शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

१३४ वर्षांची लढाई, ५ न्यायाधीश; राम मंदिर निकालावर एकमत कसे झाले? CJI चंद्रचूड म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2024 13:03 IST

CJI DY Chandrchud Reaction On Ram Mandir Verdict: श्रीरामजन्मभूमी वादाबाबत सुप्रीम कोर्टाने ऐतिहासिक निर्णय दिला. त्यावेळी नेमके काय झाले, याबाबत सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी भाष्य केले.

CJI DY Chandrchud Reaction On Ram Mandir Verdict: २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येत राम मंदिरात रामलला प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशभरातून सुमारे ७ ते ८ हजार मान्यवर या भव्य सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. श्रीराम दर्शनाची आस देशवासीयांना लागली आहे. यातच राम मंदिर निकालाबाबत सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी प्रतिक्रिया दिली. राम मंदिर निकालावर पाच सदस्यीय खंडपीठाचे एकमत कसे झाले, यावर सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी सांगितले.

अनेक दशकांपासून देशाच्या राजकारणात चर्चेत असलेल्या जुन्या श्रीरामजन्मभूमी-बाबरी मशीद वादावर सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय दिला. ९ नोव्हेंबर २०१९ रोजी सर्वोच्च न्यायालयाने आपला निर्णय दिला. देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने वादग्रस्त जमिनीवर राम मंदिराच्या उभारणीचा मार्ग मोकळा करून ट्रस्टकडे सोपवण्याचा आदेश दिला होता. केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकारांना मशीद बांधण्यासाठी सुन्नी वक्फ बोर्डाला पर्यायी ५ एकर जमीन देण्यास सांगितले. याबाबत एका मुलाखतीत बोलताना सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी सविस्तर भाष्य केले.

५ न्यायाधीश; राम मंदिर निकालावर एकमत कसे झाले?

साधारणतः जुन्या रामजन्मभूमी-बाबरी मशीद वादावर अंतिम निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने, या खटल्याला विविध  दृष्टिकोनांचा, संघर्षाचा दीर्घ इतिहास आहे. खंडपीठाचा भाग असलेल्या सर्वांनी ठरवले की, हा न्यायालयाचा निर्णय असेल. अयोध्या जमीन खटल्याच्या निकालाचा अंतिम परिणामच नव्हे, तर हा निकाल देण्याच्या कारणांमध्येही सर्वजण एकत्र असल्याचा स्पष्ट संदेश देण्यासाठी एकमुखी निकाल देण्याचे  सर्व न्यायाधीशांनी एकमताने निश्चित केले. या खटल्यास वादाची प्रदीर्घ पार्श्वभूमी होती आणि दोन्ही बाजूंना देशाच्या इतिहासाशी संबंधित टोकाची मते होती. अयोध्या खटल्याचा निकाल देणाऱ्या पाच न्यायमूर्तींनी या निर्णयात कोणत्याही न्यायमूर्तींचे नाव दिले जाणार नाही, असा निर्णय सर्वानुमते घेतला होता. कारण यामुळे हा निकाल कोणी लिहिला, त्या न्यायमूर्तींचे नाव समजणारच नाही, असे सीजेआय चंद्रचूड यांनी सांगितले. 

दरम्यान, राम मंदिर जन्मभूमीचा वादाची न्यायालयीन लढाई १३४ वर्षांपासून सुरू होती, असे सांगितले जाते. अयोध्या खटल्याचा निकाल देण्यासाठी पाच न्यायमूर्तींचे घटनापीठ तयार करण्यात आले होते. त्यात तत्कालीन सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्या. शरद अरविंद बोबडे, न्या. अशोक भूषण, न्या. अब्दुल नजीर आणि विद्यमान सरन्याधीश धनंजय चंद्रचूड होते.  

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याSupreme Courtसर्वोच्च न्यायालयDY Chandrachudडी. वाय. चंद्रचूड