शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
3
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
4
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
5
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
6
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
7
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
8
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
9
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?
10
मॅकडोनाल्ड्सवर बंदीची मागणी! जगातील सर्वात मोठ्या फूड चेनचा 'अफाट' व्यवसाय माहीतेय का? कधी झाली सुरुवात?
11
"आई दुसऱ्यांच्या घरात भांडी घासायची", महिन्याला ५ हजार कमावणाऱ्या मुलाला ४६ लाखांची नोकरी
12
ऑपरेशन महादेव: पहलगाम हल्ल्यातील तीनही दहशतवाद्यांची 'कुंडली' समोर!
13
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
14
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
15
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
16
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
17
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
18
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
19
आठवा वेतन आयोग कधी लागू होणार, पगार किती वाढणार? अहवालातून झाला मोठा खुलासा
20
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?

सोनिया गांधी, मनमोहनसिंग यांना धार्मिक ध्रुवीकरणाबाबत चिंता

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2018 02:09 IST

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी मोदी सरकार आणि भाजपाचे नाव न घेता देशातील विचलित करणाऱ्या घटनांचा उल्लेख करीत चिंता व्यक्त केली.

- शीलेश शर्मानवी दिल्ली : माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी मोदी सरकार आणि भाजपाचे नाव न घेता देशातील विचलित करणाऱ्या घटनांचा उल्लेख करीत चिंता व्यक्त केली. ते म्हणाले की, देशात गेल्या काही वर्षांत धार्मिक धु्रवीकरण, हिंसाचाराच्या घटना, जमावाकडून होणाºया हत्या या घटनांमुळे राष्ट्रीय एकात्मतेला धक्का बसत आहे. देशासाठी हे चांगले संकेत नाही. गोपालकृष्ण गांधी यांना राजीव गांधी सद्भावना पुरस्कार देण्यासाठी काँग्रेसकडून आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. आपण सर्वांनी मिळून या आव्हानांचा मुकाबला केला पाहिजे, असेही सिंग यावेळी म्हणाले.यावेळी बोलताना यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी म्हणाल्या की, राजीव गांधी हे नेहमी म्हणत असत की, देशातील विविधतेतूनच एकात्मतेला ताकद मिळते. त्यांच्यासाठी हीच सद्भावना होती. राजीव गांधी यांचे विचार होते की, देशातील प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने जीवन जगण्याचा, सुरक्षेचा आणि आत्मसन्मानाचा अधिकार मिळावा. भिन्न विचारांचा सन्मान केला जावा. ते विचार आपलेच असावेत असे नाही, तर दुसºयांचे असले तरी सन्मान द्यावा. विचार व्यक्त करण्याची स्वतंत्रता असावी. सोनिया गांधी यांचा निशाणा मोदी यांच्यावर होता. अर्थात, त्यांनी ना भाजपाचे नाव घेतले ना मोदी यांचे; पण सोनिया गांधी यांनी तेच मुद्दे उपस्थित केले ज्या मुद्यांवर काँग्रेस सातत्याने मोदी सरकारवर हल्ला करीत आहे.सोनिया गांधी यांनी देशाच्या बिघडत्या आर्थिक व्यवस्थेवर चिंता व्यक्त केली. राजीव गांधी यांचा उल्लेख करून त्या म्हणाल्या की, ते आर्थिक विकास आणि आधुनिकीकरणाच्या बाजूने होते. विज्ञान आणि तंत्रज्ञानात जगाला अग्रेसर देशाच्या यादीत ते पाहू इच्छित होते; पण त्यांना सामाजिक उदारीकरण हवे होते. त्यांचे असे म्हणणे होते की, ही दोन्ही कामे सोबतच व्हायला हवीत. आज सरकार खुल्या अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन देत आहे; पण याचे परिणाम धोकादायक आहेत.माजी राज्यपाल आणि महात्मा गांधी यांचे नातू गोपालकृष्ण गांधी यांनी यावेळी निर्णायक मंडळाप्रती आभार व्यक्त केले. यावेळी कर्णसिंह, मोतीलाल व्होरा यांच्यासह काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उपस्थित होते. त्यापूर्वी सोमवारी सकाळी सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी, रॉबर्ट वाड्रा यांची उपस्थिती होती. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त वीरभूमी येथे जाऊन पुष्पांजली अर्पण केली.

टॅग्स :Manmohan Singhमनमोहन सिंगSonia Gandhiसोनिया गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी