शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Lakhimpur Kheri Incident: “लखीमपूर हिंसाचारप्रकरणी किती जणांना अटक केली?”; सुप्रीम कोर्टाची योगी सरकारला नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2021 14:36 IST

Supreme Court on Lakhimpur Kheri Incident: लखीमपूर हिंसाचारप्रकरणावरील जनहित याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) उत्तर प्रदेशामधील योगी सरकार नोटीस बजावली आहे.

नवी दिल्ली:उत्तर प्रदेशमधील लखीमपूर जिल्ह्यात शेतकरी आंदोलन करत असताना शिरलेली कार, त्यात झालेले मृत्यू आणि या दुर्घटनेनंतर उसळलेला हिंसाचार (Lakhimpur Kheri Incident) या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाने स्वतः दखल घेत जनहित याचिका दाखल करून घेतली. या याचिकेवर झालेल्या सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) उत्तर प्रदेशामधील योगी सरकार नोटीस बजावली आहे. तसेच लखीमपूर हिंसाचारप्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांनी किती जणांना अटक केली, अशी विचारणा केली आहे.

सर्वोच्च न्यायालयात या याचिकेवरील सुनावणीवेळी उत्तर प्रदेश सरकारकडून गरिमा प्रसाद यांनी बाजू मांडली. लखीमपूर हिंसाचारप्रकरणी FIR नोंदवण्यात आला आहे. याशिवाय उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या नेतृत्वाखाली तपास पथक नेमण्यात आले आहे, अशी माहिती न्यायालयाला दिले. यानंतर सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांनी योगी सरकारला नोटीस बजावत विस्तृत रिपोर्ट सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

लखीमपूर हिंसाचारप्रकरणी किती जणांना अटक केली?

लखीमपूर हिंसाचारप्रकरणी किती जणांना अटक केली, आतापर्यंत कोणती कारवाई करण्यात आली, यासंदर्भात विस्तृत रिपोर्ट सादर करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले असून, यावेळी या हिंसाचारात मृत्यू पावलेल्या लवप्रीत सिंग यांच्या आईला सर्वतोपरी मदत करावी, असेही न्यायालयाने योगी सरकारला सांगितले आहे. आपल्या मुलाच्या मृत्यूची बातमी ऐकून त्या आईला मोठा धक्का बसून त्या आजारी पडल्या आहेत. 

दरम्यान, लखीमपूर हिंसाचारात चार शेतकऱ्यांसह एकूण आठ जणांचा मृत्यू झाला असून, यामध्ये भाजप कार्यकर्ते, एक चालक आणि एका पत्रकाराचा समावेश आहे. या घटनेनंतर आतापर्यंत योगी सरकारने एकालाही अटक केलेली नाही. यावरून विरोधकांनी गृह राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांच्या राजीनाम्याची मागणी केली असून, शेतकरी नेत्यांनी देशव्यापी आंदोलनाचा इशारा दिला आहे. दुसरीकडे, लखीमपूर खिरी येथील हिंसाचारात मरण पावलेल्या शेतकऱ्यांना ४५ लाख आणि जखमींना १० लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. 

टॅग्स :Lakhimpur Kheri Violenceलखीमपूर खीरी हिंसाचारSupreme Courtसर्वोच्च न्यायालयUttar Pradeshउत्तर प्रदेशyogi adityanathयोगी आदित्यनाथ