शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime : 'वासरू दाखवतो’ म्हणत गोठ्यात नेलं; चिमुकलीवर अत्याचार करून मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवला
2
अमेरिकन कंपनीचा खेळ खल्लास! रातोरात लागणार टाळे; ट्रम्प यांनीही वाचवण्याचे प्रयत्न केले नाहीत
3
राज्यात बारावीचा निकाल जाहीर, पुन्हा मुलींनी मारली बाजी; ९४ टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल
4
मॉडेल्स दुबईला जाऊन येतात, मुंबईत अलिशान फ्लॅट, कार घेतात; तिकडे काय चालते? मोठा दावा...
5
ट्रम्प अ‍ॅक्शन मोडमध्ये! संसदेला डावलून ४ देशांना देणार ८१ हजार कोटींची शस्त्रे; 'हे' देश होणार शक्तिशाली
6
इराण युद्धात ट्रम्पना साथ न देणं युरोपला पडलं महागात; लादलं २५ टक्के टॅरिफ, व्यवसायाला मोठा झटका
7
सोलापुरात शेतीच्या वादातून तिहेरी हत्याकांड; दिराने भावजयीसह दोन पुतण्यांची केली निर्घृण हत्या
8
पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार
9
वैभव सूर्यवंशीला बाद केल्यावर केलं असं सेलिब्रेशन, अडचणीत सापडला जेमिसन, BCCIने सुनावली अशी शिक्षा  
10
तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा
11
Missing Link झाला मिसिंग, अभिजीत पानसेंचा टोला; पुण्याहून मुंबईच्या दिशेने वाहतूक कोंडीत अडकले
12
मेहुण्याचा अपघाती मृत्यू, तर भावोजींनी त्याच ठिकाणी संपवलं आयुष्य;पालघरमध्ये थरकाप उडवणारी घटना
13
आईच्या नावाने मुलाला ओळखणार, कागदपत्रांवर मातेचे नाव लागणार! सर्व शाळांमध्ये एकच नियम लागू
14
'जो करेल जातीची बात, त्याला मारेन जोरात लाथ', भर कार्यक्रमात नितीन गडकरींचं सूचक विधान
15
Jabalpur Cruise Accident : लाईफ जॅकेट असूनही आई-मुलगा बुडालेच कसे? जबलपूर क्रूझ दुर्घटनेबाबत तज्ज्ञांचा मोठा खुलासा
16
चहा पिण्याची सर्वात योग्य वेळ कोणती? 'या' टाईमला म्हटलं जातं गोल्डन अवर
17
Gold Silver Price Today: सलग दुसऱ्या दिवशी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीत जोरदार तेजी; चेक करा नवे दर
18
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
19
बरगी धरणात देवदूत धावले! स्वतःचा जीव धोक्यात घालून कामगारांनी वाचवले डझनभर प्राण; मुख्यमंत्र्यांनी बक्षीस केले जाहीर
20
दोन सख्ख्या बहिणींशी लग्न करणाऱ्या भाजप नेत्याचा संशयास्पद मृत्यू; शॉपिंगवरून झालेल्या वादाचा भयानक शेवट?
Daily Top 2Weekly Top 5

सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग, शिवसेनेशिवाय सत्ता; मुख्यमंत्र्यांचे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2019 06:51 IST

फॉर्म्युल्याबाबत भाजप-शिवसेनेची सावध भूमिका : सरकारबाबत पवारांकडूनही सस्पेन्स कायम

नवी दिल्ली/मुंबई : महाराष्ट्रात सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला असून सोमवारी दिवसभर राजधानी दिल्लीत राजकीय खलबतं झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, राज्य प्रभारी भूपेंद्र यादव, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन सरकार स्थापनेसंदर्भात रणनिती निश्चित केली. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेस पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेऊन महाराष्ट्रातील राजकीय सद्यस्थितीवर चर्चा केली.

दिल्लीत पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी, महाराष्ट्राला नव्या सरकारची आवश्यकता आहे आणि ते लवकरच बनेल, एवढेच सांगितले. मात्र युतीचे सरकार येणार की भाजप स्वबळावर सरकार स्थापन करणार या बाबतची संदिग्धता कायम ठेवली. फडणवीस यांच्या विधानावरून भाजप आता शिवसेनेशिवाय सत्ता स्थापन करू शकतो, असे म्हटले जात आहे. 

शिवसेनेकडून मुख्यमंत्री पदाचा आग्रह धरला जात आहे. या आग्रहाला दाद न देण्याचा सल्ला अमित शहा यांनी फडणवीस यांना आजच्या भेटीत दिला आणि म्हणूनच फडणवीस यांनी बैठकीतून बाहेर पडताच केलेल्या विधानात शिवसेनेचा उल्लेख टाळला, असे म्हटले जात आहे.शिवसेनेने अधिक ताणून धरल्याने शिवसेनेला काय द्यायचे, यावर फडणवीस व शहा यांच्यात चर्चा झाली. मुख्यमंत्रीपद, गृह व नगरविकास, वित्त खाते भाजपने सोडायचे नाही, यावर दोन्ही नेत्यांमध्ये तूर्त एकमत झाल्याचे समजते. त्यामुळे शिवसेनेच्या वाट्याला महसूल खाते जाण्याची शक्यता आहे.शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद द्यायचे झाल्यास भाजपचा एक उपमुख्यमंत्री करून सेनेला शह द्यायचा काय? यावरही चर्चा झाली. परंतु अशाने सरकारच्या स्थैर्यावर प्रतिकूल परिणाम होईल, यामुळे हा फॉर्म्युला सावधपणे स्वीकारला जाण्याची शक्यता आहे. येत्या ९ नोव्हेंबरपर्यंत नवे सरकार स्थापन होणे आवश्यक असून येत्या दोन दिवसातच फडणवीस राज्यपालांकडे तसा दावा करतील, असे बोलले जाते.कोण काय बोलले, हे महत्त्वाचे नाही- फडणवीसगेल्या काही दिवसांपासून शिवसेनेकडून शाब्दिक हल्ले होत असले तरी मुख्यमंत्र्यांनी ते फारसे गंभीरपणे घेतले नसल्याचे दिल्लीवारीत दिसून आले. सत्तेच्या समीकरणात कोण काय बोलले, याला फारसे महत्त्व नसते. कोण काय टिप्पणी करीत आहे, यावर आपण भाष्य करणार नाही. त्याप्रमाणे भाजपचे नेतेही यावर प्रतिक्रिया देणार नाहीत, असे फडणवीस यांनी सांगितले.‘त्या’ फाईलमध्ये दडलंय काय?राज्यपालांच्या भेटीदरम्यान राऊत आणि कदम यांच्यासोबत एक फाईल देखील होती. पत्रकार परिषदेत या फाईलविषयी विचारल्यानंतर राऊतांनी लागलीच आपल्या सुरक्षारक्षकांना ती फाईल गाडीत ठेवायला लावली. त्यामुळे या फाईलवर चर्चा रंगली. दुर्दैवाने ती फाईल समोर आली आहे. फाईलमध्ये काय आहे याचा लवकरच खुलासा करु, असेही राऊत म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनी घेतली गडकरींची भेटफडणवीस यांनी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी जाऊन सायंकाळी भेट घेतली. ही भेट राजकीय वर्तुळात महत्त्वाचे मानले जात आहे. सत्तास्थापनेचा तिढा सोडविण्यासाठी समोर येऊन गडकरी काही भूमिका निभावू शकतात आणि त्या संदर्भात ही भेट होती, असेही म्हटले जाते.शिवसेनेचे ‘फटकारे’ आणि ‘पाहावा विठ्ठल’शिवसेना नेते खा. संजय राऊत आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी राजभवनात जाऊन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली.उभयतांनी राज्यपालांना बाळासाहेब ठाकरे यांचे ‘फटकारे’ आणि उद्धव ठाकरे यांची ‘पाहावा विठ्ठल’ आणि ‘महाराष्ट्र माझा’ हे गडकिल्ल्यांबाबतचे पुस्तक भेट दिले. या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना राऊत यांनी ही सदिच्छा भेट असल्याचा दावा केला. यावेळी कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही.आम्ही आमची भूमिका मांडली आहे. सरकार स्थापनेत शिवसेना अडथळा ठरत नाही. त्यामुळे लवकरात लवकर सरकार स्थापन व्हावी ही मागणी केल्याचे त्यांनी सांगितले.उपमुख्यमंत्री आणि १६ मंत्रिपदेशिवसेनेला उपमुख्यमंत्री पदासह १६ मंत्रिपदे देण्याच्या प्रस्तावात कोणताही बदल करायचा नाही. नगरविकास, वित्त, गृह अशी महत्त्वाची खातीही द्यायची नाहीत.येत्या दोन दिवसांत शिवसेनेकडून या संदर्भात अनुकूल प्रतिसाद मिळाला तर ठीक नाहीतर स्वबळावर सत्ता स्थापण्याचा पर्याय कायम ठेवा आणि ‘प्लान बी’ची तयारी करा, असे फडणवीस यांना पक्षनेतृत्वाकडून सांगण्यात आल्याची माहिती आहे.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAmit Shahअमित शहाShiv SenaशिवसेनाBJPभाजपा