शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

राज्यसभेत ३७ जागांवर डावपेच! निकालात भाजपा-काँग्रेसला होईल फायदा मग फटका कुणाला बसणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 12:57 IST

महाराष्ट्रापासून बिहार, पश्चिम बंगाल, तामिळनाडूसह १० राज्यांतील ३७ जागांसाठी राज्यसभा निवडणूक होणार आहे. या जागा एप्रिल महिन्यात रिक्त होत आहेत

नवी दिल्ली - देशातील १० राज्यांमधील ३७ राज्यसभा जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. निवडणूक आयोगाने हा कार्यक्रम घोषित केला. त्यात २६ फेब्रुवारीपासून ५ मार्चपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. १६ मार्च सकाळी ९ वाजल्यापासून संध्याकाळी ५ वाजेपर्यंत मतदान पार पडेल. त्याचदिवशी संध्याकाळी निकाल घोषित केला जाईल. भाजपा आणि काँग्रेस दोन्ही पक्षांची राजकीय ताकद राज्यसभेत वाढणार असेल तर त्यात कुणाचं राजकीय नुकसान होणार हे जाणून घेऊ. 

महाराष्ट्रापासून बिहार, पश्चिम बंगाल, तामिळनाडूसह १० राज्यांतील ३७ जागांसाठी राज्यसभा निवडणूक होणार आहे. या जागा एप्रिल महिन्यात रिक्त होत आहेत. ज्यासाठी निवडणूक आयोगाने १६ मार्चला मतदान करण्याचं जाहीर केले आहे. राज्यसभा निवडणुकीत भाजपाच्या नेतृत्वात एनडीएच्या जागा वाढतील तर विरोधी इंडिया आघाडीच्या जागांमध्ये घट होईल. परंतु काँग्रेसच्या जागांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. 

राष्ट्रवादीचे(SP) प्रमुख शरद पवार, काँग्रेसचे अभिषेक मनु सिंघवी आणि ठाकरेंच्या प्रियंका चतुर्वैदी यांचा कार्यकाळ संपणार आहे. याव्यतिरिक्त उपसभापती हरिवंश सिंह, उपेंद्र कुशवाह यांचीही मुदत संपणार आहे. निवृत्त होणाऱ्या दिग्गज नेत्यांची पुन्हा एन्ट्री होणार का हे पाहणे गरजेचे आहे. राज्यसभेच्या या ३७ जागांमध्ये सर्वाधिक ७ जागा महाराष्ट्रातल्या आहेत. महाराष्ट्रात भाजपाच्या २, शरद पवारांच्या पक्षातील २ आणि काँग्रेस, उद्धवसेना आणि आरपीआयची प्रत्येक १ जागा रिक्त होणार आहे. तामिळनाडूत ६ जागा रिक्त होतील. त्यातील ४ डिएमकेजवळ आहेत. १ जागा एआयडिमके आणि एक टीएमसीकडे आहे. पश्चिम बंगाल, बिहारमध्ये ५-५ जागांवर निवडणूक होईल. बंगालमध्ये ५ पैकी ४ जागांवर टीएमसी आणि एका जागेवर सीपीआयचा कब्जा आहे. बिहारच्या ५ जागांवर जेडीयू आणि आरजेडीकडे प्रत्येकी २ जागा आणि १ जागा आरएलएलकडे आहे.

ओडिशा येथे ४, आसामध्ये ३ जागा रिक्त होत आहेत. ओडिशातील ४ जागांपैकी २ जागा भाजपा आणि बीजेडीकडे २ जागा आहेत. आसामच्या ३ राज्यसभा जागांपैकी २ भाजपाकडे आणि एक जागा आसाम गड परिषदेकडे आहे. हरियाणा, छत्तीसगड, तेलंगणाहून २-२ जागा आणि हिमाचल प्रदेशात एका जागेवर मतदान होणार आहे. हरियाणातील दोन्ही जागा भाजपाकडे आहेत. तेलंगणात २ जागांपैकी काँग्रेस १, बीआरएस १ अशा जागा आहेत. छत्तीसगडमध्ये दोन्ही जागांवर काँग्रेसचा कब्जा आहे. हिमाचल प्रदेशातील एका जागेवर भाजपाचा कब्जा आहे.

राज्यसभेत कुणाला फायदा अन् कुणाला नुकसान?

देशातील एकूण ३७ जागांपैकी आकडेवारी पाहिली तर भाजपा नेतृत्वातील एनडीएकडे जवळपास १५ जागा आहेत. ज्यात भाजपाकडे ९, जेडीयू २, एआयडिएमके १, आरएलएम आणि आरपीआयकडे १ जागा आहे. विरोधी इंडिया आघाडीकडे १८ जागा आहेत. ज्यात काँग्रेसकडे ४ जागा, टीएमसी ४, डिएमके ४ आणि आरजेडीकडे २ जागा आहेत. सीपीआय आणि उद्धवसेनेकडे प्रत्येकी १ जागा आहे. इतरांकडे ४ जागा आहेत. ज्यात बीजेडीकडे २, बीआरएस १ आणि तामिळनाडूच्या स्थानिक पक्षांकडे १ जागा आहे. विधानसभा निवडणूक निकालांमुळे अनेक राज्यात गणिते बदलली आहेत. ज्यामुळे एनडीएला २ ते ३ जागांचा फायदा मिळू शकतो. काँग्रेसच्या ४ जागा वाढून ५ होऊ शकतात. भाजपाच्या ९ जागा वाढून १२ होण्याची शक्यता आहे. आरजेडी, शरद पवारांची एनसीपी, उद्धव ठाकरेंची शिवसेना यांच्या हातून जागा जाण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात एनडीएकडे २३५ आमदार आहेत. त्या जोरावर ६ जागा सहजपणे जिंकू शकतात. भाजपा ४, शिंदेसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला १ जागा मिळण्याची शक्यता आहे.  हरियाणा आणि हिमाचलमुळे काँग्रेसची १ जागा वाढू शकते. 

English
हिंदी सारांश
Web Title : Rajya Sabha Elections: BJP and Congress Gain, Others Face Losses

Web Summary : Rajya Sabha elections for 37 seats across 10 states are announced. BJP and Congress are expected to gain, potentially at the expense of NCP, Shiv Sena (UBT), and RJD. Maharashtra holds 7 seats, with NDA likely to secure 6, impacting current representation.
टॅग्स :Rajya Sabhaराज्यसभाElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगBJPभाजपाcongressकाँग्रेसSharad Pawarशरद पवारUddhav Thackerayउद्धव ठाकरे