शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
2
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
3
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
4
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
5
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
6
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
7
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
8
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
9
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
10
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
11
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
12
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
13
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
14
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
15
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
16
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
17
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
18
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
19
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
20
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!

‘सोनभद्र’ची कोंडी फुटली; आदिवासी कुटुंबियांशी प्रियांका गांधींची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2019 2:30 AM

उत्तर प्रदेशातील हत्याकांड। मृत कुटुंबियांनी मिर्झापूरच्या विश्रामगृहावर घेतली प्रियांका गांधी यांची भेट

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशात सोनभद्र येथे जमिनीच्या वादातून झालेल्या आदिवासी हत्याकांडातील मृतांच्या कुटुंबियांनी शनिवारी काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांची मिर्झापूर जिल्ह्यातील चुनार येथील विश्रामगृहावर भेट घेतली. या भेटीमुळे प्रियांका गांधी आणि उत्तर प्रदेश सरकार यांच्यातील संघर्ष मिटला.

सोनभद्र येथे बुधवारी एका गावाच्या सरपंचाने १0 गोंड आदिवासींची गोळ््या घालून हत्या केली होती. मृत आदिवासींच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी प्रियांका गांधी या काल उत्त्तर प्रदेशात आल्या होत्या. तथापि, पोलिसांनी त्यांना सोनभद्रला जाण्यापासून रोखले होते. त्यांना ताब्यात घेऊन विश्रामगृहावर आणण्यात आले होते. सुटका करून घेण्यासाठी वैयक्तिक जात मुचलका सादर करण्याची सूचना पोलिस प्रशासनाने प्रियांका गांधी यांना केली होती. तथापि, प्रियांका गांधी यांनी वैयक्तिक जात मुचलका देण्यास नकार देऊन आपण तुरुंगात जाण्यास तयार असल्याचे सांगितले. त्यामुळे मोठाच पेचप्रसंग निर्माण झाला होता. प्रियांका गांधी या रात्रभर विश्रामगृहावरच मुक्कामी थांबल्या. त्यांच्या समर्थनार्थ काँग्रेस समर्थकांनी राज्यात ठिकठिकाणी निदर्शने केली.

ज्येष्ठ काँग्रेस नेते अजय राय यांनी सांगितले की, आज सकाळी मृत आदिवासींच्या परिवारातील १५ सदस्यांनी प्रियांका गांधी यांची विश्रामगृहावर येऊन भेट घेतली. त्यात सात महिलांचा समावेश होता. त्यानंतर पोलिसांनी प्रियांका गांधी यांची विनाअट सुटका केली. त्या वाराणसी मार्गे नवी दिल्लीला परतल्या.

आदिवासींची भेट घेतल्यानंतर प्रियांका गांधी यांनी पक्ष कार्यकर्त्यांना उद्देशून केलेल्या भाषणात सांगितले की, ज्यांनी मला अटक करून चुनार विश्रामगृहावर आणले होते, ते आता म्हणत आहेत की, तुम्ही कोठेही जाण्यास मुक्त आहात! मी त्यांना सांगू इच्छिते की, सोनभद्र हत्याकांडातील पीडित आदिवासी परिवारांची भेट घेण्यासाठी मी आले होते. माझा हेतू सफल झाला आहे. मी आता जात आहे; पण मी परत येईन. दरम्यान, प्रियांका गांधी यांनी काल रात्री उशिरा एक टष्ट्वीट करून ‘प्रशासनाने आपणास पुढे जाऊ न दिल्यास आपण तुरुंगात जाण्यास तयार आहोत’, असे म्हटले होते. दरम्यान, तृणमूल काँग्रेसच्या शिष्टमंडळासही पोलिसांनी वाराणसी विमानतळावर ताब्यात घेतले.

काय आहे घटना?सोनभद्रच्या घोरवाल भागातील उभ्भा गावात हे हत्याकांड घडले आहे. गावचा सरपंच यज्ञ दत्त याने ट्रॅक्टरमध्ये गुंड आणून वादग्रस्त जमीन कसणाऱ्या आदिवासींवर अंदाधुंद गोळीबार केला होता. त्यात १0 आदिवासी ठार, तर २८ जण जखमी झाले होते. जखमींत दत्त याच्या ९ समर्थकांचाही समावेश आहे.

आदिवासींचे अश्रू पुसलेभेटायला आलेल्या आदिवासींच्या परिवारांतील सदस्यांचे प्रियांका गांधी यांनी सांत्वन केले. त्यांचे अश्रू पुसले. त्यांना पाणीही दिले. काही पीडित परिवारातील सदस्यांनी प्रियांका गांधी यांच्यासोबत फोटो काढून या भेटीच्या स्मृती कायमस्वरूपी जतन केल्या.

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीUttar Pradeshउत्तर प्रदेश