शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
4
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
5
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
6
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
7
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
8
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
9
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
10
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
11
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
12
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
13
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
14
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
15
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
16
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
17
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
18
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
19
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
20
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली

जुम्मा ब्रेकवरून NDA मध्ये फूट! आसाम सरकारच्या निर्णयावर या महत्वाच्या मित्र पक्षानं उपस्थित केला सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2024 14:08 IST

नीरज कुमार यांनी यानिर्णयाचा निषेध करताना म्हटले आहे की, धार्मिक आस्थेवर हल्ला करण्याचा अधिकार कुणालाही नाही...

आसाम सरकारने विधानसभेतील जुम्मा ब्रेकसंदर्भात घेतलेल्या निर्णयावरून आता एनडीएमध्ये फूट पडताना दिसत आहे. जेडीयू नेते नीरज कुमार यांनी शनिवारी आसाम सरकारच्या या निर्णयाचा विरोध केला आहे.

नीरज कुमार यांनी यानिर्णयाचा निषेध करताना म्हटले आहे की, धार्मिक आस्थेवर हल्ला करण्याचा अधिकार कुणालाही नाही. तसेच, जर आसामच्या मुख्यमंत्र्यांनी लोकांना गरीबीतून बाहेर काढण्यासाठी अधिक लक्ष दिले असते तर बरे झाले असते, असेही नीरज यांनी म्हटले आहे. ते एएनआय सोबत बोलत होते. 

कामाख्या मंदिरातील बळी वरही उपस्थित केला सवाल- जेडीयू नेते नीरज कुमार पुढे म्हणाले, आसामच्या मुख्यमंत्र्यांनी घेतलेला निर्णय संविधानाच्या मूलभूत सिद्धांताच्या विरोधात आहे. प्रत्येकाला आपली धार्मिक आस्था जपण्याचा अधिकार आहे. मला मुख्यमंत्री सरमा यांना विचारायचे आहे की, आपण रमझानदरम्यान शुक्रवारच्या सुट्टीवर बंदी घालत आहात आणि त्यामुळे कामाची कार्यक्षमता वाढेल असा दावा करत आहात. माँ कामाख्या मंदिर हा हिंदू परंपरेचा एक महत्त्वाचा भाग आहे, आपण तेथील बळी प्रथेवर बंदी घालू शकता? 

असम सरकारनं जुम्मा ब्रेक रद्द केला - आसाम विधानसभेत कर्मचाऱ्यांना जुम्मा अर्थात शुक्रवारी मिळणारा दोन तासांचा ब्रेक आता रद्द करण्यात आला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोट्स करताना सरमा यांनी म्हटले होते, "आसाम विधानसभेने दोन तासांचा जुम्मा ब्रेक रद्द केला आहे. यामुळे काम आणि उत्पादकतेवर परिणाम होत होता. याच बरोबर आम्ही वसाहतवादी काळातील आणखी एक परंपरा संपवली आहे. मुस्लीम लीगचे सैयद सादुल्ला यांनी 1937 मध्ये ही प्रथा सुरू केली होती. मी विधानसभा अध्यक्ष आणि आपल्या आमदारांचे या ऐतिहासिक निर्णयासाठी आभार मानतो." एवढेच नाही तर, या निर्णयाच्या माध्यमाने आम्ही विधानसभेच्या उत्पादकतेला प्राधान्य दिले आहे, असेही मुख्यमंत्री हिमंता यांनी म्हटले आहे.

 

टॅग्स :AssamआसामNational Democratic Allianceराष्ट्रीय लोकशाही आघाडीBJPभाजपा