शहरं
Join us  
Trending Stories
1
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
2
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
3
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
4
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
5
तुम्ही तर रक्ताचे होतात, मग का असं केलं?; छगन भुजबळांचा राज ठाकरेंवर पलटवार
6
मोदी जे बोलतात, त्यातलं १ टक्काही खरं नाही, त्यांचा आत्मविश्वास ढळलाय"; शरद पवारांची टीका
7
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
8
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
9
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
10
'भाजपचे सरकार कायम राहणार नाही, आज ना उद्या नक्की बदला घेईन', ममता बॅनर्जींचा इशारा
11
सनरायझर्स हैदराबादविरुद्ध गुजरात टायटन्स सामना रद्द? समोर आले मोठे अपडेट्स
12
स्वत: फुटबॉलपटू असलेली आईच बनली लेकाची कोच आणि म्हणून.. सुनील छेत्रीच्या फुटबॉलप्रेमाची खास गोष्ट!
13
मुलगी हरवल्याप्रकरणी चौकशीसाठी नेलं अन् कोठडीतच तरूणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?
14
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
15
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
16
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
17
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
18
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
19
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'
20
Hina Khan : "40 डिग्रीत वेदनादायक पीरियड क्रॅम्प्सने त्रस्त असताना..."; हिना खानने सांगितला अनुभव

देशात मंदी असती तर कोट-जॅकेटऐवजी धोतरावर फिरलो असतो; भाजप खासदाराचा अजब तर्क

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2020 10:32 AM

विरोधीपक्ष देशातील आर्थिक मंदीवरून सत्ताधारी भाजपला लक्ष्य करत आहे. घसरणारा जीडीपी, वाढती बेरोजगारी, मंदी यासह आर्थिक बाबतीत होत असलेल्या पिछेहटीवर विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले जात आहे. तर भाजपकडून देशात मंदी नसल्याचे वारंवार सांगण्यात येत आहे. 

नवी दिल्ली - भारतीय अर्थव्यवस्थेत मंदी नसून तेजी असल्याचं देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अनेकदा सांगितले आहे. आता त्यांच्या पक्षाच्या खासदाराने देखील देशात मंदी नसल्याचे सांगत अजब तर्क मांडला आहे.

उत्तर प्रदेशातील बलिया मतदार संघाचे खासदार विरेंद्र सिंह यांच्यानुसार देशात मंदी नाही. देशातील नागरिक पारंपरिक धोतर-कुर्ता परिधान करण्याऐवजी कोट आणि जॅकेट परिधान करत आहेत. मग मंदी कसकाय, असा अजब सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. दिल्लीसह संपूर्ण जगात मंदीवर चर्चा होत असून यात काहीही तथ्य नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. 

जगभरात मंदीवर चर्चा होते. परंतु, मंदी असती तर देशात कोट आणि जॅकेटऐवजी लोकांनी धोतर-कुर्ता परिधान केले असते. मंदीत आपण कपडे खरेदी केले नसते. पँट आणि पायजामा खरेदी केला नसता असे सांगत त्यांनी भारत केवळ शहरांचा नव्हे तर खेड्यापाड्यांचा देश असल्याचे नमूद केले. देशात 6.5 लाख गावं आहेत. महत्मा गांधी, डॉक्टर हेडगेवार, श्यामाप्रसाद मुखर्जी आणि जयप्रकाश नारायण यांनी देखील ग्रामीण भागावर विश्वास दाखवला होता, याची आठवण विरेंद्र सिंह यांनी करून दिली. 

दरम्यान विरोधीपक्ष देशातील आर्थिक मंदीवरून सत्ताधारी भाजपला लक्ष्य करत आहे. घसरणारा जीडीपी, वाढती बेरोजगारी, मंदी यासह आर्थिक बाबतीत होत असलेल्या पिछेहटीवर विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले जात आहे. तर भाजपकडून देशात मंदी नसल्याचे वारंवार सांगण्यात येत आहे.