शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar: पुणे जिल्ह्यात तीन महापालिका होणार; चाकण, हिंजवडी आणि..., अजित पवारांची मोठी घोषणा
2
मी सापाच्या तीन पिल्लांना जन्म दिला; महिलेच्या दाव्याने खळबळ, समजताच गर्दी जमू लागली...
3
सुप्रीम कोर्टाचा १ निर्णय अन् अलाहाबाद हायकोर्टचे १३ न्यायाधीश नाराज; मुख्य न्यायाधीशांना पत्र
4
डोनाल्ड ट्रम्प यांना सुधरेना...! ५० टक्के टॅरिफवर देखील काहीच प्रतिक्रिया नाही, आता चर्चा बंद केल्याची घोषणा...
5
Intel CEO Lip Bu Tan Networth: कोण आहेत लिप-बू टॅन, ज्यांच्या मागे हात धुवून पडलेत डोनाल्ड ट्रम्प, किती संपत्तीचे मालक?
6
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
7
शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी घसरण; सेन्सेक्स १४५ आणि निफ्टी ५२ अंकांच्या घसरणीसह उघडले
8
चीनच्या सर्वांत मोठ्या धरणाने भारत सतर्क; ब्रह्मपुत्रा नदीशी संबंधित सर्व घडामोडींवर सरकारचे बारीक लक्ष
9
अत्याचाराच्या प्रकरणातून सोडवण्यासाठी अजितदादांच्या आमदाराला फोन; उपमुख्यमंत्री म्हणाले, 'तुमची जीभ कशी रेटते'
10
Trump Tariff On India: ट्रम्प यांचं टॅरिफ संधी ठरू शकते का? कॉर्पोरेट इंडिया म्हणतोय भारत बनू शकतो नवा 'पॉवरहाऊस'
11
अभिनेत्री हुमा कुरेशीच्या भावाची निर्घृणपणे हत्या; दिल्लीत दोघांना अटक, क्षुल्लक कारणावरुन झाला वाद
12
सिद्धिविनायकाच्या दर्शनाला लॅपटॉप, कॅमेरा साेबत नकाे
13
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
14
डबल जॉली, डबल ट्रबल! सौरभ शुक्लांनी दिलं 'जॉली एलएलबी ३'चं मोठं अपडेट, कधी रिलीज होणार?
15
ठकासारखे वागू नका, कायद्याच्या चौकटीत राहा; ईडीला सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा फटकारले
16
नेपाळची सक्ती; किमान ३ मुलांना जन्म द्या!
17
रक्षाबंधन २०२५: राखी बांधताना तुमच्याकडून ‘ही’ चूक तर होत नाही ना? पाहा, योग्य पद्धत-नियम
18
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
19
रक्षाबंधन २०२५: गणपती, स्वामींना राखी नक्की बांधा; सदैव रक्षण-कृपा, कायम सोबत असतील स्वामी!
20
गजलक्ष्मी सौभाग्य योगात रक्षाबंधन: ५ मूलांक लकी, बंपर कमाई; प्रसन्न होईल लक्ष्मी, शुभच घडेल!

ठकासारखे वागू नका, कायद्याच्या चौकटीत राहा; ईडीला सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा फटकारले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 08:25 IST

ईडीच्या प्रतिमेबाबत आम्ही चिंतीत आहोत, असे न्या. सूर्यकांत, न्या. उज्जल भुयान आणि न्या. एन. कोटिश्वर सिंह यांनी म्हटले आहे.

नवी दिल्ली : ईडीने चौकशी केलेल्या प्रकरणांमध्ये दोषसिद्धीचे प्रमाण कमी आहे. ईडी एखाद्या ठकासारखे वागू शकत नाही, या यंत्रणेला कायद्याच्या चौकटीतच काम करावे लागेल, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी फटकारले.

ईडीच्या प्रतिमेबाबत आम्ही चिंतीत आहोत, असे न्या. सूर्यकांत, न्या. उज्जल भुयान आणि न्या. एन. कोटिश्वर सिंह यांनी म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालय मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) ईडीच्या अटकेच्या अधिकारांना मान्यता देणाऱ्या २०२२च्या निकालाचा आढावा घेण्याच्या याचिकांवर सुनावणी करीत आहे. केंद्र आणि ईडीची बाजू मांडताना अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एस. व्ही. राजू यांनी फेरविचार याचिकांच्या टिकाऊपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले..

प्रभावशाली गुन्हेगारांकडे बरेच काही आहे. ते कार्यवाही लांबवण्यासाठी अनेक वकील नियुक्त करतात. प्रभावशाली आरोपी क्रिप्टो-चलन व इतर अत्याधुनिक पद्धतींमध्ये व्यवहार करण्याव्यतिरिक्त केमन आयलंडसारख्या वेगवेगळ्या देशांत पळून गेल्याने व तपासात अडथळा आणल्याने ईडी हतबल होत आहे.

५-६ वर्षांनी ते निर्दोष सुटले तर याचा खर्च कोण भरेल?न्या. भुयान यांनी एका निकालाचा संदर्भ देताना म्हटले आहे की, मागील पाच वर्षांत ईडीने नोंदवलेल्या ५,००० प्रकरणांमध्ये १० टक्क्यांपेक्षा कमी शिक्षा झाल्या. याबाबतचे तथ्यात्मक विधान संसदेत मंत्र्यांनी केले आहे.

ते म्हणाले की, तुम्ही एखाद्या ठकासारखे वागू शकत नाहीत. तुम्हाला कायद्याच्या चौकटीत राहून काम करावे लागेल. मी माझ्या एका निकालात तर असे पाहिले आहे की, ईडीने पाच वर्षांत ५,००० ईसीआयआर नोंदवले आहेत. परंतु शिक्षेचा दर १० टक्क्यांपेक्षा कमी आहे. म्हणूनच आम्ही तुमचा तपास सुधारण्याचा आग्रह धरत आहोत. कारण तो व्यक्तीस्वातंत्र्याशी संबंधित आहे.

आम्हाला ईडीच्या प्रतिमेबद्दलही चिंता आहे. पाच-सहा वर्षांच्या न्यायालयीन कोठडीनंतर जर लोक निर्दोष सुटले तर याला कोण जबाबदार आहे?, असा परखड सवाल न्यायालयाने विचारला आहे.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय