शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

कृषी संकटाच्या मुकाबल्यासाठी राज्यांना हवा अधिक निधी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2019 06:25 IST

नीती आयोगाच्या पाचव्या बैठकीत मागणी; 2022 नंतरही जीएसटी भरपाई देण्याची विनंती

नवी दिल्ली : संकटात सापडलेल्या कृषी क्षेत्राला वाचविण्यासाठी, तसेच नैसर्गिक आपत्ती निवारणासाठी केंद्र सरकारने राज्यांना अधिकाधिक निधी द्यावा, अशी मागणी राज्यांच्या वतीने शनिवारी नीती आयोगाच्या पाचव्या बैठकीत करण्यात आली. 2022 नंतरही राज्यांना वस्तू व सेवाकराची (जीएसटी) भरपाई मिळत राहावी, अशी मागणीही बैठकीत करण्यात आली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रपती भवनात ही बैठक झाली. देशातील दुष्काळी स्थिती, शेतीवरील संकट आणि नक्षलवादामुळे निर्माण झालेली सुरक्षाविषयक चिंता यावर बैठकीत प्रामुख्याने विचारमंथन झाले. या बैठकीला वरिष्ठ केंद्रीय मंत्री आणि मोजके अपवाद वगळता सर्व राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बैठकीला उपस्थिती होती. अनुपस्थितांमध्ये प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचा समावेश आहे.जर्मनीच्या दौऱ्यावर असल्यामुळे हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत. पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी वित्तमंत्री मनप्रीत बादल यांना आपला प्रतिनिधी म्हणून पाठविले होते. कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी वस्तू व सेवाकराची (जीएसटी) भरपाई नियोजित पाच वर्षांनंतरही सुरूच ठेवण्यात यावी, अशी मागणी केली. 2022 ला भरपाईचा काळ संपेल, त्यानंतर राज्य सरकारांना आर्थिक चणचण भासेल, असे कुमारस्वामी म्हणाले.केरळचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांनी सांगितले की, गेल्या चार वर्षांत नीती आयोग अपेक्षापूर्तीत अपयशी ठरला आहे. हा आयोग आधीच्या नियोजन आयोगाला पर्याय होऊ शकलेला नाही. गाडगीळ सूत्रानुसार मिळणारी अनुदाने राज्यांना नव्या व्यवस्थेत गमवावी लागली. केंद्रीय योजनांतील राज्यांचे योगदान 25 टक्क्यांवरून 40 टक्क्यांवर गेले. त्यामुळे राज्यांचे मोठे नुकसान झाले आहे.आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी पुरासारख्या नैसर्गिक आपत्तींसाठी राज्याला वाढीव अर्थसाह्य मिळावे, अशी मागणी केली. आसामला दरवर्षी पुराचा तडाखा बसतो. पुडुचेरीचे मुख्यमंत्री नारायणसामी यांनी पुडुचेरीला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याची मागणी केली. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांनी आपल्या राज्याला विशेष दर्जा देण्याची मागणी केली.जीडीपी वृद्धीसाठी काम करापंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बैठकीचे उद्घाटन करताना सांगितले की, भारताला 5 लाख कोटी डॉलरची अर्थव्यवस्था बनविणे हे आव्हान असले तरी हे आव्हान पेलता येण्याजोगे आहे. हे आव्हान पेलण्यासाठी राज्यांनी आपल्या गाभा क्षमतांवर लक्ष केंद्रित करून जीडीपी वृद्धीसाठी जिल्हा पातळीवरून काम करावे.

टॅग्स :agricultureशेती