शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

Telangana Election 2023 : तेलंगणात काँग्रेसला बहुमत मिळणार? आमदारांना बंगळुरूला पाठवण्याची तयारी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2023 9:39 AM

अनेक एक्झिट पोलमध्ये राज्यात काँग्रेसला बहुमत मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. बहुमत मिळाल्यास काँग्रेस राज्यात सरकार स्थापन करू शकते.

तेलंगणा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ३० नोव्हेंबरला मतदान झाले. याचा निकाल आता ३ डिसेंबरला जाहीर होणार आहे. दरम्यान, एक्झिट पोलनुसार, काँग्रेसलातेलंगणात स्पष्ट बहुमत मिळत असल्याचे दिसत आहे. असे असतानाही काँग्रेस हायकमांड अलर्ट मोडमध्ये आहे. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, काँग्रेस तेलंगणात निवडून आलेले आपले आमदार बंगळुरू किंवा इतर कोणत्याही शहरात पाठवण्याचा विचार करत आहे, जेणेकरून घोडेबाजार टाळता येईल. 

२०१४ मध्ये तेलंगणा राज्याची निर्मिती झाली, तेव्हापासून याठिकाणी बीआरएसची सत्ता आहे. तेलंगणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष रेवंत रेड्डी यांना राज्यात काँग्रेसच्या विजयाचा विश्वास आहे. मात्र, आमदारांना सध्या इतर ठिकाणी हलवण्याचा पक्षाचा विचार नसून रविवारी निकाल जाहीर झाल्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल, असे सूत्रांच्या हवाल्याने सांगितले जात आहे. या संदर्भात आणखी एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले की, राज्यात काँग्रेसला जवळपास ७० जागा मिळाल्या आल्या नाहीत, तर आमदारांना बंगळुरू किंवा इतर कोणत्याही शहरात पाठवण्याचा प्रस्ताव आहे. अशा परिस्थितीत या लोकांना इथल्या हॉटेल किंवा रिसॉर्टमध्येही राहता येईल. 

तेलंगणा विधानसभेत एकूण ११९ जागा आहेत. त्याचबरोबर, सरकार स्थापन करण्यासाठी ६० जागांची आवश्यकता आहे. अनेक एक्झिट पोलमध्ये राज्यात काँग्रेसला बहुमत मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. बहुमत मिळाल्यास काँग्रेस राज्यात सरकार स्थापन करू शकते. त्यामुळे विजयानंतर आमदारांना कुठल्यातरी गुप्त ठिकाणी पाठवले जाऊ शकते. तसेच, यामध्ये कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार महत्त्वाची भूमिका बजावू शकतात, असे म्हटले जात आहे. 

डीके शिवकुमार बजावणार महत्त्वाची भूमिका याआधीही डीके शिवकुमार यांनी आमदारांना शिफ्ट करण्याची भूमिका बजावली आहे. कर्नाटकमध्ये २०१८ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत फ्लोर टेस्ट दरम्यान, काँग्रेस आणि जनता दल (एस) च्या आमदारांना सुरक्षित स्थळी पाठवण्यात आले होते. इंडिया टीव्ही सीएनएक्सनुसार, तेलंगणात काँग्रेसला ६३-७९ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर बीआरएसला ३१-४७, भाजपला २-४ आणि एमआयएमआयएमला ५-७ जागा मिळण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :congressकाँग्रेसtelangana assembly electionतेलंगणा विधानसभा निवडणूक २०२३Telanganaतेलंगणाexit pollमतदानोत्जतर जनमत चाचणी