शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

घनकचरा व्यवस्थापनेतील उदासीनतेमुळे महाराष्ट्रात बांधकामांना बंदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2018 08:51 IST

सुप्रीम कोर्टाकडून अनेक राज्यांची कानउघाडणी

नवी दिल्ली : घन कचरा व्यवस्थापनाबद्दल धोरण न आखल्यानं सर्वोच्च न्यायालयानं महाराष्ट्रासह अनेक राज्यांची कानउघाडणी केली आहे. कचरा व्यवस्थापनाबद्दल बहुतांश राज्यांची आणि केंद्रशासित प्रदेशांची भूमिका अतिशय निराशाजनक असल्याचं न्यायालयानं म्हटलं. महाराष्ट्रासह अनेक राज्यांनी अद्याप घन कचरा व्यवस्थापनासाठी कोणतंही धोरण आखलेलं नाही. त्याबद्दल न्यायालयानं तीव्र शब्दांमध्ये नाराजी व्यक्त केली. घन कचरा व्यवस्थापनासाठी धोरण न आखल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयानं महाराष्ट्रासह अनेक राज्यांमधील बांधकामांना स्थगिती दिली आहे. घन कचरा व्यवस्थापनाचं धोरण आखण्यात दिरंगाई करणाऱ्या सर्व राज्यांना न्यायालयानं 3-3 लाखांचा दंड ठोठावला आहे. राज्य सरकारांकडून प्रतिज्ञापत्रं सादर करण्यात न आल्यानं हा दंड ठोठावण्यात आला. लोकांनी अस्वच्छ वातावरणात आणि कचऱ्यात राहावं असं जर राज्य सरकारांना वाटत असेल, तर आम्ही काय करु शकतो, अशा शब्दांमध्ये न्यायालयानं नाराजी व्यक्त केली. 'महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तराखंड, चंदिगढ यांच्यासारख्या राज्यांनी घन कचरा व्यवस्थापनासाठी अद्याप धोरण आखलेलं नाही. दोन वर्षांपासून यासाठी आग्रह धरला जात आहे. मात्र तरीही काही राज्यं याबद्दल उदासीन आहेत,' असं न्यायालयानं म्हटलं. राज्य सरकारं लोकांच्या हिताचा विचार करत असतील, त्यांना शहरं स्वच्छ ठेवायची असतील, तर त्यांनी घन कचरा व्यवस्थापनासाठी धोरण आखायला हवं, असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं. राज्य सरकारांनी ही बाब गंभीरपणे घ्यावी. जोपर्यंत राज्य सरकारांकडून घन कचरा व्यवस्थापनासाठी धोरण तयार केलं जात नाही, तोपर्यंत बांधकामांवरील स्थगिती कायम असेल, असं म्हणत न्यायालयानं आपली भूमिका स्पष्ट केली.  

टॅग्स :Real Estateबांधकाम उद्योगSupreme Courtसर्वोच्च न्यायालयGarbage Disposal Issueकचरा प्रश्न