शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं, आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
2
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
3
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
4
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
5
२, ३, ४BHK घर बांधायचेय? जीएसटीचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या
6
गर्लफ्रेंडने ब्लॉक केलं, प्रेमभंग जीवावर बेतला, तरुणाने उचलले टोकाचे पाऊल; उपचारादरम्यान मृत्यू
7
१०% नं घसरलाय हा शेअर, पण अजूनही IPO च्या किंमतीपेक्षा ६०% नं अधिक; काय म्हणाले एक्सपर्ट?
8
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
9
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
10
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
11
अंकिता लोखंडेचा नवरा रुग्णालयात दाखल; हाताला ४५ टाके अन्... मित्राने शेअर केली पोस्ट
12
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल
13
BAN vs SL Head to Head Record : 'टायगर वर्सेस शेर' भिडणार! 'नागिन डान्स'सह कोण कुणावर काढणार खुन्नस?
14
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
15
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
16
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
17
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
18
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
19
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
20
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक

Amit Shah: हिंमत असेल तर राम मंदिर उभारणीचं काम रोखून दाखवाच; अमित शाहांचं सपा, बसपा, काँग्रेसला खुलं आव्हान!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2021 15:31 IST

भाजपा नेते आणि देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज अयोध्येत विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. जर कुणात हिंमत असेल तर राम मंदिर निर्माण कार्य रोखून दाखवावच, असं खुलं आव्हान अमित शाह यांनी विरोधकांना दिलं आहे.

अयोध्या-

भाजपा नेते आणि देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज अयोध्येत विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. जर कुणात हिंमत असेल तर राम मंदिर निर्माण कार्य रोखून दाखवावच, असं खुलं आव्हान अमित शाह यांनी विरोधकांना दिलं आहे. तसंच बाबरी मशीद पाडण्यात आली त्यावेळी सपा, बसपा आणि काँग्रेसवाल्यांनीच कारसेवकांवर गोळीबार केला होता हे कुणी कधी विसरू शकणार नाही, असंही शहा म्हणाले. आज उत्तर प्रदेशातभाजपाच्या सरकारमुळे माफिया राज स्वत: पोलिसांसमोर येऊन आत्मसमर्पण करत आहेत, असंही ते पुढे म्हणाले. 

"ज्या कुणाचा राम मंदिर उभारणीचं काम थांबवण्याचा इरादा आहे. त्यांना माझं सांगणं आहे की तुम्ही काम थांबवून दाखवाच. इतकी हिंमत कुणातच नाही. पंतप्रधान मोदींनी काशी विश्वनाथ कॉरिडोअरचं पुनर्निमाण केलं. औरंगजेबाच्या काळात जो बाबा विश्वनाथाच्या दर्शनासाठी येत असे त्या निराश होऊन माघारी परतावं लागत होतं", असं अमित शहा म्हणाले. 

"बुआ बबुआ आणि काँग्रेस पक्षानं कधीच उत्तर प्रदेशचा विकास केला नाही. सपाच्या कार्यकाळात संपूर्ण राज्यात फक्त गुंडगिरी आणि माफियाराजचा विकास झाला. आमच्या लोकांना पळ काढण्यासाठी जबरदस्ती केली जात होती. योगींचं सरकार आल्यांतर दुसऱ्यांना पळवणारे आज स्वत: पळ काढत आहेत. याआधी माफियांना पोलीस प्रशासन घाबर होतं. पण आता माफिया स्वत: पोलिसांसमोर येऊन आत्मसमर्पण करत आहेत", असंही अमित शाह म्हणाले. 

बुआ बबुआ सरकारच्या काळात आपल्या प्रतिकांचा सन्मान होत नव्हता. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रत्येकाच्या आस्थेचा सन्मान केला आहे. जनतेनं संपूर्ण बहुमतानं मोदींना पंतप्रधानपदी बसवलं आणि भाजपाचं सरकार देशात आणलं. आज मला पाहायला मिळतंय की रामलल्लाचं मंदिर आज साकार होण्यास सुरुवात झाली आहे, असं अमित शाह म्हणाले.

राम लल्लाचं मंदिर होऊ नये यासाठी काँग्रेस, सपा आणि बसपानं त्यांच्या शासनकाळात खूप प्रयत्न केले. त्यांनी कारसेवकांवर गोळीबार केला होता याची तुम्हाला आठवण असेल. कारसेवकांवर लाढीचार्ज केला होता. कारसेवकांना मारून त्यांचे मृतदेह शरयू नदीत टाकले होते, असं अमित शहा उपस्थितांना संबोधित करताना म्हणाले. 

टॅग्स :Amit Shahअमित शाहBJPभाजपाUttar Pradeshउत्तर प्रदेश