शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

'सोमनाथ मंदिराच्या सोहळ्यात नेहरू आले नव्हते', BJP नेत्याने काँग्रेसच्या बहिष्कारांची यादीच वाचली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2024 14:58 IST

BJP Press conference: काँग्रेसने राम मंदिर सोहळ्यावर बहिष्कार टाकल्यावरुन भाजप नेते सुधांशु त्रिवेदी यांनी जोरदार हल्लाबोल केला.

BJP Questions Congress Boycott Politics: अयोध्येत होणाऱ्या श्रीराम मंदिराचे (Ram Mandir) उद्घाटन आणि रामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावर काँग्रेसने (Congress) बहिष्कार टाकला आहे. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी (Sudhanshu Trivedi) यांनी गुरुवारी (11 जानेवारी) काँग्रेसने बहिष्कार टाकलेल्या सर्व कार्यक्रमांची यादीच वाचली. त्रिवेदी म्हणाले की, 'काँग्रेसवाले नेहमी नकारात्मक राजकारण करतात आणि प्रत्येक गोष्टीवर बहिष्कार टाकतात. त्यामुळेच देशातील जनतेनेही काँग्रेसवर बहिष्कार टाकला आहे. भारताचा इतिहास पाहिला तर कॉंग्रेसने प्रत्येक चांगल्या गोष्टींवर बहिष्कार टाककला आहे.'

'काँग्रेसच्या काळात अनेक घटना घडल्या'काँग्रेस पक्षाच्या इतिहासाचा संदर्भ देत सुधांशू त्रिवेदी म्हणाले की, 'इंदिरा गांधींच्या काळात कारसेवकांवर गोळ्या झाडल्या गेल्या. राजीव गांधी आणि पीव्ही नरसिंहराव यांच्या काळात तर काय नाही ते घडले आणि सोनिया गांधींच्या काळात तर चक्क राम काल्पनिक झाले. हीच काँग्रेसची संस्कृती आहे आणि राम मंदिराला विरोध, हाही त्याचाच एक भाग आहे. बाबरीचे समर्थक राम मंदिराच्या कार्यक्रमात येत आहेत, पण काँग्रेसवाले विरोध करत आहेत.'

'सोमनाथ मंदिरात नेहरू उपस्थित नव्हते''सोमनाथ मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा सुरू होता, तेव्हा जवाहरलाल नेहरुंनी 24 एप्रिल 1951 रोजी तत्कालीन सौराष्ट्र प्रमुखांना पत्र लिहिले होते. त्या पत्रात नेहरु म्हणाले की, या कठीण काळात हा सोहळा होतोय, यासाठी मी दिल्लीहून येऊ शकत नाही. या सोहळ्यामुळे मला खूप त्रास झाला आहे. माझ्यासाठी हे खूप वेदनादायक आहे की, राष्ट्रपती, माझे काही मंत्री आणि तुम्ही या सोहळ्यात उपस्थित आहात. मला वाटते की हे माझ्या देशाच्या प्रगतीसाठी हानिकारक आहे. याचे परिणाम चांगले होणार नाहीत, असे नेहरुंनी पत्रात म्हटल्याचे त्रिवेदी म्हणाले.

'नवीन संसद भवन, अभिभाषण, कारगिलवर बहिष्कार टाकला'त्रिवेदी पुढे म्हणाले की, 'काही महिन्यांपूर्वी काँग्रेसने संसदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनावर बहिष्कार टाकला होता. जीएसटी लागू झाला तेव्हाही बहिष्कार टाकला. जी-20 दरम्यान जगातील 20 शक्तिशाली देशांचे राष्ट्रप्रमुख आले होते. यावेळी राष्ट्रपतींनी आयोजित केलेल्या भोजनाच्या कार्यक्रमावरही कॉंग्रेसने बहिष्कार टाकला होता. राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि आता द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावरही काँग्रेसने बहिष्कार टाकला. 2004 नंतर 2009 पर्यंत काँग्रेसने कारगिल विजय दिवसावर बहिष्कार टाकला.'

'अणुचाचणीवर मौन, प्रणव मुखर्जींच्या सन्मानावरही बहिष्कार''मे 1998 मध्ये अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या पोखरण अणुचाचणीनंतर काँग्रेसने 10 दिवस कोणतेही वक्तव्य केले नाही. इतकंच काय, माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या भारतरत्न समारंभावरही काँग्रेसने बहिष्कार टाकला होता. प्रणव मुखर्जी त्यांच्याच पक्षाचे होते ना? आता काही ठराविक लोकांच्या मतांसाठी काँग्रेस राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमावर बहिष्कार टाकत आहे. काँग्रेसने राम मंदिरावर बहिष्कार टाकला, त्यामुळे आता जनता त्यांच्यावर बहिष्कार टाकल्याशिवाय राहणार नाही,' अशी टीका त्रिवेदी यांनी केली.

टॅग्स :BJPभाजपाcongressकाँग्रेसRam Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याUttar Pradeshउत्तर प्रदेशJawaharlal Nehruजवाहरलाल नेहरूSonia Gandhiसोनिया गांधीRahul Gandhiराहुल गांधी