरएसचा गेल्या १० वर्षांतील एकमेव उपक्रम म्हणजे भ्रष्टाचार! पासपोर्ट घोटाळा, दारू घोटाळा, मियापूर जमीन घोटाळा, कलेश्वरम प्रकल्प घोटाळा आणि बरेच काही…यादी संपत नाही. बीआरएसने राज्यात घोटाळे आणि भ्रष्टाचाराशिवाय काहीही केले नाही, हे तेलंगणातील जनतेला कळले आहे. तेलंगणातील लोक केसीआरच्या तुष्टीकरणाच्या धोरणाला कंटाळले असल्याने आम्ही व्यवस्था ठीक करू, असेही आश्वासन अमित शाह यांनी जनतेला दिले.

टॅग्स :telangana assembly electionतेलंगणा विधानसभा निवडणूक २०२३BJPभाजपाAmit Shahअमित शाह