शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

'टाटा' भारताची शान; गेल्या 100 वर्षांत केलं सर्वाधिक दान, जमशेदजी टाटा ठरले 'जगात भारी' परोपकारी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2021 19:19 IST

Tata Group Founder Jamsetji Tata : जमशेदजी टाटा यांनी गेल्या 100 वर्षांत तब्बल 102 बिलियन डॉलर्सचं दान दिलं आहे. टाटा यांनी प्रामुख्याने आरोग्य आणि शिक्षणासाठी मोठे दान दिले आहे.  

नवी दिल्ली - देश कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत आहे. या संकटात टाटा समूह देशाच्या मदतीसाठी पुन्हा एकदा धावून आला आहे. टाटा समूहाच्या कंपन्या काही रक्कम गोळा करत आहेत, ज्यातून हॉस्पिटल बेड्स, ऑक्सिजन पुरवठा आणि आपल्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण या गोष्टी सहजरित्या शक्य होतील. टाटा ट्रस्टचे अध्यक्ष रतन टाटा आणि टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांच्या पुढाकाराने 'नो लिमिट' (अमर्यादित) मदतीची एक योजना आखली आहे. टाटा समूह या योजनेसाठी तब्बल 2000 कोटी रुपये खर्च करणार आहे. याच दरम्यान टाटा समुहाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. गेल्या 100 वर्षांत सर्वाधिक दान करून जमशेदजी टाटा 'जगात भारी' परोपकारी ठरले आहेत. 

गेल्या 100 वर्षांच्या दानशूर लोकांच्या यादीत टाटा समुहाचे संस्थापक जमशेदजी टाटा (Jamsetji Tata) हे प्रथम स्थानी आहेत. हुरुन रिपोर्ट आणि एडेलगिव फाउंडेशनच्या वतीने दान करणाऱ्या ट़ॉप 50 लोकांची एक यादी तयार करण्यात आली आहे. जमशेदजी टाटा यांनी गेल्या 100 वर्षांत तब्बल 102 बिलियन डॉलर्सचं दान दिलं आहे. टाटा यांनी प्रामुख्याने आरोग्य आणि शिक्षणासाठी मोठे दान दिले आहे. टाटा समुहाचे संस्थापक जमशेदजी टाटा यांनी 1892 पासून दिलेल्या मोठ्या देणग्यांचा या रिपोर्टमध्ये समावेश करण्यात आला आहे. दानशूर लोकांच्या यादीमध्ये टाटा यांनी बिल गेट्स, वॉरेन बफे यांना देखील मागे टाकले आहे. भारतातील मोठ्या दानशूर व्यक्तींमध्ये विप्रोचे अजीम प्रेमजी यांचाही समावेश आहे. 

अवघ्या टाटा समुहाला दानशूरपणाचा वसा देऊन गेले, अल्पायुषी सर रतन टाटा...

सर रतन टाटा यांना टाटा समुहाच्या समाजसेवेचे रतन म्हटले तर वावगे ठरणार नाही. ते जमशेदजी टाटा यांचे धाकटे पूत्र आणि नवल टाटा यांचे वडील होत. म्हणजेच सध्याचे टाटा समुहाचे अध्यक्ष रतन नवल टाटा यांचे आजोबा. अशा या समाजसेवेचे व्रत अंगी असलेल्या सर रतन टाटा यांना अल्पायुष्यच लाभले, मात्र त्यांनी तेवढ्या आयुष्यातही एवढी मोठी कामे केली आणि टाटा समुहासाठी मोठी संपत्ती सोडून गेले. जेव्हा महात्मा गांधींनी आफ्रिकेमध्ये वर्णवादाविरोधात आंदोलन केले तेव्हा त्या आंदोलनाला टाटा यांनी 1.25 लाख रुपयांची मदत केली होती. ते स्वातंत्र सैनिक व समाज सुधारक गोपाळ कृष्ण गोखले यांचे मित्र होते. त्यांनी गोखले यांच्या कामांसाठीदेखील दहा वर्षे प्रत्येकी 10000 रुपयांची मदत दिली होती. 

लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्समध्ये गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी दरवर्षी 400 पाऊंडची मदत देत होते. या चेअरला आता 'सर रतन टाटा फाउंडेशन' चे नाव देण्यात आले आहे. 1913 ते 1917 मध्ये पाटलिपुत्र (पटना)मध्ये पहिली पुरातत्व खोदकाम होणार होते. यासाठी त्यांनी पैशांची मदत केली. या खोदकामात सम्राट 100 स्तंभांचा मौर्यकालीन दरबार सापडला होता. बॉम्बे नगर निगमद्वारे सुरु केलेल्या किंग जॉर्ज पंचम अँटी ट्यूबरक्युलॉसिस लीगसाठी दहावर्षांपर्यंत 10000 रुपये दान केले. अवघ्या टाटा समुहाला समाजसेवेचा वसा शिकविणाऱे थोर रतनजी हे अल्पायुषी ठरले. 5 सप्टेंबर 1918 मध्ये त्यांचे इंग्लंडमध्ये निधन झाले. त्यांच्या मृत्यूपत्रानुसार त्यांची बहुतांश संपत्ती समाजोपयोगी कामासाठी दान देम्यात आली. यानंतर 1919 मध्ये 80 लाख रुपयांचा फंड देऊन सर रतन टाटा ट्रस्टची स्थापना करण्यात आली.

 

टॅग्स :Ratan Tataरतन टाटाIndiaभारत