शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
16
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
17
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
18
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
19
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
20
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय

देशामधील पर्यटन वाढवण्यासाठी पुढाकार घ्या, मन की बात मधून मोदींचे देशवासियांना आवाहन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2017 12:17 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी मन की बात कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियांशी संवाद साधला. यावेळी अन्नाची नासाडी न करण्याचे, खादीच्या वापरास प्रोत्साहन देण्याचे आणि स्वच्छता राखण्याचे आवाहन मोदींनी देशवासियांना केले.

नवी दिल्ली, दि. 24 - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी मन की बात कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियांशी संवाद साधला. यावेळी अन्नाची नासाडी न करण्याचे, खादीच्या वापरास प्रोत्साहन देण्याचे आणि स्वच्छता राखण्याचे आवाहन मोदींनी देशवासियांना केले. तसेच यंदाच्या पर्यटन हंगामात देशातील पर्यटन वाढवण्यासाठी देशवासियांनी पुढाकार घ्यावा देशाच्या विविध भागात भ्रमण करून देश समजून घ्यावा, आपल्या अनुभवांचे आदानप्रदान करावे,  तसेच विविध पर्यटन स्थळे आणि तेथील लोकजीवनाची छायाचित्रे इन्क्रेडेबल इंडियासोबत शेअर करून पर्यटनवाढीस प्रोत्साहन द्यावे असे आवाहन केले. 

मन की बातच्या माध्यमातून देशवासियांशी संवाद साधण्याची मोदींची ही 36 वेळ होती. आज देशवासियांना संबोधित करताना मोदींनी पर्यटन, स्वच्छता आणि खादीच्या प्रसारावर भर दिला. देशातील पर्यटनवाढीसाठी आवाहन करताना मोदी म्हणाले," पर्यटनासाठी परदेशात जाणे चांगले आहे. पण आपल्या देशातही पाहण्यासारखे बरेच काही आहे. त्यामुळे  तुम्ही सर्वात आधी आपल्या देशाला समजून घ्या. देशातील महापुरुषांनी सर्वात आधी देशभरात भ्रमण करून देश समजून घेतला. मीसुद्धा देशाच्या बहुतांश भागात भ्रमण केले आहे. त्याचा आज मला फायदा होत आहे. जेव्हा तुम्ही विद्यार्थी म्हणून भ्रमंती कराल तेव्हा पर्यटनामध्ये गुणात्मक वाढ होईल."लष्करात सेवेत असलेल्या पतील वीरमरण आल्यानंतर परिस्थितीला धैर्याने सामोरे जात लष्करात दाखल झालेल्या लेफ्टनंट स्वाती महाडिक तसेच निधी दुबे यांचेही मोदींनी विशेष कौतुक केले. या वीरांगनांचे धैर्य असामान्य असल्याचे मोदींनी सांगितले.  देशवासियांशी संवाद साधताना, अन्नाचा अपव्यय टाळण्याचे आवाहन मोदींनी केली. गरज असेल तेवढेच अन्न घ्या, वाया घालवू नका असे मोदी म्हणाले. तसेच खादीच्या अधिकाधिक वापरासाठी देशवासियांनी पुढाकार घ्यावा, गेल्या काही काळात खादीच्या भेटवस्तू देण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र खादीचे अभियान अधिक व्यापक करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.    स्वच्छता अभियानात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या श्रीनगरमधील बिलाल डारचे मन की बातमध्ये कौतुक केले. बिलाल  श्रीनगरमधील दाल सरोवराच्या स्वच्छतेसाठी प्रयत्न करत आहे. तसेच त्याच्या कामाची दखल घेत श्रीनगरमधील पालिकेने त्याची स्वच्छतेच्या ब्रँड अॅम्बॅसिडरपदी नियुक्ती केली आहे. देशात स्वच्छता अभियानाचा प्रसार करण्यासाठी प्रसारमाध्यमांनी मोलाची भूमिका बजावल्याचे सांगत मोदींनी प्रसारमाध्यमांचे आभार मानले.  तसेच सरदार पटेल यांच्या जयंती दिनी 31 ऑक्टोबर रोजी देशभरात रन फॉर युनिटीचे आयोजन करण्याचे आवाहनही मोदींनी केले. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारतGovernmentसरकार