शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

नवज्योतसिंग सिद्धू यांना सक्तमजुरी; सुप्रीम कोर्टाने बदलला निकाल, एक वर्षाची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2022 05:22 IST

याप्रकरणी ४ वर्षांपूर्वी दिलेला स्वत:चा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने बदलला. 

बलवंत तक्षक, लोकमत न्यूज नेटवर्क

चंडीगड : कारकिर्दीच्या ऐन बहरात असताना मारहाणीदरम्यान एका ज्येष्ठ नागरिकाच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याच्या मुद्द्यावरून माजी क्रिकेटपटू व काँग्रेसचे नेते नवज्योतसिंग सिद्धू यांना सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. याप्रकरणी ४ वर्षांपूर्वी दिलेला स्वत:चा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने बदलला. 

१९८८ मध्ये पटियाळा येथे गाडी पार्किंगच्या मुद्द्यावरून नवज्योतसिंग सिद्धू आणि त्यांचा सहकारी यांचा गुरनामसिंग या ६५ वर्षे वयाच्या ज्येष्ठ नागरिकाशी वाद झाला होता. वादाचे पर्यवसान मारहाणीत झाले. मारहाणीत गुरनामसिंग जबर जखमी झाले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. गुरनाम यांच्या कुटुंबियांनी या प्रकरणी न्यायालयाकडे दाद मागितली. १९९९ मध्ये सत्र न्यायालयाने पुराव्यांअभावी सिद्धूना निर्दोष मुक्त केले होते. मात्र, उच्च न्यायालयाने २००६ मध्ये सिद्धू यांना तीन वर्षांचा तुरुंगवास व एक लाख रुपयांचा दंड ठोठावला होता.

सर्वोच्च न्यायालयाने २०१८ मध्ये १ हजार रुपयांचा दंड ठोठावून सिद्धूना सोडून दिले होते. मात्र, न्या. ए. एम. खानविलकर आणि न्या. एस. के. कौल यांच्या खंडपीठाने याप्रकरणाची पुनर्विचार याचिका स्वीकारत गुरुवारी वरील निकाल दिला.

न्यायालयाचे निरीक्षण...

यापूर्वी केवळ दंड ठोठावताना काही तथ्ये दुर्लक्षित राहिली. हात हेदेखील एक शस्त्र असू शकते. एखादा मुष्टीयोद्धा, मल्ल, क्रिकेटपटू किंवा इतर दणकट व्यक्ती जबर ठोसा मारु शकतो. सिद्धू त्यावेळी उंचपुरे आणि दणकट होते. ते आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू होते. आपल्या ठोशातील शक्तीची त्यांना जाणीव होती. त्यामुळे ते सूटू शकत नाहीत.

न्यायालयाचा निर्णय मान्य

सिद्धू यांनी ट्विट करून सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय मान्य करत न्यायदेवतेपुढे समर्पण करणार असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. परंतु शिक्षेविरोधात क्युरेटिव्ह याचिका दाखल करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

घडून गेलेल्या घटनेवेळी संबंधिताचा राग अनावर झालाही असेल. परंतु राग अनावर झाल्याने घडलेल्या घटनेचे परिणामही भोगावे लागतील. कोणत्याही प्रकारची सहानुभूती दाखवून अपुरी शिक्षा ठोठावल्यास न्यायसंस्था आणि लोकांचा कायद्यावरील विश्वास यांना तडा जाऊ शकतो.  - सर्वोच्च न्यायालय 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयNavjot Singh Sidhuनवज्योतसिंग सिद्धू