शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

देशात वेद, उपनिषद, वास्तुकलेचे अभ्यासक्रम सुरू करण्याचा विचार : रमेश पोखरियाल निशंक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2020 13:53 IST

भारतात तक्षशीला, नालंदासारखी विद्यापीठे फार पूर्वीपासून असून, जगात देशाची ‘शैक्षणिक हब’ म्हणून ओळख आहे.

ठळक मुद्देकेंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्र्यांचे प्रतिपादन : डेस्टिनेशन इंडिया परिषदेचे उद्घाटनपरदेशी विद्यार्थ्यांसाठी एक टास्क फोर्स तयार करणारनवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी लवकरच

पुणे : भारतात तक्षशीला, नालंदासारखी विद्यापीठे फार पूर्वीपासून असून, जगात देशाची ‘शैक्षणिक हब’ म्हणून ओळख आहे. देशात परदेशी विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्यासाठी आपले वेद, उपनिषद, संस्कृती, आयुर्वेद, योग, भाषा, वास्तुकला यांच्याशी संबंधित अभ्यासक्रम सुरू करण्याचा विचार करावा लागेल, असे मत केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी मंगळवारी व्यक्त केले.भारतीय संस्कृती संबंध परिषद (आयसीसीआर), सावित्रीबाई फुले पुणेविद्यापीठ, सिम्बायोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी यांच्या वतीने आयोजित डेस्टिनेशन इंडिया या दोन दिवसीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी निशंक बोलत होते. यावेळी आयसीसीआरचे अध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे, अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे (एआयसीटीई) अध्यक्ष डॉ. अनिल सहस्रबुद्धे, विद्यापीठ अनुदान आयोगाचे सचिव रजनीश जैन, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, आयसीसीआरचे महासंचालक अखिलेश मिश्रा, सिम्बायोसिसचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शां. ब. मुजुमदार, उपकुलपती डॉ. विद्या येरवडेकर, कुलगुरू डॉ. रजनी गुप्ते आदी उपस्थित होते.डॉ. शां. ब. मुजुमदार म्हणाले, की सध्या विद्यापीठांंमध्ये केवळ १५ टक्के परदेशी विद्यार्थ्यांना शिकण्याची संधी दिली जाते. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर परदेशी विद्यार्थी शिक्षणापासून दूर राहतात. त्यामुळे ही अट काढून टाकावी. तसेच, परदेशी विद्यार्थी अधिक संख्येने असणाºया शहरांसाठी केंद्र सरकारने उपाययोजना आखाव्यात. डॉ. विद्या येरवडेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले...........आपल्या देशाला ज्ञानाचे भांडार समजले जाते. त्यामुळे देशातील चांगली महाविद्यालये -विद्यापीठे ओळखून त्याची प्रसिद्धी करणे, नवे आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रम सुरू करणे, यूजीसी व नॅक संस्थांच्या माध्यमातून नवी मूल्यमापन पद्धती आखणे आदी उपाययोजना तातडीने कराव्या लागतील. तसेच, परदेशी विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्यासाठी सर्वांना एकत्रितपणे प्रयत्न करावे लागतील.- डॉ. विनय सहस्रबुद्धे ...............परदेशी विद्यार्थ्यांसाठी एक टास्क फोर्स तयार करणारजगाच्या कानाकोपºयातून भारतात शिक्षण घेण्यासाठी येणाºया परदेशी विद्यार्थ्यांना व्हिसा, पासपोर्ट किंवा अन्य कागदपत्रे गोळा करताना विविध अडचणींना सामोरे जावे लागते. त्यासाठी एक टास्क फोर्स तयार करण्यात येणार आहे. यामध्ये आयसीसीआर, एआयसीटीई, यूजीसी या संस्थांच्या प्रतिनिधींसह विदेश मंत्रालय आणि मनुष्यबळ विकास मंत्रालयातील अधिकारी असतील. हे अधिकारी संबंधित विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करणार आहेत.............देशात परदेशी विद्यार्थ्यांची संख्या केवळ ४७ हजार असून, भारतासारख्या मोठ्या देशात ही संख्या फारच कमी आहे. ही संख्या वाढविण्यासाठी पाश्चत्य देशांच्या संस्कृतीचे अनुकरण करण्याची आवश्यकता नाही.- अखिलेश मिश्रा...............नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी लवकरचदेशात तब्बल ३३ वर्षांनंतर शैक्षणिक धोरण बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार नवीन शैक्षणिक धोरणाचा मसुदा तयार करण्याचे काम सुरू असून, अंतिम मसुदा तयार केला जात आहे. लवकरच नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी केली जाईल, असे निशंक यांनी यावेळी स्पष्ट केले.

टॅग्स :Puneपुणेliteratureसाहित्यhistoryइतिहासcollegeमहाविद्यालयuniversityविद्यापीठStudentविद्यार्थी