शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

हृदयद्रावक! IAS अधिकारी बनून आई-वडिलांचं नाव मोठं करण्याचं तान्याचं होतं स्वप्न पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2024 12:03 IST

Delhi Coaching Incident: तान्याच्या मृत्यूनंतर तिच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. आयएएस अधिकारी बनून आपल्या आई-वडिलांचं नाव मोठं करण्याचं तान्याचं स्वप्न होतं.

आयएएस होण्याचं स्वप्न उराशी बाळगणाऱ्या बिहारच्या औरंगाबादमधील एका तरुणीचा दिल्लीतील पावसामध्ये मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. राव आयएएस स्टडी सेंटरच्या बेसमेंटमध्ये पाणी साचल्याने तिच्या बुडून मृत्यू झाला. या दुर्घटेनेत तीन जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यात औरंगाबाद जिल्ह्यातील नबीनगर नगर पंचायत क्षेत्रातील विजय सोनी यांची २४ वर्षीय मुलगी तान्या सोनी हिचाही समावेश आहे.

मुलगी तान्याच्या मृत्यूनंतर तिच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. आयएएस अधिकारी बनून आपल्या आई-वडिलांचं नाव मोठं करण्याचं तान्याचं स्वप्न होतं.  तान्या दिल्लीतील राव कोचिंग सेंटरमध्ये आयएएसची तयारी करत होती. शनिवारी संध्याकाळी तान्या लायब्ररीत बसून मैत्रिणींसोबत अभ्यास करत होती. त्याचवेळी पाणी शिरलं आणि त्यात बुडून तिचा मृत्यू झाला.

तान्याचे आजोबा गोपाल प्रसाद सोनी यांनी दिलेल्या माहितीनुसार, तान्या गेल्या दीड वर्षांपासून दिल्लीत राहून आयएएसची तयारी करत होती. तिचे वडील विजय सोनी हे तेलंगणात इंजिनिअर आहेत. तान्या हिला आदित्य सोनी हा एक लहान भाऊ आणि पलक सोनी ही धाकटी बहीण आहे. 

तान्याच्या मृत्यूची बातमी विविध चॅनलवरून प्रसारित झाल्यावर नातेवाईकांना मोठा धक्का बसला. तसेच तिच्या घराबाहेर लोकांची मोठी गर्दी झाली. तान्याने २०२०-२०२१ मध्ये डीयूच्या महाराजा अग्रसेन कॉलेजमधून पदवी प्राप्त केली होती. दिल्लीत ती वसुंधरा एन्क्लेव्हमधील पीजीमध्ये राहत होती. दीड महिन्यापूर्वीच तिने राव आयएएस कोचिंग सेंटरमध्ये प्रवेश घेतला होता, आयएएस होण्याचं तिचं स्वप्न होतं. 

टॅग्स :delhiदिल्लीRainपाऊस