शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
2
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
3
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
4
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
5
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
6
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
7
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
8
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
9
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
10
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
11
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
12
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
13
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
14
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
15
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
16
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
17
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
18
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
19
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
20
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला

स्मॉग टॉवर्स, कृत्रिम पाऊस उपयोगी नाही! भारताच्या वायु प्रदूषणावर अमेरिकेचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2024 07:10 IST

भारतातील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी दीर्घकालीन प्रयत्नांची आवश्यकता आहे, असे अमेरिकेतील एका वरिष्ठ शास्त्रज्ञाने म्हटले आहे.

नवी दिल्ली : भारतातील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी दीर्घकालीन प्रयत्नांची आवश्यकता आहे, असे अमेरिकेतील एका वरिष्ठ शास्त्रज्ञाने म्हटले आहे. धुक्यांचे मनोरे (स्मॉग टॉवर्स) आणि कृत्रिम पाऊस (क्लाउड सीडिंग) यासारख्या किफायतशीर तंत्रज्ञान हे देशातील प्रदूषणाच्या समस्येवर शाश्वत उपाय नाहीत, असा दावाही त्यांनी केला.

जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) जागतिक वायू प्रदूषण आणि आरोग्य तांत्रिक सल्लागार गटाचे सदस्य रिचर्ड पेल्टियर म्हणाले की संपूर्ण भारतात वायू प्रदूषण खरोखरच वाईट आहे, याची जाणीव आहे ही चांगली गोष्ट आहे, परंतु ते रोखण्यासाठी अचूकपणाची कमतरता आहे.

हे म्हणजे आंघोळीच्या टॉवेलने नदी कोरडे करणे!

‘स्मॉग टॉवर्स’च्या भूमिकेबद्दल विचारले असता पेल्टियर म्हणाले की हे हवा स्वच्छ करणारे हे विशाल ‘एअर प्युरिफायर’ अल्पप्रमाणात प्रदूषण कमी करतात, परंतु खर्च आणि देखभाल आव्हानांमुळे संपूर्ण शहरांसाठी अव्यवहार्य आहेत. हे म्हणजे आंघोळीच्या टॉवेलने एखादी मोठी नदी कोरडे करण्याचा प्रयत्न करण्यासारखे आहे. कृत्रिम पाऊस हाही निश्चितपणे दीर्घकालीन उपाय नाही.

आयुर्मानात ५.३ वर्षे घट

स्वतंत्र विचारगट ग्रीनपीस इंडियाच्या मते देशातील ९९ टक्क्यांहून अधिक लोकसंख्या पीएम २.५ पेक्षा जास्त डब्ल्यूएचओ मानकांपेक्षा जास्त हवेत श्वास घेते.

६२ टक्के गर्भवती महिला आणि ५६ टक्के लोकसंख्या सर्वाधिक प्रदूषित भागात राहतात.

सूक्ष्म कण वायू प्रदूषण भारतात सरासरी आयुर्मान ५.३ वर्षे आणि दिल्लीत ११ वर्षांपर्यंत कमी करते.

स्वच्छ हवेसाठी अमेरिकेला लागली ५० ते ६० वर्षे

दिल्लीत वायू प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी किती वेळ लागेल, असे विचारले असता त्यांनी अमेरिकेचे उदाहरण दिले.

अमेरिकेने १९६० च्या दशकात स्वच्छ वायू कायदा लागू केला आणि अलीकडेच देशाने चांगली मानली जाणारी हवेची गुणवत्ता विकसित केली आहे. येथपर्यंत येण्यासाठी ५० वर्षे लागली.

ही तात्कालिक समस्या नाही. हे काही एका कलमाच्या किंवा कायद्याच्या फटक्याने सोडवली जाणार नाही, असे पेल्टियर म्हणाले.

टॅग्स :pollutionप्रदूषण