शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

संसदेत काँग्रेसने दिली तहकुबी सूचना; पाळतीची माहिती सरकारला होती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2020 06:33 IST

काँग्रेसचे खासदार मॅनिकाम टागोर आणि अधीर रंजन चौधरी यांनी पाळतीच्या विषयावर चर्चा झाली पाहिजे, यासाठी ही नोटीस दिली.

नवी दिल्ली : चिनी कंपनी भारतात अनेक राजकीय नेत्यांसह १० हजारांपेक्षा जास्त लोकांवर पाळत ठेवत असल्याचा दावा करणाऱ्या बातम्या प्रसारमाध्यमांत आल्यानंतर काँग्रेसने मंगळवारी संसदेत तहकुबी नोटीस दिली.काँग्रेसचे खासदार मॅनिकाम टागोर आणि अधीर रंजन चौधरी यांनी पाळतीच्या विषयावर चर्चा झाली पाहिजे, यासाठी ही नोटीस दिली. भारतातील प्रमुख दैनिकांत प्रसिद्ध झालेल्या या पाळतीच्या बातम्यांचा उल्लेख टागोर यांनी केला. या बातम्यांत म्हटले आहे की, चीनचे सरकार आणि लष्कर राजकीय नेते, नोकरशहा, पत्रकार आणि वेगवेगळ्या शैक्षणिक क्षेत्रांतील लोकांवर लक्ष ठेवून आहे. ते ‘विदेशी लक्ष्यां’च्या त्याच्या जागतिक डाटाबेससाठी.काँग्रेसचे नेते शशी थरूर यांनी सोमवारी यावर बोलताना हे पाळत प्रकरण म्हणजे ‘खोलवर सुरू असलेली कारवाई’ म्हटले. दहा हजार भारतीयांवर चीनचे अधिकारी लक्ष ठेवत आहेत, ही काही लहानसहान बाब नाही, असे थरूर म्हणाले. केंद्र सरकारने चीनचे हे हेतू उधळून लावण्यासाठी सायबर सिक्युरिटी वाढवली पाहिजे, असेही काँग्रेसने म्हटले. संसदेचे पावसाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू झाले आणि एकही सुटी न घेता ते एक आॅक्टोबरपर्यंत चालेल.पाळतीच्या बातम्या जर खºया असतील, तर मोदी सरकारला त्याच्या गांभीर्याची जाणीव आहे का? किंवा अशी काही हेरगिरी सुरू असल्याची माहितीच त्यांना नाही? सरकार आमच्या सीमांचे रक्षण करण्यात वारंवार का अपयशी ठरते आहे? अशा उद्योगांपासून चीनने दूर राहिले पाहिजे, असा स्पष्ट संदेश त्याला दिला गेला पाहिजे, असेही सुरजेवाला म्हणाले.शेंनझेनस्थित तंत्रज्ञान कंपनीचा संबंध चीनच्या सरकारशी, तसेच चीन कम्युनिस्ट पक्षाशी आहे.चीनला स्पष्टसंदेश देण्याचीगरज -सुरजेवालाचीनकडून होत असलेल्या भारतीयांच्या पाळतीची माहिती नरेंद्र मोदी यांच्या सरकारला होती का, अशी विचारणा काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी सोमवारी केली. ते टिष्ट्वटरवर म्हणाले, चीनने अशा गोष्टींपासून दूर राहावे याचा स्पष्ट संदेश त्याला दिला गेला पाहिजे, अशी आमची मागणी आहे.लडाखमध्ये चीनने प्रत्यक्ष सीमा रेषेवर भारताशी भांडण उकरून काढले व त्याचे भूभाग विस्तार करण्याचे प्रयत्न वाढलेले आहेत, या पार्श्वभूमीवर पाळतीचा विषय फार महत्त्वाचा बनला आहे.सुरजेवाला यांनी गेल्या मे महिन्यात उद््भवलेला सीमा प्रश्न केंद्र सरकार अजून सोडवू शकलेले नाही, याबद्दल आश्चर्य व्यक्त केले.

टॅग्स :Parliamentसंसदcongressकाँग्रेस