शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
3
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
4
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
5
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
6
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
7
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
8
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
9
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
10
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
11
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
12
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
13
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
14
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
15
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
16
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
17
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
18
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
19
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
20
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत

प्रभू रामाचे नाव काय पाकिस्तानात घ्यायचे? अमित शहा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2019 05:55 IST

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमध्ये लोकांना जय श्रीरामच्या घोषणा देण्यास बंदी केली आहे. प्रभू रामचंद्राचे नाव जर भारतात घ्यायचे नाही तर काय पाकिस्तानात घ्यायचे असा सवाल भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी मंगळवारी केला.

घटाल : मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमध्ये लोकांना जय श्रीरामच्या घोषणा देण्यास बंदी केली आहे. प्रभू रामचंद्राचे नाव जर भारतात घ्यायचे नाही तर काय पाकिस्तानात घ्यायचे असा सवाल भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी मंगळवारीकेला.येथील प्रचारसभेत ते म्हणाले की, लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी पश्चिम बंगालमध्ये आम्ही निवडणुका लढवत आहोत. या राज्यातील ४२ पैकी २३ लोकसभा जागांवर भाजपला विजय मिळेल, अशी आमची खात्री आहे. प्रभू रामचंद्र हे भारतीय संस्कृतीचे अभिन्न अंग आहे. त्यांच्या नावाचा जयजयकार करणाऱ्यांना एखादा राजकीय नेता कसा काय रोखू शकतो?या राज्यातील पश्चिम मिदनापूर जिल्ह्यातून ममता बॅनर्जी यांच्या गाड्यांचा ताफा चाललेला असताना तो अडवण्याचा प्रयत्न भाजप कार्यकर्त्यांनी केला. ते जय श्रीरामच्या घोषणा देत होते. ममता बॅनर्जी यांनी गाडी थांबवून त्या लोकांना तिथून पिटाळून लावले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवल्याबद्दल पोलिसांनी त्या कार्यकर्त्यांना अटक केली. त्या प्रकाराचा लाभ घेण्याचा प्रयत्न भाजप करीत आहे.एनआरसी राबविणारअमित शहा म्हणाले की, गेल्या पाच वर्षांत नरेंद्र मोदी सरकारने पश्चिम बंगालला ४,२४,८०० कोटी रुपये मंजूर केले. मात्र हा पैसा जनतेपर्यंत न पोहोचता तो काही विशिष्ट लोकांच्या खिशात गेला आहे. याआधीच्या यूपीए-२ सरकारने पाच वर्षामध्ये पश्चिम बंगालला फक्त १,३२,००० कोटी रुपये दिले होते. बांग्लादेशी घुसखोरांना देशाबाहेर हुसकून लावण्यासाठी पश्चिम बंगालमध्ये नॅशनल रजिस्टर आॅफ सिटिझन्स (एनआरसी) योजना राबविण्यावर भाजप ठाम आहे. ईशान्य भारतात मोदी सरकारतर्फे ही योजना राबविली जात असताना त्याला ममता बॅनर्जी व अन्य विरोधी पक्षांच्या नेत्यांनी कडाडून विरोध केला होता.

टॅग्स :Amit Shahअमित शहाMamata Banerjeeममता बॅनर्जीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकWest Bengal Lok Sabha Election 2019पश्चिम बंगाल लोकसभा निवडणूक 2019