शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

देशात 'टॅक्स' दहशतवाद, चक्रव्यूह...; विरोधी पक्षनेते राहुल गांधींचा लोकसभेत हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2024 14:56 IST

संसदेच्या अर्थसंकल्पावर चर्चेवेळी राहुल गांधी यांनी बजेटवरील मुद्द्यांना हात घालत मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला. 

नवी दिल्ली - संसदेच्या अधिवेशनात लोकसभेतील विरोधी पक्षनेते काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी शेतकरी, पेपर लीक, देशातील दहशतीचं सावट, बजेट आणि टॅक्सबाबत विविध मुद्द्यांवर मोदी सरकारला घेरलं. देशात दहशतीचं सावट आहे. भाजपामध्येही लोक घाबरलेले आहेत. मंत्री घाबरलेत, देशातील शेतकरी भीतीच्या सावटाखाली आहे असं सांगत राहुल गांधी यांनी महाभारतातील चक्रव्यूहाचा उल्लेख करत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. 

२१ व्या शतकात नवं चक्रव्यूह

२१ व्या शतकात नवं चक्रव्यूह असून तेही कमळाच्या आकाराचे आहे. ज्या चक्रव्यूहात अभिमन्यूला अडकवलं होतं. तिथे आता हिंदुस्तानातील जनता आहे. देशातील युवा, शेतकरी, माता-भगिनी, लघु-मध्यम उद्योजक अडकले आहेत. या चक्रव्यूहचं चिन्ह पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या छातीवर लावून फिरतात. महाभारतातील चक्रव्यूहात ६ जण होते, द्रोणाचार्य, कर्ण, कृपाचार्य, क्रूतवर्मा, अश्वधामा आणि शकुनी नियंत्रित करत होते. आजही ६ लोक आहेत ज्यात नरेंद्र मोदी, अमित शाह, मोहन भागवत, अजित डोवाल आणि अंबानी-अदानी आहेत असा आरोप राहुल गांधींनी केला.

टॅक्स टेररिज्म रोखण्यासाठी...

बजेटवरील भाषणात राहुल गांधी यांनी निर्मला सीतारामन यांच्यावर प्रश्न विचारत त्यांच्या बजेटमध्ये पेपर लीकवर एकही शब्द नव्हता. शिक्षण क्षेत्रासाठी यावेळच्या बजेटमध्ये सर्वाधिक कमी निधी देण्यात आला. २० वर्षात पहिल्यांदा इतका कमी निधी शिक्षण खात्याला दिला. टॅक्स टेररिज्म रोखण्यासाठी बजेटमध्ये सरकारने काहीच केले नाही. मध्यमवर्गीयांच्या पाठीत आणि छातीत खंजीर खुपसण्याचं काम सरकारने केले. याच मध्यमवर्गीयांनी पंतप्रधान मोदींच्या सांगण्यावरून कोविड काळात थाळ्या वाजवल्या, मोबाईल फ्लॅश लाईट लावली. आता हे मध्यमवर्गीय काँग्रेसकडे येतायेत. आम्ही तुमचा चक्रव्यूह तोडणार असा घणाघात राहुल गांधी यांनी केला.

अग्निवीरांसाठी एक रुपयाही नाही

बजेटमध्ये सरकारने अग्निवीर योजनेसाठी एक रुपयाही दिला नाही. त्यांच्या पेन्शनसाठी पैसे नाहीत. अग्निवीर चक्रव्यूहात अडकला आहे. बजेटमध्ये इंटर्नशिप प्रोग्रॅम खेळ बनला आहे. युवकांना रोजगार नाही. रोजगार देणाऱ्यांवर चक्रव्यूह हल्ला करते असा आरोप राहुल गांधींनी केला.

अंबानी-अदानींचं नाव घेतल्यानं गोंधळ

राहुल गांधी सातत्याने त्यांच्या भाषणात अंबानी अदानी यांचं नाव घेत हे दोघं देशातील उद्योगाला नियंत्रित करतात असा आरोप केला. अंबानी अदानी यांचं नाव सभागृहात घेतल्याने लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी राहुल गांधींना रोखलं. त्यावर मी त्यांना A1, A2 बोलू शकतो का? असा प्रतिसवाल राहुल गांधींनी केला त्यानंतर सभागृहात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात गोंधळ उडाला.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदीBudgetअर्थसंकल्प 2024