शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
5
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
6
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
7
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
8
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
9
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
10
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
11
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
12
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
13
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
14
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
15
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
16
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
17
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
18
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
19
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
20
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  

शिक्षक की वैरी?... गृहपाठ केला नाही म्हणून विद्यार्थिनीला 168 वेळा थोबाडीत मारलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2018 18:08 IST

एका सरकारी शाळेत 12 वर्षीय विद्यार्थिनीने गृहपाठ न केल्याने शिक्षकाने अमानुषपणे शिक्षा दिल्याची घटना समोर आली आहे.

झाबुआ-  मध्य प्रदेशातील आदिवासी बहुल झाबुआ जिल्हातील एका सरकारी शाळेत 12 वर्षीय विद्यार्थिनीने गृहपाठ न केल्याने शिक्षकाने अमानुषपणे शिक्षा दिल्याची घटना समोर आली आहे. गृहपाठ न केल्याने वर्गातीलच मुलींकडून सहा दिवस सतत या 12 वर्षीय मुलीला 168 वेळा थोबाडीत मारण्यात आल्या. विद्यार्थिनीच्या वडिलांनी शाळेच्या मुख्याध्यापकांकडे या प्रकरणी तक्रार केली आहे. 

जिल्हा मुख्यालयापासून 34 किलोमीटर अंतरावर थांदला तहसील मुख्यालयाजवळ जवाहर नवोदय विद्यालयातील सहावीच्या वर्गात शिकणारी ही मुलगी आहेत. अनुष्का सिंह असं तिचं नाव असून तिचे वडील शिवप्रताप सिंह यांनी तीन दिवस आधी या प्रकरणाची तक्रार शाळेच्या मुख्याध्यापकांकडे केली. मुलीची तब्येत ठिक नसल्याने तिला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं लागतं ज्यामुळे ती अभ्यास मागे पडली आहे. 

आजारपणातून बरी झाल्यानंतर अनुष्का 11 जानेवारी रोजी पुन्हा शाळेत गेली. त्यादिवशी गृहपाठ न केल्याने विज्ञान विषयाचे शिक्षक मनोज कुमार वर्मा यांनी अनुष्काच्या गालावर तिच्या वर्गातील 14 मुलींना 11 ते 16 जानेवारी म्हणजेच सहा दिवस रोज 2-2 थोबाडीत मारायला सांगितल्या. या मारहाणीमुळे अनुष्काला मानसिक आणि शारीरिक धक्का बसला असून ती पुन्हा आजारी पडली. शिक्षकाच्या या कृत्यामुळे अनुष्का घाबरली असून तिला शाळेत जायलाही भीती वाटते आहे. अनुष्कावर थांदलाच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. अनुष्काच्या वडिलांनी ही संपूर्ण माहिती दिली आहे. 

पीडित मुलीच्या वडिलांकडून याप्रकरणी तक्रार करण्यात आली. मेडिकल तपासात मुलीला जखम झाल्याचं आढळून आलं नाही. पण तिच्या वर्गातील मुलींनी या घटनेला दुजोरा दिला आहे, अशी माहिती थांदला पोलीस स्टेशनचे प्रभारी निरीक्षक एसएल बघेल यांनी दिली. यामध्ये सगळ्यात धक्कादायक म्हणजे शाळेचे मुख्याध्यापक के. सागर यांनी शिक्षकाचा बचाव करत या शिक्षेला फ्रेंडली शिक्षा म्हंटलं आहे. जी मुलं अभ्यासात मागे असतात त्यांना विद्यालया नियमांनुसार शिक्षक शिक्षा देऊ शकत नाही. मुलीमध्ये सुधारण व्हावी म्हणून शिक्षक वर्माने इतर मुलींना सांगून तिला शिक्षा दिली. पण इतर मुलींनी तिला जोरात मारलं नाही. ही एक फ्रेंडली शिक्षा आहे पण तरीही या प्रकरणावर लक्ष दिलं जाईल. मुलीच्या पालकांना बोलावून याविषयावर चर्चा केली जाईल, असं स्पष्टीकरण शाळेचे मुख्याध्यापक के.सागर यांनी दिलं. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशStudentविद्यार्थीSchoolशाळाCrimeगुन्हा