शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

संसदेत काँग्रेसने दिली तहकुबी सूचना; पाळतीची माहिती सरकारला होती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2020 06:33 IST

काँग्रेसचे खासदार मॅनिकाम टागोर आणि अधीर रंजन चौधरी यांनी पाळतीच्या विषयावर चर्चा झाली पाहिजे, यासाठी ही नोटीस दिली.

नवी दिल्ली : चिनी कंपनी भारतात अनेक राजकीय नेत्यांसह १० हजारांपेक्षा जास्त लोकांवर पाळत ठेवत असल्याचा दावा करणाऱ्या बातम्या प्रसारमाध्यमांत आल्यानंतर काँग्रेसने मंगळवारी संसदेत तहकुबी नोटीस दिली.काँग्रेसचे खासदार मॅनिकाम टागोर आणि अधीर रंजन चौधरी यांनी पाळतीच्या विषयावर चर्चा झाली पाहिजे, यासाठी ही नोटीस दिली. भारतातील प्रमुख दैनिकांत प्रसिद्ध झालेल्या या पाळतीच्या बातम्यांचा उल्लेख टागोर यांनी केला. या बातम्यांत म्हटले आहे की, चीनचे सरकार आणि लष्कर राजकीय नेते, नोकरशहा, पत्रकार आणि वेगवेगळ्या शैक्षणिक क्षेत्रांतील लोकांवर लक्ष ठेवून आहे. ते ‘विदेशी लक्ष्यां’च्या त्याच्या जागतिक डाटाबेससाठी.काँग्रेसचे नेते शशी थरूर यांनी सोमवारी यावर बोलताना हे पाळत प्रकरण म्हणजे ‘खोलवर सुरू असलेली कारवाई’ म्हटले. दहा हजार भारतीयांवर चीनचे अधिकारी लक्ष ठेवत आहेत, ही काही लहानसहान बाब नाही, असे थरूर म्हणाले. केंद्र सरकारने चीनचे हे हेतू उधळून लावण्यासाठी सायबर सिक्युरिटी वाढवली पाहिजे, असेही काँग्रेसने म्हटले. संसदेचे पावसाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू झाले आणि एकही सुटी न घेता ते एक आॅक्टोबरपर्यंत चालेल.पाळतीच्या बातम्या जर खºया असतील, तर मोदी सरकारला त्याच्या गांभीर्याची जाणीव आहे का? किंवा अशी काही हेरगिरी सुरू असल्याची माहितीच त्यांना नाही? सरकार आमच्या सीमांचे रक्षण करण्यात वारंवार का अपयशी ठरते आहे? अशा उद्योगांपासून चीनने दूर राहिले पाहिजे, असा स्पष्ट संदेश त्याला दिला गेला पाहिजे, असेही सुरजेवाला म्हणाले.शेंनझेनस्थित तंत्रज्ञान कंपनीचा संबंध चीनच्या सरकारशी, तसेच चीन कम्युनिस्ट पक्षाशी आहे.चीनला स्पष्टसंदेश देण्याचीगरज -सुरजेवालाचीनकडून होत असलेल्या भारतीयांच्या पाळतीची माहिती नरेंद्र मोदी यांच्या सरकारला होती का, अशी विचारणा काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी सोमवारी केली. ते टिष्ट्वटरवर म्हणाले, चीनने अशा गोष्टींपासून दूर राहावे याचा स्पष्ट संदेश त्याला दिला गेला पाहिजे, अशी आमची मागणी आहे.लडाखमध्ये चीनने प्रत्यक्ष सीमा रेषेवर भारताशी भांडण उकरून काढले व त्याचे भूभाग विस्तार करण्याचे प्रयत्न वाढलेले आहेत, या पार्श्वभूमीवर पाळतीचा विषय फार महत्त्वाचा बनला आहे.सुरजेवाला यांनी गेल्या मे महिन्यात उद््भवलेला सीमा प्रश्न केंद्र सरकार अजून सोडवू शकलेले नाही, याबद्दल आश्चर्य व्यक्त केले.

टॅग्स :Parliamentसंसदcongressकाँग्रेस