शहरं
Join us  
Trending Stories
1
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! बॉम्बस्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
2
Video: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
कुणाचा हात तुटून पडला, कुणाचा कोथळा बाहेर आला; प्रत्यक्षदर्शीने सांगितली दिल्ली स्फोटाची हादरवून टाकणारी घटना
4
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
5
भयानक कोसळणार ...! मी १९७१ पासून सोने खरेदी करतोय, पण...; रॉबर्ट कियोसाकी यांच्या दाव्याने खळबळ 
6
दहशतवाद्यांच्या टोळीत महिला डॉक्टरही सामील, थेट पाकिस्तानशी कनेक्शन; कारमध्ये घेऊन फिरत होती एके ४७!
7
जडेजाला संघाबाहेर काढण्यात धोनी सगळ्यात पुढे असेल! माजी क्रिकेटरनं त्यामागचं कारणही सांगून टाकलं
8
भारताच्या शेजारी देशांत भरतो 'नवरीचा बाजार', खरेदी करण्यासाठी चीनमधून येतात लोक! काय आहे प्रकार?
9
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
10
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
11
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
12
"मी तुझ्या बापाला मारलं, मृतदेह सुटकेसमध्ये..."; बायकोने नवऱ्याला संपवलं, लेकीला केला फोन
13
Honeymoon Destinations : गुलाबी थंडीत रोमँटिक हनिमून प्लॅन करताय? भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट!
14
"पंक्चर बनवणारे येऊन...!", बिहारमध्ये योगी आदित्यनाथांची तुफान बॅटिंग; विरोधकांवर थेट हल्लाबोल
15
"जबरदस्तीनं मिठीत घ्यायचा, शारीरिक जवळीक साधायचा, अन्..."; महिला क्रिकेटरच्या आरोपांनी खळबळ
16
धर्मेंद्र यांच्या तब्येतीबद्दल कळताच हेमा मालिनी रुग्णालयात पोहोचल्या, म्हणाल्या, "आम्ही सगळेच..."
17
मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढणार तर उद्धव ठाकरेंसोबत युतीआधीच मनसेने 'इतक्या' जागांची केली तयारी
18
'या' मुस्लिम देशाची अमेरिकेशी वाढतेय जवळीक! ब्लॅकलिस्टमधून बाहेर पडताच, ८० वर्षांनी अमेरिकेत एन्ट्री
19
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना बंद होणार? एकनाथ शिंदेंकडून मोठी घोषणा, e-KYC देखील...
20
धक्कादायक! बाथरूममध्ये आंघोळीसाठी गेली, पण तासभर बाहेरच नाही आली; दरवाजा तोडला तर...

आरक्षण मर्यादा वाढविण्यासाठी राज्यांचा पाठिंबा; सुप्रीम कोर्टात ३ राज्य एकवटली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2021 04:22 IST

मराठा आरक्षण : सुप्रीम कोर्टात तमिळनाडू, कर्नाटक, उत्तर प्रदेशची भूमिका

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयात बुधवारी तामिळनाडू, कर्नाटक, उत्तर प्रदेश व इतर राज्यांनी आरक्षणाबाबत बाजू मांडली आणि सर्व राज्यांनी ५० टक्के आरक्षणाची मर्यादा वाढवणे योग्य आहे, असा युक्तिवाद केला. याचाच अर्थ महाराष्ट्रामधील मराठा आरक्षणाला या सर्व राज्यांनी समर्थन दिले, असा काढला जात आहे. मराठा आरक्षणाच्या वतीने काही लोकांनी युक्तिवाद केला व गुरुवारी पुन्हा एकदा सुनावणी ठेवण्यात येणार आहे.

महाराष्ट्र सरकारचा मराठा आरक्षणाचा कायदा संवैधानिक असल्याचे केंद्र सरकारने मंगळवारी स्पष्ट केले होते. केंद्र सरकारच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सुप्रीम कोर्टात बाजू मांडली. १०२ व्या घटना दुरुस्तीच्या मुद्यावर हा कायदा संवैधानिक असल्याचं केंद्र सरकारने म्हटले. याआधी ॲटर्नी जनरल के.के. वेणूगोपाल यांनी कायदेतज्ञ म्हणून आपले मत व्यक्त केले होते. 

१०२ व्या घटना दुरुस्तीनुसार राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाची स्थापना झाली. मात्र, या त्यानंतरही राज्यांना आरक्षणासंदर्भातील अधिकार कायम असल्याचे एक प्रकारे केंद्र सरकारने म्हटले. ५० टक्के आरक्षण मर्यादेच्या मुद्यावर महाराष्ट्राला अनेक राज्यांनी पाठिंबा दिला. बिहार, झारखंड, कर्नाटक पंजाब, राजस्थान, तमिळनाडू, आंध्र प्रदेश या राज्यांनी कोर्टात अधिकृत भूमिका मांडताना ५० टक्क्यांवर आरक्षणाचे समर्थन केले.

तो निकाल एकमताचा नव्हतातमिळनाडू, छत्तीसगढ, कर्नाटकची बाजू मांडताना ज्येष्ठ विधिज्ञ मुकुल रोहतगी म्हणाले की, आरक्षण ५० टक्क्यांहून अधिक असू नये, हा इंद्रा सहानी प्रकरणात न्यायालयाचा निकाल एकमताचा नव्हता. 

आरक्षणाचे प्रमाण किती व कसे असावे, यावरून न्यायाधीशांमध्ये भिन्न मते होती. त्यामुळे ५० टक्क्यांचा आग्रह धरता येणार नाही किंवा तेवढ्याच मर्यादेचे समर्थनही करता येणार नाही. घटनेतील कलम ३७१ (जे) चा संदर्भ हैदराबाद-कर्नाटकपुरता आहे. आणि ते नंतरही आलेले आहे. सिक्कीमसाठीही वेगळी तरतूद आहे. भारत देशात सर्व गोष्टी एकसंघ आहेत.

वेगळा विचार करण्याची गरजकेरळची बाजू मांडताना विधिज्ञ जयदीप गुप्ता म्हणाले की, ५० टक्क्यांची मर्यादा वाढविण्यावर आता विचार व्हावा. कारण इंद्रा सहानी प्रकरणावेळी केवळ ऐतिहासिकदृष्ट्या मागास समोर ठेवण्यात आले होते. आर्थिकदृष्ट्या मागास वर्ग (ईडब्ल्यू  एस) समोर नव्हता. त्याचा वेगळा विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. ईडब्ल्यू  एस म्हणजे ५० टक्क्यांचा भाग समजला जाऊ नये.

 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयMaratha Reservationमराठा आरक्षण