शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

Supreme Court: मूलभूत अधिकाराचा हक्क त्यांनाच मिळणार जे, कायदा-नियम पाळणार; महाराष्ट्रातील खटल्यावर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2022 12:07 IST

Supreme Court on fundamental rights: प्रकरण महाराष्ट्रातील होते. आरोपीने मकोका कायद्याच्या वापरामुळे आपल्या मुलभूत अधिकारावर गदा येत असल्याचा दावा केला होता.

सर्वोच्च न्यायालयाने नागरिकांच्या मुलभूत अधिकारांबाबत एक महत्वाचा निर्णय दिला आहे. जे लोक कायद्याचा सन्मान करतील, नियमांचे पालन करतील त्यांनाच मुलभूत अधिकाराच्या नावाखाली संरक्षण दिले जाईल, असे म्हटले आहे. एका खटल्याच्या सुनावणीवेळी न्यायालयाने ही टिप्पणी केली आहे. सोशल मीडियावर सध्या आक्षेपार्ह पोस्ट टाकल्या जात आहेत, यामुळे न्यायालयाचा हा निर्णय महत्वाचा मानला जात आहे. 

न्यायालयीन प्रक्रियेचे पालन करणाऱ्या व्यक्तीलाच मुलभूत हक्कांच्या संदर्भात कोणताही दावा करण्याचा हक्क आहे, इतरांना नाही, असे न्यायमूर्ती दिनेश माहेश्‍वरी आणि अनिरुद्ध बोस यांच्या खंडपीठाने म्हटले आहे. गेल्या आठवड्यात एका प्रकरणात त्यांनी यावर निकाल दिला. प्रकरण महाराष्ट्रातील होते. राज्य सरकारने एका आरोपीवर मकोका लावला होता. त्याला त्याने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. न्यायालयाच्या या निर्णयाचा परिणाम आता भविष्यातील घटनांवर दिसण्याची शक्यता आहे. भविष्यात कोर्टासमोर येणाऱ्या प्रकरणांमध्ये या खटल्याचा दाखला घेतला जाऊ शकतो. 

आरोपीने मकोका कायद्याच्या वापरामुळे आपल्या मुलभूत अधिकारावर गदा येत असल्याचा दावा केला होता. तसेच मकोका हटविण्याची मागणी केली होती. यावर माहेश्वरी यांनी निर्णय देताना चांगलेच फटकारले आहे. ज्या व्यक्तीला फरार घोषित केले जाते आणि जो तपास यंत्रणांच्या हाती येत नाही, तो सामान्यतः कोणत्याही सवलतीचा हक्कदार नाही, असे निकालामध्ये म्हटले आहे. सामान्य प्रकरणांमध्ये आरोपीला अटकपूर्व जामिनासाठी कोणत्याही न्यायालयात जाण्याचा अधिकार आहे. यासाठी, तो फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 438 चा संदर्भ देऊन न्यायालयात जाऊ शकतो, असेही त्यांनी म्हटले.

परंतू पोलिसांनी एखाद्याला फरार किंवा मुद्दामहून गुन्हे करणारा असे घोषित केल्यास त्याला ४३८ कलम वापरता येणार नाही. घटनेच्या कलम १३६ नुसार कलम ४३८ अंतर्गत आरोपीच्या मागण्यांवर विचार करण्याचा अधिकार आहे. मात्र, अपीलकर्त्यावर गंभीर आरोपांनुसार गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्याच्या अपीलवर दिलासा देता येणार नाही, असे म्हणत न्यायालयाने आरोपीचा अर्ज फेटाळला. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या आदेशाला आरोपींनी आव्हान दिले होते. उच्च न्यायालयाने नागपूरच्या एडीजी पोलिसांचा निर्णय कायम ठेवला होता.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयCrime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर