शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट प्रकरण: डझनभर डॉक्टरांचे फोन बंद; 'अल फलाह' विद्यापीठातील मोठे नेटवर्क उघड
2
टीम इंडियासमोर दक्षिण आफ्रिकेची कमाल! 'लो स्कोअरिंग' टेस्टमध्ये बेस्ट कामगिरीसह मारली बाजी
3
‘वंदे भारत’च्या मदतीला TATA कंपनी? ट्रेन बांधणीत ठरणार गेम चेंजर! ‘मेक इन इंडिया’ वेग घेणार
4
“काही ठिकाणी महायुती झाली, कुठे नाही, परवापर्यंत सगळे समजेल”: CM फडणवीसांनी केले स्पष्ट
5
Rohini Acharya : "मला घाणेरड्या शिव्या दिल्या, मारायला चप्पल उचलली, आई-वडिलांना..."; रोहिणी यांची भावुक पोस्ट
6
प्यार किया तो डरना क्या! ८३ वर्षीय आजीच्या प्रेमात वेडा झाला २३ वर्षांचा तरुण, कुटुंबाने दिली साथ
7
याला म्हणतात धमाका शेअर...! फक्त 2 वर्षांत दिला 16000% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल आता 5 बोनस शेअर वाटणार कंपनी
8
जैश टेरर मॉड्यूलवर मोठी कारवाई: अनंतनागमध्ये छाप्यानंतर हरियाणाची महिला डॉक्टर ताब्यात
9
अ‍ॅसिड फेकलं, छतावरुन ढकललं; 'तो' वाद टोकाला गेला, नवरा थेट बायकोच्या जीवावर उठला
10
Mumbai: वाकोला ते बीकेसी उन्नत मार्गाचे ८० टक्के काम पूर्ण; लवकरच वाहतुकीसाठी खुला होणार!
11
गोरखपूरमध्ये उभारलं जातंय जागतिक दर्जाचे विज्ञान उद्यान; योगी सरकारने घेतला मोठा निर्णय
12
National Jamboree: ६१ वर्षांनंतर लखनौत ऐतिहासिक 'राष्ट्रीय जंबोरी'; ३२,००० हून अधिक स्काउट्स होणार सहभागी
13
घरबसल्या पैसे दुप्पट कसे होतील? तेजस्वी प्रकाशने सांगितला फॉर्म्युला, मुलींना दिला आर्थिक सल्ला
14
Mumbai: मुंबई महापालिकेच्या ३०० कोटींच्या उद्यान देखभालीच्या निविदा प्रक्रियेत संशयाच्या भोवरा
15
बिहार निवडणूक; 'या' मतदारसंघात भाजप उमेदवाराचा अवघ्या 30 मतांनी पराभव
16
IPL 2026 : रवींद्र जडेजाच्या पगारात ४ कोटींची कपात होण्यामागचं कारण काय? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
17
Tata Sierra आता नव्या रुपता! मिळणार ट्रिपल स्क्रीन सेटअप अन् अ‍ॅडव्हॉन्स फीचर्स, किती असेल किंमत? जाणून घ्या सविस्तर
18
BMC Election: सर्वपक्षीय १२८ माजी नगरसेवकांसाठी शिंदेसेनेला पालिकेत हव्या १२५ जागा!
19
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: कसे कराल व्रत? शिवशंकर देतील शुभाशिर्वाद, कल्याण-मंगलच होणार!
20
Cyber Security: सर्वांचा डेटा आता होणार सुरक्षित, पुढील १८ महिन्यांत नियम आणखी कडक होणार!
Daily Top 2Weekly Top 5

अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2025 08:30 IST

गुरुवारी सकाळी कल्ली पश्चिमेकडील किसानपथवर दिल्लीला जाणाऱ्या एका खाजगी बसला आग लागली. या घटनेत दोन महिला, एक पुरूष आणि एका मुलाचा मृत्यू झाला.

उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये एका बसला भीषण आग लागली. ही आग मोहनलालगंज परिसरात दिल्लीहून बिहारला जाणाऱ्या एका स्लीपर बसला लागली. या अपघातात ५ जणांचा मृ्त्यू झाला. तर बसमध्ये सुमारे ६० प्रवासी प्रवास करत होते. चालकाने काच फोडली, बसमधून उडी मारली आणि पळून गेला. आग इतकी भीषण होती की अवघ्या १० मिनिटांत ती पूर्णपणे जळून खाक झाली.

मिळालेल्या माहितीनुसार, लखनौच्या मोहनलालगंज भागातील किसान पथवर ही घटना घडली, दिल्लीहून बिहारला जाणाऱ्या एका खाजगी स्लीपर बसला अचानक आग लागली. बहुतेक प्रवासी गाढ झोपेत असताना हा अपघात झाला. आग इतक्या वेगाने पसरली की अवघ्या १० मिनिटांत संपूर्ण बस जळून खाक झाली.

भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले

बसमधील प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, धुरामुळे त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. आग लागताच गोंधळ उडाला. लोक जीव वाचवण्यासाठी दारे आणि खिडक्यांकडे धावले, पण ड्रायव्हरच्या अतिरिक्त सीटमुळे मार्ग अडला. अनेक प्रवासी त्यात अडकले,बाहेर पडू शकले नाहीत.मिळालेल्या माहितीनुसार, आग  भीषण होती. ही आग एक किलोमीटर अंतरावरूनही दिसत होती. अपघाताची माहिती मिळताच आजूबाजूच्या परिसरातील लोक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी पोलिसांना आणि अग्निशमन दलाला माहिती दिली. माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले, प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात आली, पण तोपर्यंत संपूर्ण बस जळून खाक झाली होती. या अपघातात ५ प्रवासी जिवंत जळाले, या प्रवाशांची अद्याप ओळख पटलेली नाही. इतर प्रवाशांना वेळीच बसमधून बाहेर काढण्यात आले.

चालकाची सीट साधी असती तर....

बस चालकाने आधी काच फोडली आणि बसमधून उडी मारून घटनास्थळावरून पळ काढला. अपघातानंतर त्याचा कोणताही पत्ता लागलेला नाही. पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे.

या घटनेबाबत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अपघाताच्या कारणांचा तपास सुरू केला आहे. सुरुवातीच्या तपासात शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे संभाव्य कारण सांगितले जात आहे, पण फॉरेन्सिक अहवालानंतरच त्याची माहिती मिळेल. ड्रायव्हरची सीट सामान्य असती आणि आपत्कालीन बाहेर पडण्याचा मार्ग मोकळा असता तर कदाचित प्रवाशांचे प्राण वाचले असते.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशfireआग