शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
4
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
5
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
6
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
7
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
8
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
9
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
10
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
12
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
13
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
14
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
15
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
16
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
17
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
18
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
19
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

देशामधील पर्यटन वाढवण्यासाठी पुढाकार घ्या, मन की बात मधून मोदींचे देशवासियांना आवाहन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2017 12:17 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी मन की बात कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियांशी संवाद साधला. यावेळी अन्नाची नासाडी न करण्याचे, खादीच्या वापरास प्रोत्साहन देण्याचे आणि स्वच्छता राखण्याचे आवाहन मोदींनी देशवासियांना केले.

नवी दिल्ली, दि. 24 - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी मन की बात कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियांशी संवाद साधला. यावेळी अन्नाची नासाडी न करण्याचे, खादीच्या वापरास प्रोत्साहन देण्याचे आणि स्वच्छता राखण्याचे आवाहन मोदींनी देशवासियांना केले. तसेच यंदाच्या पर्यटन हंगामात देशातील पर्यटन वाढवण्यासाठी देशवासियांनी पुढाकार घ्यावा देशाच्या विविध भागात भ्रमण करून देश समजून घ्यावा, आपल्या अनुभवांचे आदानप्रदान करावे,  तसेच विविध पर्यटन स्थळे आणि तेथील लोकजीवनाची छायाचित्रे इन्क्रेडेबल इंडियासोबत शेअर करून पर्यटनवाढीस प्रोत्साहन द्यावे असे आवाहन केले. 

मन की बातच्या माध्यमातून देशवासियांशी संवाद साधण्याची मोदींची ही 36 वेळ होती. आज देशवासियांना संबोधित करताना मोदींनी पर्यटन, स्वच्छता आणि खादीच्या प्रसारावर भर दिला. देशातील पर्यटनवाढीसाठी आवाहन करताना मोदी म्हणाले," पर्यटनासाठी परदेशात जाणे चांगले आहे. पण आपल्या देशातही पाहण्यासारखे बरेच काही आहे. त्यामुळे  तुम्ही सर्वात आधी आपल्या देशाला समजून घ्या. देशातील महापुरुषांनी सर्वात आधी देशभरात भ्रमण करून देश समजून घेतला. मीसुद्धा देशाच्या बहुतांश भागात भ्रमण केले आहे. त्याचा आज मला फायदा होत आहे. जेव्हा तुम्ही विद्यार्थी म्हणून भ्रमंती कराल तेव्हा पर्यटनामध्ये गुणात्मक वाढ होईल."लष्करात सेवेत असलेल्या पतील वीरमरण आल्यानंतर परिस्थितीला धैर्याने सामोरे जात लष्करात दाखल झालेल्या लेफ्टनंट स्वाती महाडिक तसेच निधी दुबे यांचेही मोदींनी विशेष कौतुक केले. या वीरांगनांचे धैर्य असामान्य असल्याचे मोदींनी सांगितले.  देशवासियांशी संवाद साधताना, अन्नाचा अपव्यय टाळण्याचे आवाहन मोदींनी केली. गरज असेल तेवढेच अन्न घ्या, वाया घालवू नका असे मोदी म्हणाले. तसेच खादीच्या अधिकाधिक वापरासाठी देशवासियांनी पुढाकार घ्यावा, गेल्या काही काळात खादीच्या भेटवस्तू देण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र खादीचे अभियान अधिक व्यापक करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.    स्वच्छता अभियानात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या श्रीनगरमधील बिलाल डारचे मन की बातमध्ये कौतुक केले. बिलाल  श्रीनगरमधील दाल सरोवराच्या स्वच्छतेसाठी प्रयत्न करत आहे. तसेच त्याच्या कामाची दखल घेत श्रीनगरमधील पालिकेने त्याची स्वच्छतेच्या ब्रँड अॅम्बॅसिडरपदी नियुक्ती केली आहे. देशात स्वच्छता अभियानाचा प्रसार करण्यासाठी प्रसारमाध्यमांनी मोलाची भूमिका बजावल्याचे सांगत मोदींनी प्रसारमाध्यमांचे आभार मानले.  तसेच सरदार पटेल यांच्या जयंती दिनी 31 ऑक्टोबर रोजी देशभरात रन फॉर युनिटीचे आयोजन करण्याचे आवाहनही मोदींनी केले. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारतGovernmentसरकार