शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
2
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
3
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
4
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
5
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
6
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
7
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
8
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
9
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
10
एअर इंडियाचं विमान कोसळलं! लंडनच्या प्रवासाचं तिकीट किती होतं? आकडा वाचून धक्का बसेल
11
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
12
Sonam Raghuvanshi : "मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन..."; बॉयफ्रेंड राजनेच केली सोनमची पोलखोल
13
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
14
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
15
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
16
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
17
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
18
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
19
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
20
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?

प्रभू रामाचे नाव काय पाकिस्तानात घ्यायचे? अमित शहा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2019 05:55 IST

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमध्ये लोकांना जय श्रीरामच्या घोषणा देण्यास बंदी केली आहे. प्रभू रामचंद्राचे नाव जर भारतात घ्यायचे नाही तर काय पाकिस्तानात घ्यायचे असा सवाल भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी मंगळवारी केला.

घटाल : मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमध्ये लोकांना जय श्रीरामच्या घोषणा देण्यास बंदी केली आहे. प्रभू रामचंद्राचे नाव जर भारतात घ्यायचे नाही तर काय पाकिस्तानात घ्यायचे असा सवाल भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी मंगळवारीकेला.येथील प्रचारसभेत ते म्हणाले की, लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी पश्चिम बंगालमध्ये आम्ही निवडणुका लढवत आहोत. या राज्यातील ४२ पैकी २३ लोकसभा जागांवर भाजपला विजय मिळेल, अशी आमची खात्री आहे. प्रभू रामचंद्र हे भारतीय संस्कृतीचे अभिन्न अंग आहे. त्यांच्या नावाचा जयजयकार करणाऱ्यांना एखादा राजकीय नेता कसा काय रोखू शकतो?या राज्यातील पश्चिम मिदनापूर जिल्ह्यातून ममता बॅनर्जी यांच्या गाड्यांचा ताफा चाललेला असताना तो अडवण्याचा प्रयत्न भाजप कार्यकर्त्यांनी केला. ते जय श्रीरामच्या घोषणा देत होते. ममता बॅनर्जी यांनी गाडी थांबवून त्या लोकांना तिथून पिटाळून लावले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवल्याबद्दल पोलिसांनी त्या कार्यकर्त्यांना अटक केली. त्या प्रकाराचा लाभ घेण्याचा प्रयत्न भाजप करीत आहे.एनआरसी राबविणारअमित शहा म्हणाले की, गेल्या पाच वर्षांत नरेंद्र मोदी सरकारने पश्चिम बंगालला ४,२४,८०० कोटी रुपये मंजूर केले. मात्र हा पैसा जनतेपर्यंत न पोहोचता तो काही विशिष्ट लोकांच्या खिशात गेला आहे. याआधीच्या यूपीए-२ सरकारने पाच वर्षामध्ये पश्चिम बंगालला फक्त १,३२,००० कोटी रुपये दिले होते. बांग्लादेशी घुसखोरांना देशाबाहेर हुसकून लावण्यासाठी पश्चिम बंगालमध्ये नॅशनल रजिस्टर आॅफ सिटिझन्स (एनआरसी) योजना राबविण्यावर भाजप ठाम आहे. ईशान्य भारतात मोदी सरकारतर्फे ही योजना राबविली जात असताना त्याला ममता बॅनर्जी व अन्य विरोधी पक्षांच्या नेत्यांनी कडाडून विरोध केला होता.

टॅग्स :Amit Shahअमित शहाMamata Banerjeeममता बॅनर्जीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकWest Bengal Lok Sabha Election 2019पश्चिम बंगाल लोकसभा निवडणूक 2019