शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे संपवली, पण कोणत्याही पंतप्रधानांनी मदत केली नाही," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
वैभव खेडेकरांच्या BJP प्रवेशाचा मुहूर्त मिळेना; कार्यकर्त्यांसह मुंबई गाठली पण पक्षप्रवेश नाही
3
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
4
भारताने जिंकलेल्या १९८३ वर्ल्डकप फायनलमधील पंच डिकी बर्ड यांचे ९२व्या वर्षी निधन
5
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
6
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
7
GST कपातीनंतर आता एवढी स्वस्त झालीय ५ स्टार रेटिंग असलेली Tata Punch; जाणून घ्या, कोण कोणत्या कारला देते टक्कर?
8
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
9
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
10
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
11
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
12
चिंताजनक! लहानपणीच्या 'या' छोट्याशा निष्काळजीपणामुळे ५०% वाढतो हृदयरोगाचा धोका
13
गुंडांना आवरा अन्यथा धडा शिकवू, ज्येष्ठ कार्यकर्त्याशी झालेल्या गैरवर्तनावरून काँग्रेसचा भाजपाला इशारा
14
मुलीने पुण्यात मैत्रिणीसोबत बांधली लग्नाची गाठ; आई वडिलांनी लपवून दुसऱ्यांदा तरुणासोबत लावलं लग्न
15
महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांचा फोटो काढून जिंकू शकता ५ लाख ! कुठे करायचा अपलोड, काय आहे योजना?
16
"फरहानच्या AK47 वर अभिषेक-गिलचं 'ब्रह्मास्त्र' पडलं भारी.."; पाकिस्तानी क्रिकेटरनेच सुनावलं
17
जिच्याशी अफेअर त्या नर्सलाच डॉक्टरने ठार मारले, आधी नशेचं इंजेक्शन दिलं, मग कारखाली चिरडलं  
18
National Film Award: पांढरे केस, गॉगल आणि सूटबूट! राष्ट्रीय पुरस्कारासाठी शाहरुखचा लूक, 'त्या' कृतीने जिंकली मनं
19
वडिलांना आणि भावाला अडकण्यासाठी मुलीने रचला भयानक कट; बॉयफ्रेंडच्या मित्राची हत्या केली अन्...
20
“राज्यातील रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी १२९६.०५ कोटींचा निधी”: शिवेंद्रसिंहराजे भोसले

देशात 'टॅक्स' दहशतवाद, चक्रव्यूह...; विरोधी पक्षनेते राहुल गांधींचा लोकसभेत हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2024 14:56 IST

संसदेच्या अर्थसंकल्पावर चर्चेवेळी राहुल गांधी यांनी बजेटवरील मुद्द्यांना हात घालत मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला. 

नवी दिल्ली - संसदेच्या अधिवेशनात लोकसभेतील विरोधी पक्षनेते काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी शेतकरी, पेपर लीक, देशातील दहशतीचं सावट, बजेट आणि टॅक्सबाबत विविध मुद्द्यांवर मोदी सरकारला घेरलं. देशात दहशतीचं सावट आहे. भाजपामध्येही लोक घाबरलेले आहेत. मंत्री घाबरलेत, देशातील शेतकरी भीतीच्या सावटाखाली आहे असं सांगत राहुल गांधी यांनी महाभारतातील चक्रव्यूहाचा उल्लेख करत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. 

२१ व्या शतकात नवं चक्रव्यूह

२१ व्या शतकात नवं चक्रव्यूह असून तेही कमळाच्या आकाराचे आहे. ज्या चक्रव्यूहात अभिमन्यूला अडकवलं होतं. तिथे आता हिंदुस्तानातील जनता आहे. देशातील युवा, शेतकरी, माता-भगिनी, लघु-मध्यम उद्योजक अडकले आहेत. या चक्रव्यूहचं चिन्ह पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या छातीवर लावून फिरतात. महाभारतातील चक्रव्यूहात ६ जण होते, द्रोणाचार्य, कर्ण, कृपाचार्य, क्रूतवर्मा, अश्वधामा आणि शकुनी नियंत्रित करत होते. आजही ६ लोक आहेत ज्यात नरेंद्र मोदी, अमित शाह, मोहन भागवत, अजित डोवाल आणि अंबानी-अदानी आहेत असा आरोप राहुल गांधींनी केला.

टॅक्स टेररिज्म रोखण्यासाठी...

बजेटवरील भाषणात राहुल गांधी यांनी निर्मला सीतारामन यांच्यावर प्रश्न विचारत त्यांच्या बजेटमध्ये पेपर लीकवर एकही शब्द नव्हता. शिक्षण क्षेत्रासाठी यावेळच्या बजेटमध्ये सर्वाधिक कमी निधी देण्यात आला. २० वर्षात पहिल्यांदा इतका कमी निधी शिक्षण खात्याला दिला. टॅक्स टेररिज्म रोखण्यासाठी बजेटमध्ये सरकारने काहीच केले नाही. मध्यमवर्गीयांच्या पाठीत आणि छातीत खंजीर खुपसण्याचं काम सरकारने केले. याच मध्यमवर्गीयांनी पंतप्रधान मोदींच्या सांगण्यावरून कोविड काळात थाळ्या वाजवल्या, मोबाईल फ्लॅश लाईट लावली. आता हे मध्यमवर्गीय काँग्रेसकडे येतायेत. आम्ही तुमचा चक्रव्यूह तोडणार असा घणाघात राहुल गांधी यांनी केला.

अग्निवीरांसाठी एक रुपयाही नाही

बजेटमध्ये सरकारने अग्निवीर योजनेसाठी एक रुपयाही दिला नाही. त्यांच्या पेन्शनसाठी पैसे नाहीत. अग्निवीर चक्रव्यूहात अडकला आहे. बजेटमध्ये इंटर्नशिप प्रोग्रॅम खेळ बनला आहे. युवकांना रोजगार नाही. रोजगार देणाऱ्यांवर चक्रव्यूह हल्ला करते असा आरोप राहुल गांधींनी केला.

अंबानी-अदानींचं नाव घेतल्यानं गोंधळ

राहुल गांधी सातत्याने त्यांच्या भाषणात अंबानी अदानी यांचं नाव घेत हे दोघं देशातील उद्योगाला नियंत्रित करतात असा आरोप केला. अंबानी अदानी यांचं नाव सभागृहात घेतल्याने लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी राहुल गांधींना रोखलं. त्यावर मी त्यांना A1, A2 बोलू शकतो का? असा प्रतिसवाल राहुल गांधींनी केला त्यानंतर सभागृहात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात गोंधळ उडाला.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदीBudgetअर्थसंकल्प 2024