शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

खातेधारकांच्या 'या' क्षुल्लक चुकीमुळे स्टेट बँकेनं 40 महिन्यात कमावले 39 कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2018 5:19 PM

ग्राहकांच्या छोट्याश्या चुकीमुळे बँकेच्या तिजोरीत कोट्यवधींची भर

मुंबई: सार्वजनिक क्षेत्रातील देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियानं ग्राहकांच्या एका क्षुल्लक चुकीतून तब्बल 39 कोटी रुपयांची कमाई केली आहे. स्टेट बँकेनं चेकवर योग्य स्वाक्षरी नसल्यानं ग्राहकांकडून गेल्या 40 महिन्यांमध्ये दंडाच्या माध्यमातून 39 कोटी रुपये कमावले आहेत. चेकवर योग्य स्वाक्षरी नसल्यानं स्टेट बँकेनं गेल्या 40 महिन्यांमध्ये 24 लाख 71 हजार 544 चेक परत पाठवले आहेत. एका आरटीआयमुळे ही आकडेवारी पुढे आली. आरटीआयमधून मिळालेल्या माहितीनुसार, एखादा चेक परत पाठवल्यावर बँक ग्राहकाकडून 150 रुपयांचा दंड आकारते. यावर जीएसटीदेखील लावला जातो. त्यामुळे ग्राहकाला 157 रुपये मोजावे लागतात. एकीकडे ग्राहकांना दंड भरावा लागत असताना, यामुळे बँकेच्या तिजोरीत मात्र कोट्यवधी रुपयांची भर पडली आहे. याशिवाय खात्यात किमान रक्कम न ठेवल्यानंही एसबीआयनं ग्राहकांकडून दंड आकारणी केली आहे. जानेवारीत अर्थ मंत्रालयानं या संदर्भातील माहिती दिली होती. गेल्या एप्रिल ते नोव्हेंबर महिन्यात खात्यात किमान रक्कम न ठेवल्यानं एसबीआयनं ग्राहकांकडून 1771 कोटी रुपयांचा दंड वसूल केला होता. 2015-16 या आर्थिक वर्षात एसबीआयनं 60 हजार 169 चेक परत पाठवले. 2016-17 या कालावधीत या संख्येत मोठी वाढ झाली. या काळात एसबीआयनं जवळपास 1 लाख चेक ग्राहकांना परत पाठवले. 2016-17 या आर्थिक वर्षात यामध्ये थोडी घट झाली. या वर्षात 80 हजार चेक बँकेनं ग्राहकांना परत केले. 2018-19 या आर्थिक वर्षात यामध्ये पुन्हा वाढ झाली. एप्रिलपर्यंत स्टेट बँकेनं 83 हजार 132 चेक ग्राहकांना परत पाठवले आहेत.  

टॅग्स :SBIएसबीआयGSTजीएसटीbankबँक