शहरं
Join us  
Trending Stories
1
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
2
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
3
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
4
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
5
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
6
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
7
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
8
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
9
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
10
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
11
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
12
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
13
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
14
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
15
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
16
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
17
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
18
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
19
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
20
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?

आंध्रातील बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद, तेलगू देसमनेही घेतल्या सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 03:45 IST

आंध्र पदेश पुनर्रचना कायद्याच्या आधारे राज्याला विशेष साह्य देण्यात केंद्र सरकार अपयशी ठरल्याच्या निषेधार्थ डाव्या पक्षांच्या बुधवारच्या आंध्र प्रदेश बंदला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.

अमरावती : आंध्र पदेश पुनर्रचना कायद्याच्या आधारे राज्याला विशेष साह्य देण्यात केंद्र सरकार अपयशी ठरल्याच्या निषेधार्थ डाव्या पक्षांच्या बुधवारच्या आंध्र प्रदेश बंदला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यामुळे बस सेवा ठप्प झाली . सर्व शैक्षणिक संस्थाही बंद राहिल्या. या बंदला विरोधी पक्ष वायएसआर काँग्रेस, काँग्रेस आणि जनसेना यांनी पाठिंबा दिला होता.एकीकडे विरोधकांनी बंदची हाक दिली असताना दुसरीकडे राज्यातील सत्तारुढ तेलगू देसम पक्षाने एकजूट होत राज्यात सभांचे आयोजन केले. ऊर्जा मंत्री किमिदी कला व्यंकटराव यांनी सांगितले की, राज्याच्या अधिकारासाठी आमचे संसद सदस्य संसदेत संघर्ष करत आहेत. राज्यातील आंदोलन पाहता राज्य परिवहनने राज्यातील बस सेवा बंद ठेवली आहे. शैक्षणिक संस्थांना सुटी जाहीर केली आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिकाºयाने सांगितले की, बंदच्या दरम्यान कोणतीही अनुचित घटना घडल्याचे वृत्त नाही. राज्यातील सरकारी व खासगी शाळांना सुटी जाहीर केली आहे. आॅटोरिक्षा, ट्रक आदी वाहनांच्या रस्यांच्या बाजूला रांगा लागल्या आहेत.>अर्थमंत्र्यांनी उत्तर द्यावेअर्थसंकल्पात झालेले वाटप व आंध्रच्या मुद्यावर अर्थमंत्री अरुण जेटली यांनी उत्तर द्यायला हवे, अशी मागणी तेलुगु देसमच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे राज्यमंत्री वाय.एस. चौधरी यांनी लोकसभेत केली. ते म्हणाले की, आंध्रच्या पुनर्रचनेनुसार पोलावरम प्रकल्प, कडप्पा स्टील प्रकल्प प्रलंबित आहेत. केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री अनंत कुमार यांनी सांगितले की, आंध्र लोकांनी उपस्थित केलेल्या मुद्यावर सरकार संवेदनशील आहे. परंतु तेलगू देसमचे सदस्य आक्रमक झाले. अध्यक्षांच्या आसनासमोर येऊन बसून राहिले. त्यामुळे कामकाज १५ मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले. अनंत कुमार यांनी सर्वांना आपल्या जागी बसण्याचे आवाहन केले. या प्रकरणी १५ दिवसांच्या आत तोडगा काढा आणि या विषयावर पुढील अधिवेशनात यावर दोन तासांची चर्चा घ्यावी, अशी मागणी तेलुगु देसमचे वाय. एस. चौधरी यांनी केली.>अचानक शांत राहण्याचा आदेशसंसदेत तेलगू देसमचे सदस्य अतिशय आक्रम झाल्यानंतर अमरावतीतून त्यांना अचानक शांत राहण्याचे आदेश मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी दिले. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आंध्र प्रदेश्च्या मागण्या मान्य केल्याने आता शांत राहावे, असे या खासदारांना सांगण्यात आले.