शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
4
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
5
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
6
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
7
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
8
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
9
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
10
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
11
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
12
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
13
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
14
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
15
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
16
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
17
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
18
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
19
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
20
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीतील १६०० वकिलांच्या महाराष्ट्रातील पदव्या संशयास्पद?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2019 05:49 IST

सत्यतेवर सवाल। मुदत संपूनही विद्यापीठांकडून पडताळणी नाही

नवी दिल्ली : दिल्ली बार कौन्सिलकडून सनद घेऊन राजधानीत वकिली करत असलेल्या १,६०० वकिलांच्या महाराष्ट्रातील चार विद्यापीठांच्या एलएलबी पदव्यांची पडताळणी अंतिम मुदत संपून गेल्यावरही अद्याप न झाल्याने या पदव्यांच्या खरेपणाविषयी प्रश्नचिन्ह कायम आहे. ज्यांच्या पदवीच्या खरेपणाची खातरजमा झालेली नाही अशा वकिलांची सनद रद्द करणे व ज्या विद्यापीठांनी वारंवार स्मरणपत्रे पाठवूनही पदव्यांची पडताळणी करून मुदतीत अहवाल दिले नाहीत, अशा विद्यापीठांची मान्यता रद्द करणे व अशा विद्यापीठांतून एलएल. बी पदवी घेतलेल्या वकिलांना सनद देणे यापुढे बंद करणे हे विषय दिल्ली बार कौन्सिलने आता अ.भा. बार कौन्सिलकडे सोपविले आहेत.

दिल्ली बार कौन्सिलकडून सनद घेतलेल्या वकिलांच्या एलएलबी पदव्यांची संबंधित विद्यापीठांकडून पडताळणी करून खातरजमा करून घेण्याचे काम गेली दोन वर्षे सुरू आहे. यासाठी बार कौन्सिलने ३० सप्टेंबर रोजी पत्र पाठवून पडताळणीसाठी १५ दिवसांची शेवटची मुदत दिली होती. यानंतरही ज्या विद्यापीठांनी पदव्यांची पडताळणी पूर्ण केलेली नाही, त्यांचा तपशील दिल्ली बार कौन्सिलने गेल्या आठवड्यात अ.भा. बार कौन्सिलला कळविला आहे. दिल्ली बार कौन्सिलने त्यांच्याकडे नोंदणी असलेल्या एकूण ३० हजार ७८१ वकिलांच्या एलएलबी पदव्या देशातील विविध विद्यापीठांकडे पडताळणीसाठी पाठविल्या होत्या त्यापैकी १४ हजार ८५१ पदव्यांची विद्यापीठांनी पडताळणी केली आहे व बाकीच्या १५,९३० वकिलांच्या पदव्यांची पडताळणी विद्यापीठांकडून अद्याप झालेली नाही.राज्यातील इतर विद्यापीठांची कामगिरीच्सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ : एकूण पदव्या ८७०. पडताळणी झाली ५१९. पडताळणी बाकी ३५१.च्राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ : एकूण पदव्या ७१. पडताळणी झाली ३५. पडताळणी बाकी ३६.च्अ‍ॅॅमिटी विद्यापीठ : एकूण पदव्या १.०५४. पडताळणी झाली ९२.च्पडताळणी बाकी ९६२.सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने कारवाईसर्वोच्च न्यायालयाच्या २०१७ च्या आदेशानुसार सर्व राज्यांमध्ये नोंदणी झालेल्या वकिलांच्या एलएलबी पदवीची विद्यापीठांकडून पडताळणी करून घेण्याचे काम संबंधित राज्य बार कौन्सिल करत आहेत.पदव्यांची पडताळणी केल्याखेरीज कोणाही वकिलाचे नाव बार कौन्सिल निवडणुकीसाठी मतदारयादीत समाविष्ट करू नये, असा आदेश दिला गेला होता. त्यावेळी देशातील १५.३४ लाख वकिलांपैकी फक्त ३.५८ लाख वकिलांच्या पदव्यांची पडताळणी झालेली होती आणि १.२१ लाख वकिलांच्या पदव्या पडताळणीसाठी पाठविल्याही गेल्या नव्हत्या.दिल्ली बार कौन्सिलकडे महाराष्ट्रातून एलएलबी पदवी घेतलेल्या 2241 वकिलांची नोंद आहे. त्यांच्यापैकी फक्त 646 पदव्यांची पडताळणी विद्यापीठांनी केली असून 1595 पदव्यांची पडताळणी अद्याप व्पायची आहे.बार कौन्सिलने दिलेल्या माहितीनुसार मुंबई विद्यापीठाकडे २४६ पदव्या पडताळणीसाठी पाठविल्या होत्या. त्यापैकी एकाही पदवीची पडताळणी या विद्यापीठाने केलेली नाही.

टॅग्स :delhiदिल्लीSupreme Courtसर्वोच्च न्यायालयHigh Courtउच्च न्यायालय