शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा "शिवसेना + राष्ट्रवादी + भाजपा सरकार" बनवण्याची ऑफर उद्धव ठाकरेंनी दिली होती; तटकरेंचा गौप्यस्फोट
2
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
3
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
4
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
5
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
6
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
7
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
8
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
9
फोटोतील या अभिनेत्याला ओळखलंत का?, त्याची अवस्था पाहून चाहते झाले हैराण
10
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
11
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
12
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
13
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
14
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
15
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
16
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
17
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
18
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
19
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
20
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं

''वित्त आयोगाच्या शर्ती बदलताना राज्यांना विश्वासात घ्यायला हवे होते''

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2019 4:46 AM

१५ व्या वित्त आयोगाच्या संदर्भ शर्ती बदलताना केंद्र सरकारने राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना विश्वासात घ्यायला हवे होते, असे प्रतिपादन माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी केले आहे.

नवी दिल्ली : १५ व्या वित्त आयोगाच्या संदर्भ शर्ती बदलताना केंद्र सरकारने राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना विश्वासात घ्यायला हवे होते, असे प्रतिपादन माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी केले आहे. संघराज्य व्यवस्थेत एकतर्फी निर्णय घेणे योग्य नाही, असेही मनमोहनसिंग यांनी म्हटले आहे.जुलैमध्ये केंद्र सरकारने १५ व्या वित्त आयोगाच्या संदर्भ शर्ती बदलून आयोगास संरक्षण आणि अंतर्गत सुरक्षा यासाठी व्यपगत (लॅप्स) न होणाऱ्या निधीची तरतूद कशी करावी, याचा मार्ग सुचविण्यास सांगितले आहे. त्यानुषंगाने मनमोहनसिंग यांनी हे वक्तव्य केले. येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘१५ व्या वित्त आयोगाच्या संदर्भ शर्ती’ या विषयावरील परिसंवादात ते बोलत होते.मनमोहनसिंग यांनी सांगितले की, समितीची मुदत संपत आलेली असताना तिच्या संदर्भ शर्तींमध्ये बदल करताना राज्यांशी सल्लामसलत करायला हवी होती. केंद्र सरकारला वित्त आयोगाच्या संदर्भ शर्तींमध्ये बदल करायचाच असेल, तर मुख्यमंत्र्यांच्या अनुमतीने तो करणे अधिक योग्य आहे. अन्यथा केंद्र सरकार आपले हक्क हिरावून घेत आहे, अशी राज्यांची भावना होऊ शकते. संदर्भ शर्तींत परस्पर बदल करणे हे आपण स्वीकारलेल्या संघराज्य पद्धतीसाठी तसेच सहकारी संघ पद्धतीसाठी चांगले नाही, असे मला वाटते. मनमोहनसिंग यांनी म्हटले की, वित्त आयोगाचा अहवाल वित्त मंत्रालयाकडे जातो. तेथून तो मंत्रिमंडळाकडे जातो. त्यामुळे नाखुश राज्य आयोगांवर आपला एकतर्फी निर्णय लादण्याऐवजी संसदेचा जो काही जनादेश आहे, त्याचा आम्ही सन्मान करू, असा दृष्टिकोन सरकार स्वीकारू शकते. एन. के. सिंग यांच्या नेतृत्वाखालील वित्त आयोग ३० आॅक्टोबर २०१९ रोजी आपला अहवाल सादर करणार होता.

टॅग्स :Manmohan Singhमनमोहन सिंगNarendra Modiनरेंद्र मोदी