शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
3
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
4
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
5
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
6
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
7
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
8
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
9
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
10
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
11
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
12
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
13
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
14
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
15
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
16
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
17
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
18
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
19
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
20
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
Daily Top 2Weekly Top 5

पदोन्नतीतील आरक्षण संपुष्टात येणार?; काय आहे नेमकं या मागचं सत्य, जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2020 19:22 IST

उत्तराखंड सरकारने एससी-एसटी समाजातील लोकांना आरक्षण न देता राज्यातील सर्व सरकारी पदे भरण्याचे आदेश ५ सप्टेंबर २०१२ रोजी अधिसूचना काढली

नवी दिल्ली - पदोन्नतीतील आरक्षणाच्यासर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा हवाला देत काँग्रेस केंद्र सरकारवर निशाणा साधत आहे. पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला भाजपा आणि आरएसएसच्या विचारधारेशी जोडलं आहे. आरक्षण रद्द करण्याचा प्रयत्न भाजप-आरएसएस करीत आहे असा आरोप राहुल गांधींनी केला आहे. 

दुसरीकडे संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, उत्तराखंड सरकारने २०१२ मध्ये आरक्षणाशिवाय रिक्त सरकारी पदांच्या नियुक्तीसाठी अधिसूचना जारी केली होती. जी हायकोर्टाने रद्द केली होती. राज्य सरकारची अधिसूचना हायकोर्टाने फेटाळली होती. राज्य सरकारने या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आणि सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या निर्णयाला रद्दबातल करत ही अधिसूचना वैध असल्याचे आदेश दिले. 

नेमकं संपूर्ण प्रकरण काय आहे? हे कुठून सुरू झाले आणि का?उत्तराखंड सरकारने एससी-एसटी समाजातील लोकांना आरक्षण न देता राज्यातील सर्व सरकारी पदे भरण्याचे आदेश ५ सप्टेंबर २०१२ रोजी अधिसूचना काढली. उत्तराखंड सरकारने अधिसूचना जारी करताना म्हटलं होतं की उत्तर प्रदेश लोकसेवा (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीय आरक्षण) अधिनियम १९९४ च्या कलम ३(७) चा लाभ भविष्यात राज्य सरकारच्या पदोन्नतीच्या निर्णयाला वेळ देता येणार नाही.

कर विभागात सहाय्यक आयुक्त म्हणून कार्यरत असलेले उधम सिंह नगर येथील रहिवासी ज्ञान चंद यांनी उत्तराखंड सरकारच्या या आदेशाविरूद्ध उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. अनुसूचित जातीचे ज्ञान चंद त्यानंतर उधमसिंह नगरातील खातिमा येथे कार्यरत होते. वास्तविक, ज्ञान चंद यांनी १० जुलै २०१२ रोजी उच्च न्यायालयाच्या निर्णयावर आधारित उत्तराखंड सरकारची ही अधिसूचना रद्द करण्याची मागणी केली. २०११ मध्ये दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी घेत उत्तराखंड उच्च न्यायालयाने हा आदेश दिला. यामध्ये याचिकाकर्त्याने उत्तर प्रदेश लोकसेवा (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीय) आरक्षण अधिनियम १९९४ च्या कलम ३(७) ला आव्हान दिले होते. उत्तराखंडच्या निर्मितीनंतर सरकारने नवीन राज्यातही हा कायदा स्वीकारला. 

उत्तराखंड उच्च न्यायालयाने असा युक्तिवाद केला की उत्तर प्रदेश लोकसेवा (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीयांचे आरक्षण) अधिनियम, १९९४ मधील कलम ३(७) सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या विरोधात आहे.  आणि कलम ३(७) च्या १० जुलै २०१२ रोजी संपुष्टात आल्याचं म्हटलं होतं. त्याचसोबत सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण सुनिश्चित करण्यासाठी एससी-एसटी समाजातील लोकांची संख्या किती याची आकडेवारी आवश्यक असल्याचं सांगितलं होतं. 

उच्च न्यायालयाने राज्य सरकारची अधिसूचना रद्द केली२०१९ मध्ये उत्तराखंड उच्च न्यायालयाने राज्य सरकारची २०१२ ची अधिसूचना रद्द करत सरकारला वर्गीकृत प्रवर्गांचे आरक्षण देण्याचे आदेश दिले. उत्तराखंड उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश रमेश रंगनाथन आणि न्यायमूर्ती एन.एस. प्रधान यांनी ही अधिसूचना रद्द केली होती, असे सांगून राज्य सरकार इच्छा असल्यास राज्यघटनेच्या कलम १६ (४ ए) नुसार कायदे करू शकते असं सांगितलं होतं. 

काय झालं सर्वोच्च न्यायालयात? सर्वोच्च न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटलं आहे की राज्य सरकार पदोन्नतीमध्ये आरक्षण देण्यास बांधील नाही. पदोन्नतीमध्ये आरक्षणाचा दावा करण्याचा कोणालाही मूलभूत अधिकार नाही. राज्य सरकारला आरक्षण देण्याचे निर्देश कोर्टाला देता येणार नाही. सुप्रीम कोर्टाने इंदिरा साहनी जजमेंटचा हवाला देत सांगितले की, राज्य सरकार अनुसूचित जाती / जमाती प्रवर्गातील लोकांची संख्या शोधून काढेल, पुरेसे प्रतिनिधित्व आहे किंवा नाही याची आकडेवारी घेईल. त्यानंतर कलम १६(४) आणि कलम १६(४ए) अंतर्गत पदोन्नतीमध्ये आरक्षण दिले जाऊ शकते. राज्य सरकार प्रमोशनमध्ये आरक्षण देण्यास बांधील नाही. अशा परिस्थितीत पुरेसे प्रतिनिधित्व आहे की नाही हे शोधणे राज्य सरकार बंधनकारक नाही असं सांगत उत्तराखंड उच्च न्यायालयाचा आदेश फेटाळून लावला आणि हा आदेश कायद्याच्या विरोधात आहे अशी टीप्पणी दिली.  

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयcongressकाँग्रेसCentral Governmentकेंद्र सरकारState Governmentराज्य सरकारreservationआरक्षण