शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
3
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
4
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
5
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
6
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
7
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
8
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
9
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
10
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
11
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
12
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
13
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
14
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
15
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
16
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
17
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
18
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
19
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
20
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना

Maharashtra Political Crisis: शिवसेनेला मोठा दिलासा! सुप्रीम कोर्टाने मान्य केली ‘ती’ विनंती; शिंदे गटाचे टेन्शन वाढणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2022 15:40 IST

Maharashtra Political Crisis: निवडणूक आयोगाने दिलेले निर्देशांमुळे सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा भंग होतो, असे शिवसेनेने म्हटले आहे.

नवी दिल्ली: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वातील गटाने मूळ शिवसेना म्हणून मान्यता मिळविण्यासाठी निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. त्यावर निवडणूक आयोगाने केलेल्या कार्यवाहीविरुद्ध शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या गटाकडून सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यात आली आहे. शिवसेनेची याचिका सर्वोच्च न्यायालयाने दाखल करून घेतली असून, या याचिकेवर सुनावणीसाठी तयारी दर्शवली आहे. ही याचिका अन्य याचिकांसह ०१ ऑगस्ट रोजी सुनावणीसाठी सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठासमोर येणार असल्याचे सांगितले जात आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, निवडणूक आयोगाने अलीकडेच शिवसेनेच्या दोन्ही गटांना पक्ष आणि निवडणूक चिन्ह यावर आपआपले म्हणणे सादर करण्यासाठी ८ ऑगस्टपर्यंत दस्तऐवज जमा करण्याचे निर्देश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे सरचिटणीस सुभाष देसाई यांनी ही याचिका दाखल केली आहे. निवडणूक आयोगाला पक्षकार बनविण्यासाठी परवानगी मागण्यात आली आहे. तर, ठाकरे गटाने निवडणूक आयोगाला पत्र लिहून सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित याचिकांच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाच्या अर्जावर सध्या सुनावणी घेऊ नये, अशी मागणी केली आहे. ताज्या याचिकेत उद्धव ठाकरे यांच्या गटाने म्हटले आहे की, शिंदे गटाकडून पक्ष आणि चिन्हाबाबत करण्यात आलेली मागणी म्हणजे त्यांचा उतावळेपणा आहे. 

हा न्यायालयाच्या ‘जैसे थे’ आदेशाचा भंग

अशा पद्धतीने कागदपत्रांची मागणी करणे हा न्यायालयाच्या ‘जैसे थे’ आदेशाचा भंग होतो, असे शिवसेनेचे म्हणणे आहे. त्यामुळे न्यायालयाने निवडणूक आयोगाच्या कृतीची दखल घेऊन सुनावणी स्थगित करावी, अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात आली होती. तत्पूर्वी, सोमवारीच हा अर्ज दाखल करण्यात येणार होता. मात्र, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या शपथविधीसाठी सरन्यायाधीश एन. व्ही. रमण संसद भवनात असल्यामुळे हा अर्ज मंगळवारी दाखल केला जाईल, अशी माहिती शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांनी दिली होती. 

दरम्यान, शिवसेनेच्या ४० आमदारांनी तसेच, लोकसभेतील १२ खासदारांनी बंडखोरी केली आहे. मात्र, ही बंडखोरी नसून, आमचा पक्ष खरी शिवसेना आहे, असा दावा शिंदे गटाने केला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिंदे गट आणि भाजप युती सरकारला शपथही दिली आहे. लोकसभाध्यक्षांनीही १२ खासदारांच्या बहुमताच्या पाठिंब्यावर गटनेता बदलण्यासही मान्यता दिली आणि विनायक राऊत यांच्याऐवजी राहुल शेवाळे यांची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर शिंदे गटाने निवडणूक आयोगाकडे धाव घेत निवडणूक चिन्हावर हक्क सांगितला होता. 

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळSupreme Courtसर्वोच्च न्यायालयShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदे