शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
9
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
10
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
11
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
12
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
13
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
14
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
15
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
16
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
17
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
18
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
19
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
20
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार

भाजपविरोधी पक्षांची ऐक्यासाठी चर्चा सुरू, चंद्राबाबू नायडू-राहुल गांधी भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2019 7:02 AM

लोकसभेच्या २७२ जागा भाजपला मिळणार नाहीत आणि त्यामुळे त्या पक्षाला अन्य लहान पक्षांची मदत घ्यावी लागेल, अशी शक्यता वर्तविली जात असल्याने, सावधगिरीचे पाऊल म्हणून काँग्रेस व मित्रपक्ष सक्रिय झाले आहेत.

- हरिश गुप्ता/संतोष ठाकूरनवी दिल्ली - लोकसभेच्या २७२ जागा भाजपला मिळणार नाहीत आणि त्यामुळे त्या पक्षाला अन्य लहान पक्षांची मदत घ्यावी लागेल, अशी शक्यता वर्तविली जात असल्याने, सावधगिरीचे पाऊल म्हणून काँग्रेस व मित्रपक्ष सक्रिय झाले आहेत. तेलगू देसमचे प्रमुख व आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी बुधवारी दिल्लीत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली. त्यानंतर, लगेचच ते पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या भेटीसाठी कोलकात्याला रवाना झाले.राजकीय निरीक्षक व सट्टा बाजाराने भाजपला २७२ हा जादुई आकडा गाठता येणार नाही, असे मत वर्तविले आहे. दुसरीकडे प्रसंगी अन्य पक्षांचा पाठिेंबा आम्ही मिळवू शकतो, असे भाजपचे सरचिटणीस राम मोहन व खा. सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटले आहे. त्यामुळे विरोधक सावध झाले आहेत.राहुल गांधी व चंद्राबाबू यांच्यात काय चर्चा झाली, ते समजू शकले नाही. मात्र, सत्ताधारी रालोआमध्ये नसलेल्या पक्षांच्या नेत्यांनी २३ मे रोजी सरकार स्थापनेसाठी एकत्र यावे, असा चंद्राबाबू यांचा प्रयत्न आहे. काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळण्याची शक्यता असल्याने, त्या पक्षाने त्यासाठी पुढाकार घ्यावा आणि स्थिर सरकारसाठी प्रयत्न सुरू करावेत, अशी त्यांची इच्छा आहे.काँग्रेसने समाजवादी पक्षाशीही चर्चा सुरू केल्याचे समजते. प्रियांका गांधी यांनी सपचे संस्थापक मुलायम सिंह यादव यांची भेट घेऊ न त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली, पण निवडणुकांनंतर सपने काँग्रेससोबत यावे, असे प्रियांका यांचे प्रयत्न आहेत. सप व काँग्रेस यापूर्वी एकत्र आले होते. त्यामुळे त्यांना पुन्हा एकत्र येण्यात अडचण येणार नाही, असे काँग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे.उत्तर प्रदेशात सप व बसप तसेच राष्ट्रीय लोक दल यांची आघाडी असून, त्यांनी सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्याविरोधात उमेदवार उभे केलेले नाहीत. बसपच्या नेत्या मायावती काँग्रेससोबत उघडपणे येतील का, याविषयी शंका असली तरी सप व राष्ट्रीय लोक दल यांचा काँग्रेसला पाठिंबा मिळू शकेल, असे सांगण्यात येते.याशिवाय काँग्रेसचे नेते सध्या ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्या संपर्कात आहेत. त्यांनी पटनायक यांच्याशी चर्चा केल्याचे कळते. ओडिशामध्ये भाजपचे प्रस्थ वाढू देण्यापेक्षा काँग्रेसला पाठिंबा देणे बिजू जनता दलाला सोयीचे आहे. भाजपही त्यांच्या संपर्कात आहेत. चक्रीवादळानंतर तिथे पाहणी करण्यासाठी गेलेल्या पंतप्रधान मोदी यांनी उघडपणे पटनायक यांचे कौतुक केले होते. तसेच ओडिशात मदत व पुनर्वसन कार्यासाठी एक हजार कोटीही त्यांनी जाहीर केले. पटनायक यांना खुश ठेवण्यासाठीच हे केल्याचे समजते.रेड्डी, रावनाही सोबत घ्यामतदान आटोपताच काँग्रेसने वायएसआर काँग्रेसचे जगनमोहन रेड्डी, तेलंगणा राष्ट्र समितीचे के. चंद्रशेखर राव यांनाही सोबत घेण्यासाठी प्रयत्न करावेत, असे चंद्राबाबूंचे म्हणणे आहे. टीआरएसचे प्रमुख राव बिगरभाजप व बिगरकाँग्रेस प्रादेशिक पक्षांची आघाडीच्या प्रयत्नात आहेत. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकChandrababu Naiduचंद्राबाबू नायडूRahul Gandhiराहुल गांधी