शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
3
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
4
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
5
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
6
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
7
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
8
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
9
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
10
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
11
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
12
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
13
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
14
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
15
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
16
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
17
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
18
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
19
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
20
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल

भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2025 02:40 IST

भाजप व संघ परिवारातील अनेक जण याकडे वेगळ्या दृष्टीने पाहतात. भारताने पुढे जाऊन पाकव्याप्त काश्मीर (पीओके) आपल्यात समाविष्ट करायला हवे होते. 

हरीश गुप्ता, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : १० मे रोजी जाहीर झालेल्या भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवारातील काही घटकांकडून आणि त्यांच्याशी संलग्न समर्थकांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया येत आहेत. ऑपरेशन सिंदूरनंतर दोन्ही देशांत तणाव निर्माण झाला. या शस्त्रसंधीमुळे हे शत्रुत्व थांबले; परंतु टीकाकारांनी त्याला धोरणात्मक चूक किंवा शरणागती असे संबोधले आहे.

शस्त्रसंधी म्हणजे दहशतवादाच्या विरुद्धच्या प्रयत्नांतील ठोस कृती असल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले. तथापि, भाजप व संघ परिवारातील अनेक जण याकडे वेगळ्या दृष्टीने पाहतात.

कोलकाता येथील आरएसएसशी संलग्न असलेले सायन लाहिरी यांनी हा निर्णय म्हणजे पाश्चात्य दबावापुढे शरणागती असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की, या देशातील नागरिकांना जिहादीवादावर अंतिम तोडगा हवा होता. उजव्या विचारसरणीच्या शेफाली वैद्य यांनी शस्त्रसंधीला निराशाजनक असे संबोधले आहे. अर्थात, मोदी सरकारच्या व्यापक रणनीतीवर त्यांनी विश्वास व्यक्त केला.

एक्सवर व्यक्त करत आहेत अस्वस्थता

भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य स्वपन दासगुप्ता यांनी एक्सवर आपली अस्वस्थता व्यक्त केली आणि म्हटले की, ही घोषणा पक्षाच्या समर्थकांना रुचली नाही. विशेषत: ती अचानक केली गेली, तसेच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी केल्याचे जे तर्क लावले जात आहेत त्यामुळेही ते रुचले नाही.

गुवाहाटी येथील भाजप नेते मून तालुकदार यांनी या निर्णयावर टीका केली. यात स्वसंरक्षणाची कमतरता आहे, असे म्हटले, तसेच त्यांनी असाही आग्रह धरला की भारताने पुढे जाऊन पाकव्याप्त काश्मीर (पीओके) आपल्यात समाविष्ट करायला हवे होते. 

 

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाIndia vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तानIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकsurgical strikeसर्जिकल स्ट्राइकRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघBJPभाजपाCentral Governmentकेंद्र सरकार