शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
2
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
3
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
4
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
5
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
6
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
7
२४ तास उलटूनही आग शमेना, अजूनही येतायत स्फोटांचे आवाज! केरळच्या समुद्रात सुरू आहे मोठं रेस्क्यू ऑपरेशन
8
Raj Kushwaha : "माझा मुलगा २० वर्षांचा, पोलीस खोटं बोलताहेत"; सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाहच्या आईचा दावा
9
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!
10
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
11
Vat Purnima Vrat 2025: वट पौर्णिमेची पूजा झाली, पण घाईघाईत कथा वाचायची राहून गेली? वाचा 'ही' कथा!
12
फक्त या कारणामुळे आशुतोष राणाने रेणुका शहाणेसोबत केलं लग्न, २४ वर्षांनंतर अभिनेत्रीचा खुलासा
13
"मला लग्नच करायचं नव्हतं...", उषा नाडकर्णींनी पहिल्यांदाच लग्नावर केलेलं भाष्य
14
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
15
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
16
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
17
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
18
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
19
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
20
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?

मणिपूर व्हायरल व्हिडिओवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीला सुरुवात, CJI म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2023 15:39 IST

मणीपूर व्हायरल व्हिडिओप्रकरणी सोमवारपासून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू झाली आहे.

मणिपूरमधील महिलेची नग्नावस्थेत धिंड काढल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर देशभरातून संतापाची लाट उसळली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही यावर भाष्य करताना आरोपींना सक्तीची आणि कायदेशीर ताकदीचा वापर करुन शिक्षा दिली जाईल, त्यांना सोडणार नाही, असे म्हटले होते. विशेष म्हणजे या व्हिडिओनंतर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि राज्य सरकारला खडेबोल सुनावले होते. त्यानंतर, याप्रकरणी आरोपींना अटक करण्यात आली आहे. आता, पीडित महिलांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असून आजपासूनच सुनावणीला सुरुवात झाली आहे.  

मणिपूर व्हायरल व्हिडिओप्रकरणी सोमवारपासून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू झाली आहे. सरन्यायाधीश डी. जे चंद्रचूड यांनी यावर निरीक्षण नोंदवले आहे. या घटनेबाबत आम्हाला व्हिडिओ पाहिल्यानंतरच समजले. मात्र, समाजातील ही पहिलीच घटना नसून महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी एक मजबूत व्यवस्था उभारण्याची गरज असल्याचं चंद्रचूड यांनी म्हटलं. तसेच, दोन्ही पक्षाची बाजू ऐकून घेतली जाईल, त्यानंतरच निर्णय देण्यात येईल. कारण, सद्यस्थितीत आमच्याकडे कुठलाही पुरावा नाही, असेही सीजेआय यांनी म्हटलं आहे. 

पीडित महिलांच्यावतीने ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी न्यायालयात बाजू मांडली. याप्रकरणी पीडित महिलांकडून सीबीआय तपासाला आणि आसाम राज्यात प्रकरण नेण्यास विरोध असल्याचं सिब्बल यांनी म्हटलं. तसेच, पोलिसांनी पीडित महिलेसोबत अत्याचार करणाऱ्यांना साथ दिली आहे. पोलिसांनीच या महिलांना गर्दीच्या हवाली केल्याचंही सिब्बल यांनी न्यायालयात सांगितलं. दरम्यान, सरकारी पक्षाच्यावतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनीही, आसाम राज्यात हे प्रकरण नेण्याची आमची मागणीच नसल्याचं स्पष्ट केलं. केवळ मणिपूर बाहेर स्थलांतरीत करावा, अशी आमची मागणी असल्याचं मेहता यांनी सांगितलं. 

काँग्रेस खासदारांची मणीपूरला भेट

मणिपूरमध्ये “अनिश्चितता आणि भीती” मोठ्या प्रमाणात पसरत आहे आणि केंद्र आणि राज्य सरकार तेथील “अत्यंत गंभीर” परिस्थितीला तोंड देण्यासाठी कोणतीही ठोस पावले उचलत नाही, असा आरोप काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी रविवारी विरोधी आघाडीचे शिष्टमंडळ परतल्यानंतर केला. मणिपूरमधील परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. हजारो लोक बेघर झाले आहेत. ते त्यांच्या घरी कधी परततील हे त्यांना माहीत नाही. शेतीतील कामे ठप्प झाली आहेत, असेही त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचारSupreme Courtसर्वोच्च न्यायालयkapil sibalकपिल सिब्बलPoliceपोलिस