शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

देशात 'टॅक्स' दहशतवाद, चक्रव्यूह...; विरोधी पक्षनेते राहुल गांधींचा लोकसभेत हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2024 14:56 IST

संसदेच्या अर्थसंकल्पावर चर्चेवेळी राहुल गांधी यांनी बजेटवरील मुद्द्यांना हात घालत मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला. 

नवी दिल्ली - संसदेच्या अधिवेशनात लोकसभेतील विरोधी पक्षनेते काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी शेतकरी, पेपर लीक, देशातील दहशतीचं सावट, बजेट आणि टॅक्सबाबत विविध मुद्द्यांवर मोदी सरकारला घेरलं. देशात दहशतीचं सावट आहे. भाजपामध्येही लोक घाबरलेले आहेत. मंत्री घाबरलेत, देशातील शेतकरी भीतीच्या सावटाखाली आहे असं सांगत राहुल गांधी यांनी महाभारतातील चक्रव्यूहाचा उल्लेख करत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. 

२१ व्या शतकात नवं चक्रव्यूह

२१ व्या शतकात नवं चक्रव्यूह असून तेही कमळाच्या आकाराचे आहे. ज्या चक्रव्यूहात अभिमन्यूला अडकवलं होतं. तिथे आता हिंदुस्तानातील जनता आहे. देशातील युवा, शेतकरी, माता-भगिनी, लघु-मध्यम उद्योजक अडकले आहेत. या चक्रव्यूहचं चिन्ह पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या छातीवर लावून फिरतात. महाभारतातील चक्रव्यूहात ६ जण होते, द्रोणाचार्य, कर्ण, कृपाचार्य, क्रूतवर्मा, अश्वधामा आणि शकुनी नियंत्रित करत होते. आजही ६ लोक आहेत ज्यात नरेंद्र मोदी, अमित शाह, मोहन भागवत, अजित डोवाल आणि अंबानी-अदानी आहेत असा आरोप राहुल गांधींनी केला.

टॅक्स टेररिज्म रोखण्यासाठी...

बजेटवरील भाषणात राहुल गांधी यांनी निर्मला सीतारामन यांच्यावर प्रश्न विचारत त्यांच्या बजेटमध्ये पेपर लीकवर एकही शब्द नव्हता. शिक्षण क्षेत्रासाठी यावेळच्या बजेटमध्ये सर्वाधिक कमी निधी देण्यात आला. २० वर्षात पहिल्यांदा इतका कमी निधी शिक्षण खात्याला दिला. टॅक्स टेररिज्म रोखण्यासाठी बजेटमध्ये सरकारने काहीच केले नाही. मध्यमवर्गीयांच्या पाठीत आणि छातीत खंजीर खुपसण्याचं काम सरकारने केले. याच मध्यमवर्गीयांनी पंतप्रधान मोदींच्या सांगण्यावरून कोविड काळात थाळ्या वाजवल्या, मोबाईल फ्लॅश लाईट लावली. आता हे मध्यमवर्गीय काँग्रेसकडे येतायेत. आम्ही तुमचा चक्रव्यूह तोडणार असा घणाघात राहुल गांधी यांनी केला.

अग्निवीरांसाठी एक रुपयाही नाही

बजेटमध्ये सरकारने अग्निवीर योजनेसाठी एक रुपयाही दिला नाही. त्यांच्या पेन्शनसाठी पैसे नाहीत. अग्निवीर चक्रव्यूहात अडकला आहे. बजेटमध्ये इंटर्नशिप प्रोग्रॅम खेळ बनला आहे. युवकांना रोजगार नाही. रोजगार देणाऱ्यांवर चक्रव्यूह हल्ला करते असा आरोप राहुल गांधींनी केला.

अंबानी-अदानींचं नाव घेतल्यानं गोंधळ

राहुल गांधी सातत्याने त्यांच्या भाषणात अंबानी अदानी यांचं नाव घेत हे दोघं देशातील उद्योगाला नियंत्रित करतात असा आरोप केला. अंबानी अदानी यांचं नाव सभागृहात घेतल्याने लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी राहुल गांधींना रोखलं. त्यावर मी त्यांना A1, A2 बोलू शकतो का? असा प्रतिसवाल राहुल गांधींनी केला त्यानंतर सभागृहात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात गोंधळ उडाला.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदीBudgetअर्थसंकल्प 2024