शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

Amit Shah: हिंमत असेल तर राम मंदिर उभारणीचं काम रोखून दाखवाच; अमित शाहांचं सपा, बसपा, काँग्रेसला खुलं आव्हान!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2021 15:31 IST

भाजपा नेते आणि देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज अयोध्येत विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. जर कुणात हिंमत असेल तर राम मंदिर निर्माण कार्य रोखून दाखवावच, असं खुलं आव्हान अमित शाह यांनी विरोधकांना दिलं आहे.

अयोध्या-

भाजपा नेते आणि देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज अयोध्येत विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. जर कुणात हिंमत असेल तर राम मंदिर निर्माण कार्य रोखून दाखवावच, असं खुलं आव्हान अमित शाह यांनी विरोधकांना दिलं आहे. तसंच बाबरी मशीद पाडण्यात आली त्यावेळी सपा, बसपा आणि काँग्रेसवाल्यांनीच कारसेवकांवर गोळीबार केला होता हे कुणी कधी विसरू शकणार नाही, असंही शहा म्हणाले. आज उत्तर प्रदेशातभाजपाच्या सरकारमुळे माफिया राज स्वत: पोलिसांसमोर येऊन आत्मसमर्पण करत आहेत, असंही ते पुढे म्हणाले. 

"ज्या कुणाचा राम मंदिर उभारणीचं काम थांबवण्याचा इरादा आहे. त्यांना माझं सांगणं आहे की तुम्ही काम थांबवून दाखवाच. इतकी हिंमत कुणातच नाही. पंतप्रधान मोदींनी काशी विश्वनाथ कॉरिडोअरचं पुनर्निमाण केलं. औरंगजेबाच्या काळात जो बाबा विश्वनाथाच्या दर्शनासाठी येत असे त्या निराश होऊन माघारी परतावं लागत होतं", असं अमित शहा म्हणाले. 

"बुआ बबुआ आणि काँग्रेस पक्षानं कधीच उत्तर प्रदेशचा विकास केला नाही. सपाच्या कार्यकाळात संपूर्ण राज्यात फक्त गुंडगिरी आणि माफियाराजचा विकास झाला. आमच्या लोकांना पळ काढण्यासाठी जबरदस्ती केली जात होती. योगींचं सरकार आल्यांतर दुसऱ्यांना पळवणारे आज स्वत: पळ काढत आहेत. याआधी माफियांना पोलीस प्रशासन घाबर होतं. पण आता माफिया स्वत: पोलिसांसमोर येऊन आत्मसमर्पण करत आहेत", असंही अमित शाह म्हणाले. 

बुआ बबुआ सरकारच्या काळात आपल्या प्रतिकांचा सन्मान होत नव्हता. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रत्येकाच्या आस्थेचा सन्मान केला आहे. जनतेनं संपूर्ण बहुमतानं मोदींना पंतप्रधानपदी बसवलं आणि भाजपाचं सरकार देशात आणलं. आज मला पाहायला मिळतंय की रामलल्लाचं मंदिर आज साकार होण्यास सुरुवात झाली आहे, असं अमित शाह म्हणाले.

राम लल्लाचं मंदिर होऊ नये यासाठी काँग्रेस, सपा आणि बसपानं त्यांच्या शासनकाळात खूप प्रयत्न केले. त्यांनी कारसेवकांवर गोळीबार केला होता याची तुम्हाला आठवण असेल. कारसेवकांवर लाढीचार्ज केला होता. कारसेवकांना मारून त्यांचे मृतदेह शरयू नदीत टाकले होते, असं अमित शहा उपस्थितांना संबोधित करताना म्हणाले. 

टॅग्स :Amit Shahअमित शाहBJPभाजपाUttar Pradeshउत्तर प्रदेश