शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
2
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
3
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
4
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
5
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
6
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
7
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
8
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
9
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
10
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
11
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
12
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
13
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
14
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
15
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
16
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
17
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
18
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
19
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
20
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद

अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2025 08:30 IST

गुरुवारी सकाळी कल्ली पश्चिमेकडील किसानपथवर दिल्लीला जाणाऱ्या एका खाजगी बसला आग लागली. या घटनेत दोन महिला, एक पुरूष आणि एका मुलाचा मृत्यू झाला.

उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये एका बसला भीषण आग लागली. ही आग मोहनलालगंज परिसरात दिल्लीहून बिहारला जाणाऱ्या एका स्लीपर बसला लागली. या अपघातात ५ जणांचा मृ्त्यू झाला. तर बसमध्ये सुमारे ६० प्रवासी प्रवास करत होते. चालकाने काच फोडली, बसमधून उडी मारली आणि पळून गेला. आग इतकी भीषण होती की अवघ्या १० मिनिटांत ती पूर्णपणे जळून खाक झाली.

मिळालेल्या माहितीनुसार, लखनौच्या मोहनलालगंज भागातील किसान पथवर ही घटना घडली, दिल्लीहून बिहारला जाणाऱ्या एका खाजगी स्लीपर बसला अचानक आग लागली. बहुतेक प्रवासी गाढ झोपेत असताना हा अपघात झाला. आग इतक्या वेगाने पसरली की अवघ्या १० मिनिटांत संपूर्ण बस जळून खाक झाली.

भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले

बसमधील प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, धुरामुळे त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. आग लागताच गोंधळ उडाला. लोक जीव वाचवण्यासाठी दारे आणि खिडक्यांकडे धावले, पण ड्रायव्हरच्या अतिरिक्त सीटमुळे मार्ग अडला. अनेक प्रवासी त्यात अडकले,बाहेर पडू शकले नाहीत.मिळालेल्या माहितीनुसार, आग  भीषण होती. ही आग एक किलोमीटर अंतरावरूनही दिसत होती. अपघाताची माहिती मिळताच आजूबाजूच्या परिसरातील लोक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी पोलिसांना आणि अग्निशमन दलाला माहिती दिली. माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले, प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात आली, पण तोपर्यंत संपूर्ण बस जळून खाक झाली होती. या अपघातात ५ प्रवासी जिवंत जळाले, या प्रवाशांची अद्याप ओळख पटलेली नाही. इतर प्रवाशांना वेळीच बसमधून बाहेर काढण्यात आले.

चालकाची सीट साधी असती तर....

बस चालकाने आधी काच फोडली आणि बसमधून उडी मारून घटनास्थळावरून पळ काढला. अपघातानंतर त्याचा कोणताही पत्ता लागलेला नाही. पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे.

या घटनेबाबत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अपघाताच्या कारणांचा तपास सुरू केला आहे. सुरुवातीच्या तपासात शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे संभाव्य कारण सांगितले जात आहे, पण फॉरेन्सिक अहवालानंतरच त्याची माहिती मिळेल. ड्रायव्हरची सीट सामान्य असती आणि आपत्कालीन बाहेर पडण्याचा मार्ग मोकळा असता तर कदाचित प्रवाशांचे प्राण वाचले असते.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशfireआग