शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

सोनिया गांधी, मनमोहनसिंग यांना धार्मिक ध्रुवीकरणाबाबत चिंता

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2018 02:09 IST

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी मोदी सरकार आणि भाजपाचे नाव न घेता देशातील विचलित करणाऱ्या घटनांचा उल्लेख करीत चिंता व्यक्त केली.

- शीलेश शर्मानवी दिल्ली : माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी मोदी सरकार आणि भाजपाचे नाव न घेता देशातील विचलित करणाऱ्या घटनांचा उल्लेख करीत चिंता व्यक्त केली. ते म्हणाले की, देशात गेल्या काही वर्षांत धार्मिक धु्रवीकरण, हिंसाचाराच्या घटना, जमावाकडून होणाºया हत्या या घटनांमुळे राष्ट्रीय एकात्मतेला धक्का बसत आहे. देशासाठी हे चांगले संकेत नाही. गोपालकृष्ण गांधी यांना राजीव गांधी सद्भावना पुरस्कार देण्यासाठी काँग्रेसकडून आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. आपण सर्वांनी मिळून या आव्हानांचा मुकाबला केला पाहिजे, असेही सिंग यावेळी म्हणाले.यावेळी बोलताना यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी म्हणाल्या की, राजीव गांधी हे नेहमी म्हणत असत की, देशातील विविधतेतूनच एकात्मतेला ताकद मिळते. त्यांच्यासाठी हीच सद्भावना होती. राजीव गांधी यांचे विचार होते की, देशातील प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने जीवन जगण्याचा, सुरक्षेचा आणि आत्मसन्मानाचा अधिकार मिळावा. भिन्न विचारांचा सन्मान केला जावा. ते विचार आपलेच असावेत असे नाही, तर दुसºयांचे असले तरी सन्मान द्यावा. विचार व्यक्त करण्याची स्वतंत्रता असावी. सोनिया गांधी यांचा निशाणा मोदी यांच्यावर होता. अर्थात, त्यांनी ना भाजपाचे नाव घेतले ना मोदी यांचे; पण सोनिया गांधी यांनी तेच मुद्दे उपस्थित केले ज्या मुद्यांवर काँग्रेस सातत्याने मोदी सरकारवर हल्ला करीत आहे.सोनिया गांधी यांनी देशाच्या बिघडत्या आर्थिक व्यवस्थेवर चिंता व्यक्त केली. राजीव गांधी यांचा उल्लेख करून त्या म्हणाल्या की, ते आर्थिक विकास आणि आधुनिकीकरणाच्या बाजूने होते. विज्ञान आणि तंत्रज्ञानात जगाला अग्रेसर देशाच्या यादीत ते पाहू इच्छित होते; पण त्यांना सामाजिक उदारीकरण हवे होते. त्यांचे असे म्हणणे होते की, ही दोन्ही कामे सोबतच व्हायला हवीत. आज सरकार खुल्या अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन देत आहे; पण याचे परिणाम धोकादायक आहेत.माजी राज्यपाल आणि महात्मा गांधी यांचे नातू गोपालकृष्ण गांधी यांनी यावेळी निर्णायक मंडळाप्रती आभार व्यक्त केले. यावेळी कर्णसिंह, मोतीलाल व्होरा यांच्यासह काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उपस्थित होते. त्यापूर्वी सोमवारी सकाळी सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी, रॉबर्ट वाड्रा यांची उपस्थिती होती. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त वीरभूमी येथे जाऊन पुष्पांजली अर्पण केली.

टॅग्स :Manmohan Singhमनमोहन सिंगSonia Gandhiसोनिया गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी