शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
2
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
3
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
4
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
5
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
6
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  
7
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
8
सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी
9
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!
10
बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
11
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
12
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
13
Surya Grahan 2025: ग्रहण सूर्याला मात्र 'या' राशींचे भाग्य येईल फळाला; १०० वर्षांनी जुळून आलाय अपूर्व योग!
14
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
15
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
16
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!
17
Gold Silver Price 18 September: अचानक का कमी होताहेत सोन्या-चांदीचे दर; पुढेही सुरू राहणार का ही घसरण?
18
ऑनलाइन पद्धतीने मतदाराचे नाव मतदार यादीतून हटवता येते का? निवडणूक आयोग म्हणाले...
19
११ वर्षांनी लहान मुलाच्या प्रेमात पडली २८ वर्षांची तरुणी; लग्नाला नकार मिळाल्यावर मागू लागली ५० लाख!
20
Navi Mumbai: 'कपडे काढ नाहीतर तुझ्या भावालाच संपवेन'; 12 वर्षाच्या मुलीवर घरी नेऊन केला बलात्कार, नवी मुंबईतील घटना

सर्व्हे - राहुल गांधींच्या लोकप्रियतेत वाढ, पण कर्नाटकच्या निकालानंतरही भाजपासाठी Good News

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2023 11:18 IST

सर्व्हेत सहभागी ४३ टक्के लोकांनी आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या नेतृत्वात एनडीएला तिसऱ्यांदा सत्ता मिळायला हवी असं तर ३८ टक्के लोकांनी विरोधात मतदान केले आहे.

नवी दिल्ली - कर्नाटकात काँग्रेसनं सत्ता मिळवल्यानंतर भाजपा आणि विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विरोधकांनी टीकेचा भडीमार केला आहे. मोदींची लाट राज्यात ओसरली का? राहुल गांधींच्या लोकप्रियतेत वाढ होतेय? यासारख्या विविध प्रश्नांवर लोकनीती-सीएसडीएस आणि एनडीटीव्हीने केलेल्या सर्व्हेमधून लोकांची मते जाणून घेतली आहेत. 

सर्व्हेनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी आजही देशातील सर्वात लोकप्रिय नेते आहेत. पंतप्रधानपदासाठीही लोकांची पहिली पसंती नरेंद्र मोदी आहेत. कर्नाटक निवडणुकीच्या निकालानंतर १९ राज्यात १० मे ते १९ मे या कालावधीत हा सर्व्हे करण्यात आला. कर्नाटकात दारूण पराभव झाल्यानंतरही या सर्व्हेमधून भाजपाला गुड न्यूज मिळाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लोकप्रियतेला धक्का पोहचला नाही त्याचसोबत पक्षाच्या मतदान टक्केवारीतही फारसा फरक दिसत नाही. 

सर्व्हेत सहभागी ४३ टक्के लोकांनी आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या नेतृत्वात एनडीएला तिसऱ्यांदा सत्ता मिळायला हवी असं तर ३८ टक्के लोकांनी विरोधात मतदान केले आहे. जर आज निवडणुका लागल्या तर ४० टक्के जनतेने भाजपाला मतदान देणार असल्याचे म्हटलं. तर २९ टक्के लोकांनी काँग्रेसला पसंती दर्शवली. २०१९ मध्ये भाजपाची मतदान टक्केवारी ३७ टक्के होती ती २०२३ मध्ये ३९ टक्के झाली आहे. परंतु काँग्रेसच्या मतदान टक्केवारीत १९ टक्क्यांवरून २९ टक्क्यांपर्यंत वाढ झाल्याचे दिसून येते. 

विशेष म्हणजे आज निवडणुका लागल्या तर पंतप्रधानपदासाठी ४३ टक्के लोकांनी नरेंद्र मोदींना पहिली पसंती दिली आहे. त्यानंतर दुसऱ्या नंबरवर राहुल गांधी आहेत. २७ टक्के लोकांनी राहुल गांधींच्या बाजूने मत व्यक्त केले आहे. ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल यांना अनुक्रमे ४ टक्के लोकांनी पसंती दाखवली आहे. अखिलेश यादव ३ टक्के तर नितीश कुमारांना १ टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे समर्थन करणाऱ्यांपैकी बहुतांश त्यांच्या भाषणाचे चाहते आहेत. विकासासाठी २० टक्के, हार्ड वर्कसाठी १३ टक्के, मोदींची लाट १३ टक्के आणि ११ टक्के मोदी सरकारच्या धोरणांना लोकांची पसंती आहे. २०२४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना टक्कर कोण देईल? हे लोकांना विचारले असता त्यानुसार ३४ टक्के लोकांनी राहुल गांधींचे नाव घेतले तर ११ टक्के अरविंद केजरीवाल, ५ टक्के अखिलेश यादव आणि ४ टक्के लोकांनी ममता बॅनर्जींची नाव घेतले. 

भारत जोडो यात्रेचा फायदा २६ टक्के लोकांनी आधीपासून राहुल गांधींना पसंत करत असल्याचे सांगितले. तर १५ टक्के लोकांनी भारत जोडो यात्रेनंतर राहुल गांधींना पसंत करण्यास सुरुवात केली आहे. १६ टक्के लोकांनी काँग्रेस नेत्यांना पसंत करत नसल्याचे सांगितले. ५५ टक्के लोक सरकारच्या कामगिरीवर समाधानी असल्याचे म्हटलं. तर ३८ टक्के लोकांनी काही अपवाद वगळता समाधानी आहोत असं म्हटलं. २१ टक्के लोकांनी सरकारच्या कामगिरीवर समाधानी नाही असं म्हटलं. लोकनीती-सीएसडीएसने ७१ लोकसभा मतदारसंघात ७२०२ लोकांमध्ये हा सर्व्हे केला.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपा