शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

पंतप्रधान मोदींच्या लॉकडाऊन वाढवण्याच्या घोषणेेवर 'अशी' आहे काँग्रेसची Reaction

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2020 14:05 IST

देशातील कोरोनाचा प्रसार थांबवण्यासाठी लॉकडाऊन आत्यंत आवश्यक असल्याचे सांगत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच आपण कोरोना व्हायरसचा सामना अत्यंत ताकदीने लढत आहोत, असेही मोदी यावेळी म्हणाले. याच पार्श्वभूमीवर देशातील विविध नेत्यांनीही आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

ठळक मुद्देदेशातील कोरोना व्हायरस बाधितांचा आकडा 9 हजारवर जाऊन पोहोचला आहेसंपूर्ण देशाला आणखी 3 मेपर्यंत लॉकडाऊनमध्येच राहावे लागणार आहेकोरोनाला रोखण्यासाठी सुरुवातीला 21 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली होती

नवी दिल्ली : कोरोना व्हायरस आता भारतातही वेगाने पसरू लागला आहे. याला रोखण्यासाठी सरकारने 21 दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला होता. मत्र तरीही, कोरोना व्हायरस बाधितांचा आकडा 9 हजारवर जाऊन पोहोचला. याच पार्श्वभूमीवर, सरकारने पूर्वी घोषित केलेल्या 21 दिवसांच्या लॉकडाऊनच्या अखेरच्या दिवशी म्हणजे आज देशातील जनतेला संबोधित केले. यावेळी आपण हा लॉकडाऊन 3 मेपर्यंत वाढवत असल्याचे मोदींनी जाहीर केले. त्यामुळे लोकांना आता आणखी 3 मेपर्यंत लॉकडाऊनमध्येच राहावे लागणार आहे.

देशातील कोरोनाचा प्रसार थांबवण्यासाठी लॉकडाऊन आत्यंत आवश्यक असल्याचे सांगत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच आपण कोरोना व्हायरसचा सामना अत्यंत ताकदीने लढत आहोत, असेही मोदी यावेळी म्हणाले. याच पार्श्वभूमीवर देशातील विविध नेत्यांनीही आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाढवलेल्या लॉकडाऊनवर भाष्य करताना काँग्रेस नेते अभिषेक मनू सिंघवी यांनी टीका केले आले. यात त्यांनी आर्थिक पॅकेजचा मुद्दा उचलला आहे. 'पंतप्रधानांचे भाषण प्रेरणादायी होते. पण कुठल्याही प्रकारच्या आर्थिक पॅकेजची घोषणा न करणे, कुठल्याही प्रकारची ठोस माहिती न देणे, यात गरीब, मध्यमवर्गीय आणि व्यापाऱ्यांसाठी कुटल्याही सहायता निधीची घोषणा करण्यात आलेली नाही. लॉकडाऊन चांगलेच आहे, पण जनतेच्या उपजिविकेचे काय? असा प्रश्न सिंघवी यांनी केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लॉकडाऊन वाढविण्याच्या निर्णयासंदर्भात ट्विट करत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे, की  पंतप्रधानांनी भारतात सुरू असलेले लॉकडाऊन तीन मेपर्यंत वाढविण्याची घोषणा केली आहे. हा निर्णय भारतीयांचे स्वास्थ चांगले राहावे या दृष्टीने घेण्यात आला आहे.

माजी क्रिकेटर तथा भाजप खासदार गौतम गंभीर यांनीही पंतप्रधानांच्या लॉकडाऊनच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. गंभीर यांनी ट्विट करत म्हटले आहे, की आपण भारतीय नागरिकांनीच हे 21 दिवस केले आणि आम्ही हे आणखी काही आठवडे करू. कृपया लॉकडाऊनच्या सूचनांचे पालन करा.

पंतप्रधानांच्या निर्णयाचे स्वागत करत रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी ट्विट केले आहे, की लॉकडाऊन 3 मेपर्यंत वाढविण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा निर्णय त्यांची दूरदृष्टी दाखवतो. हा नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी घेण्यात आलेला निर्णय आहे. हा, कोरोनाचा प्रसार थांबवण्याबरोबरच देश सुरक्षित ठेवण्यासाठी सहाय्यक ठरेल आणि नवीन भागांमध्ये व्हायरस जाण्यापासून रोखेल.

अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनीही लॉकडाऊन वाढविण्यासंदर्भात ट्विट करत, आम्ही नेहमी पंतप्रधान मोदीजींच्या सल्ल्याचे अनुसरण केले आहे. चला तर, वृद्धांची काळजी घेऊन, सामाजिक अंतर राखून, फेस मास्क वापरून, आपली प्रतिकारशक्ती वाढण्याच्या दृष्टाने प्रयत्न करून, आरोग्य सेतू अ‍ॅप डाऊनलोड करून त्यांच्या सल्ल्याचे पालन करू या. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांचा हा सल्ला सर्वांना सांगूया!

पंतप्रधान मोदींनी लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय घेतल्यानंतर, भाजप नेते संबित पात्रा यांनी, COVID-19च्या विरोधातील लढाईत भारताची प्रतिक्रिया समग्र, एकीकृत आणि निर्णायक ठरली आहे, असे ट्विट केले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याcongressकाँग्रेसIndian National Congressइंडियन नॅशनल काँग्रेसBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीSonia Gandhiसोनिया गांधी