शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
3
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
4
BCCI च्या मुंबईतील कार्यालयात चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या मालालवर मारला डल्ला
5
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
6
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
7
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
8
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
9
Asia Cup 2025 : रिषभ पंतच्या जागी अकोल्याच्या पठ्ठ्याची होऊ शकते टीम इंडियात एन्ट्री
10
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
11
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
12
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
13
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
14
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
15
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
16
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
17
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
18
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
19
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
20
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

प्रभू रामाचे नाव काय पाकिस्तानात घ्यायचे? अमित शहा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2019 05:55 IST

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमध्ये लोकांना जय श्रीरामच्या घोषणा देण्यास बंदी केली आहे. प्रभू रामचंद्राचे नाव जर भारतात घ्यायचे नाही तर काय पाकिस्तानात घ्यायचे असा सवाल भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी मंगळवारी केला.

घटाल : मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमध्ये लोकांना जय श्रीरामच्या घोषणा देण्यास बंदी केली आहे. प्रभू रामचंद्राचे नाव जर भारतात घ्यायचे नाही तर काय पाकिस्तानात घ्यायचे असा सवाल भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी मंगळवारीकेला.येथील प्रचारसभेत ते म्हणाले की, लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी पश्चिम बंगालमध्ये आम्ही निवडणुका लढवत आहोत. या राज्यातील ४२ पैकी २३ लोकसभा जागांवर भाजपला विजय मिळेल, अशी आमची खात्री आहे. प्रभू रामचंद्र हे भारतीय संस्कृतीचे अभिन्न अंग आहे. त्यांच्या नावाचा जयजयकार करणाऱ्यांना एखादा राजकीय नेता कसा काय रोखू शकतो?या राज्यातील पश्चिम मिदनापूर जिल्ह्यातून ममता बॅनर्जी यांच्या गाड्यांचा ताफा चाललेला असताना तो अडवण्याचा प्रयत्न भाजप कार्यकर्त्यांनी केला. ते जय श्रीरामच्या घोषणा देत होते. ममता बॅनर्जी यांनी गाडी थांबवून त्या लोकांना तिथून पिटाळून लावले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवल्याबद्दल पोलिसांनी त्या कार्यकर्त्यांना अटक केली. त्या प्रकाराचा लाभ घेण्याचा प्रयत्न भाजप करीत आहे.एनआरसी राबविणारअमित शहा म्हणाले की, गेल्या पाच वर्षांत नरेंद्र मोदी सरकारने पश्चिम बंगालला ४,२४,८०० कोटी रुपये मंजूर केले. मात्र हा पैसा जनतेपर्यंत न पोहोचता तो काही विशिष्ट लोकांच्या खिशात गेला आहे. याआधीच्या यूपीए-२ सरकारने पाच वर्षामध्ये पश्चिम बंगालला फक्त १,३२,००० कोटी रुपये दिले होते. बांग्लादेशी घुसखोरांना देशाबाहेर हुसकून लावण्यासाठी पश्चिम बंगालमध्ये नॅशनल रजिस्टर आॅफ सिटिझन्स (एनआरसी) योजना राबविण्यावर भाजप ठाम आहे. ईशान्य भारतात मोदी सरकारतर्फे ही योजना राबविली जात असताना त्याला ममता बॅनर्जी व अन्य विरोधी पक्षांच्या नेत्यांनी कडाडून विरोध केला होता.

टॅग्स :Amit Shahअमित शहाMamata Banerjeeममता बॅनर्जीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकWest Bengal Lok Sabha Election 2019पश्चिम बंगाल लोकसभा निवडणूक 2019