शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
Lufthansa Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
3
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
5
माकडाच्या हाती लागलं नोटांचं बंडल, झाडावर चढून केली ५००-५०० रुपयांच्या नोटांची उधळण, व्हिडीओ व्हायरल
6
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?
7
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
8
Ritual: अकाली मृत्यू येऊ नये म्हणून रोज झोपण्यापूर्वी करा 'ही' दोन ओळींची प्रार्थना!
9
आमदार, खासदार विकत घ्यायला पैसे आहेत पूल बांधायला नाही? मावळ दुर्घटनेवरुन राऊतांचा सवाल
10
Post Office च्या 'या' स्कीममध्ये हवी तितकी खाती उघडू शकता, हमी परताव्यासह मिळेल Tax मध्येही सूट
11
इंग्लंडविरूद्धच्या टेस्टसाठी शार्दुल ठाकूरला 'प्लेइंग ११'मध्ये संधीची शक्यता, 'या' खेळाडूला डच्चू?
12
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
13
Israel-Iran War : भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
14
"आई कुठे काय करते मला सोडायची नव्हती पण...", संजनाची भूमिका साकारलेल्या दिपाली पानसरेने सांगितलं नेमकं कारण
15
"मंत्रालयातून उडी मारावी लागेल अशी वेळ.."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची बिकट अवस्था, म्हणाला- "वय झाल्यामुळे.."
16
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
17
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
18
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
19
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
20
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?

देशामधील पर्यटन वाढवण्यासाठी पुढाकार घ्या, मन की बात मधून मोदींचे देशवासियांना आवाहन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2017 12:17 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी मन की बात कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियांशी संवाद साधला. यावेळी अन्नाची नासाडी न करण्याचे, खादीच्या वापरास प्रोत्साहन देण्याचे आणि स्वच्छता राखण्याचे आवाहन मोदींनी देशवासियांना केले.

नवी दिल्ली, दि. 24 - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी मन की बात कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियांशी संवाद साधला. यावेळी अन्नाची नासाडी न करण्याचे, खादीच्या वापरास प्रोत्साहन देण्याचे आणि स्वच्छता राखण्याचे आवाहन मोदींनी देशवासियांना केले. तसेच यंदाच्या पर्यटन हंगामात देशातील पर्यटन वाढवण्यासाठी देशवासियांनी पुढाकार घ्यावा देशाच्या विविध भागात भ्रमण करून देश समजून घ्यावा, आपल्या अनुभवांचे आदानप्रदान करावे,  तसेच विविध पर्यटन स्थळे आणि तेथील लोकजीवनाची छायाचित्रे इन्क्रेडेबल इंडियासोबत शेअर करून पर्यटनवाढीस प्रोत्साहन द्यावे असे आवाहन केले. 

मन की बातच्या माध्यमातून देशवासियांशी संवाद साधण्याची मोदींची ही 36 वेळ होती. आज देशवासियांना संबोधित करताना मोदींनी पर्यटन, स्वच्छता आणि खादीच्या प्रसारावर भर दिला. देशातील पर्यटनवाढीसाठी आवाहन करताना मोदी म्हणाले," पर्यटनासाठी परदेशात जाणे चांगले आहे. पण आपल्या देशातही पाहण्यासारखे बरेच काही आहे. त्यामुळे  तुम्ही सर्वात आधी आपल्या देशाला समजून घ्या. देशातील महापुरुषांनी सर्वात आधी देशभरात भ्रमण करून देश समजून घेतला. मीसुद्धा देशाच्या बहुतांश भागात भ्रमण केले आहे. त्याचा आज मला फायदा होत आहे. जेव्हा तुम्ही विद्यार्थी म्हणून भ्रमंती कराल तेव्हा पर्यटनामध्ये गुणात्मक वाढ होईल."लष्करात सेवेत असलेल्या पतील वीरमरण आल्यानंतर परिस्थितीला धैर्याने सामोरे जात लष्करात दाखल झालेल्या लेफ्टनंट स्वाती महाडिक तसेच निधी दुबे यांचेही मोदींनी विशेष कौतुक केले. या वीरांगनांचे धैर्य असामान्य असल्याचे मोदींनी सांगितले.  देशवासियांशी संवाद साधताना, अन्नाचा अपव्यय टाळण्याचे आवाहन मोदींनी केली. गरज असेल तेवढेच अन्न घ्या, वाया घालवू नका असे मोदी म्हणाले. तसेच खादीच्या अधिकाधिक वापरासाठी देशवासियांनी पुढाकार घ्यावा, गेल्या काही काळात खादीच्या भेटवस्तू देण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र खादीचे अभियान अधिक व्यापक करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.    स्वच्छता अभियानात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या श्रीनगरमधील बिलाल डारचे मन की बातमध्ये कौतुक केले. बिलाल  श्रीनगरमधील दाल सरोवराच्या स्वच्छतेसाठी प्रयत्न करत आहे. तसेच त्याच्या कामाची दखल घेत श्रीनगरमधील पालिकेने त्याची स्वच्छतेच्या ब्रँड अॅम्बॅसिडरपदी नियुक्ती केली आहे. देशात स्वच्छता अभियानाचा प्रसार करण्यासाठी प्रसारमाध्यमांनी मोलाची भूमिका बजावल्याचे सांगत मोदींनी प्रसारमाध्यमांचे आभार मानले.  तसेच सरदार पटेल यांच्या जयंती दिनी 31 ऑक्टोबर रोजी देशभरात रन फॉर युनिटीचे आयोजन करण्याचे आवाहनही मोदींनी केले. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारतGovernmentसरकार