शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
2
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
3
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
4
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
5
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
6
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
7
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
8
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
9
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
10
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
11
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
12
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
13
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
14
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
15
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
16
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
17
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक
18
चीनमधून MBBS अन् तयार केले खतरनाक विष; गुजरातमध्ये पकडलेल्या ३ दहशतवाद्यांचा प्लॅन काय होता?
19
सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला...
20
मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत सरकार देतं आर्थिक मदत! 'या' वर्गातील कुटुंबांसाठी चालवली जाते योजना

ठकासारखे वागू नका, कायद्याच्या चौकटीत राहा; ईडीला सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा फटकारले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 08:25 IST

ईडीच्या प्रतिमेबाबत आम्ही चिंतीत आहोत, असे न्या. सूर्यकांत, न्या. उज्जल भुयान आणि न्या. एन. कोटिश्वर सिंह यांनी म्हटले आहे.

नवी दिल्ली : ईडीने चौकशी केलेल्या प्रकरणांमध्ये दोषसिद्धीचे प्रमाण कमी आहे. ईडी एखाद्या ठकासारखे वागू शकत नाही, या यंत्रणेला कायद्याच्या चौकटीतच काम करावे लागेल, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी फटकारले.

ईडीच्या प्रतिमेबाबत आम्ही चिंतीत आहोत, असे न्या. सूर्यकांत, न्या. उज्जल भुयान आणि न्या. एन. कोटिश्वर सिंह यांनी म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालय मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) ईडीच्या अटकेच्या अधिकारांना मान्यता देणाऱ्या २०२२च्या निकालाचा आढावा घेण्याच्या याचिकांवर सुनावणी करीत आहे. केंद्र आणि ईडीची बाजू मांडताना अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एस. व्ही. राजू यांनी फेरविचार याचिकांच्या टिकाऊपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले..

प्रभावशाली गुन्हेगारांकडे बरेच काही आहे. ते कार्यवाही लांबवण्यासाठी अनेक वकील नियुक्त करतात. प्रभावशाली आरोपी क्रिप्टो-चलन व इतर अत्याधुनिक पद्धतींमध्ये व्यवहार करण्याव्यतिरिक्त केमन आयलंडसारख्या वेगवेगळ्या देशांत पळून गेल्याने व तपासात अडथळा आणल्याने ईडी हतबल होत आहे.

५-६ वर्षांनी ते निर्दोष सुटले तर याचा खर्च कोण भरेल?न्या. भुयान यांनी एका निकालाचा संदर्भ देताना म्हटले आहे की, मागील पाच वर्षांत ईडीने नोंदवलेल्या ५,००० प्रकरणांमध्ये १० टक्क्यांपेक्षा कमी शिक्षा झाल्या. याबाबतचे तथ्यात्मक विधान संसदेत मंत्र्यांनी केले आहे.

ते म्हणाले की, तुम्ही एखाद्या ठकासारखे वागू शकत नाहीत. तुम्हाला कायद्याच्या चौकटीत राहून काम करावे लागेल. मी माझ्या एका निकालात तर असे पाहिले आहे की, ईडीने पाच वर्षांत ५,००० ईसीआयआर नोंदवले आहेत. परंतु शिक्षेचा दर १० टक्क्यांपेक्षा कमी आहे. म्हणूनच आम्ही तुमचा तपास सुधारण्याचा आग्रह धरत आहोत. कारण तो व्यक्तीस्वातंत्र्याशी संबंधित आहे.

आम्हाला ईडीच्या प्रतिमेबद्दलही चिंता आहे. पाच-सहा वर्षांच्या न्यायालयीन कोठडीनंतर जर लोक निर्दोष सुटले तर याला कोण जबाबदार आहे?, असा परखड सवाल न्यायालयाने विचारला आहे.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय