शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

स्मॉग टॉवर्स, कृत्रिम पाऊस उपयोगी नाही! भारताच्या वायु प्रदूषणावर अमेरिकेचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2024 07:10 IST

भारतातील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी दीर्घकालीन प्रयत्नांची आवश्यकता आहे, असे अमेरिकेतील एका वरिष्ठ शास्त्रज्ञाने म्हटले आहे.

नवी दिल्ली : भारतातील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी दीर्घकालीन प्रयत्नांची आवश्यकता आहे, असे अमेरिकेतील एका वरिष्ठ शास्त्रज्ञाने म्हटले आहे. धुक्यांचे मनोरे (स्मॉग टॉवर्स) आणि कृत्रिम पाऊस (क्लाउड सीडिंग) यासारख्या किफायतशीर तंत्रज्ञान हे देशातील प्रदूषणाच्या समस्येवर शाश्वत उपाय नाहीत, असा दावाही त्यांनी केला.

जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) जागतिक वायू प्रदूषण आणि आरोग्य तांत्रिक सल्लागार गटाचे सदस्य रिचर्ड पेल्टियर म्हणाले की संपूर्ण भारतात वायू प्रदूषण खरोखरच वाईट आहे, याची जाणीव आहे ही चांगली गोष्ट आहे, परंतु ते रोखण्यासाठी अचूकपणाची कमतरता आहे.

हे म्हणजे आंघोळीच्या टॉवेलने नदी कोरडे करणे!

‘स्मॉग टॉवर्स’च्या भूमिकेबद्दल विचारले असता पेल्टियर म्हणाले की हे हवा स्वच्छ करणारे हे विशाल ‘एअर प्युरिफायर’ अल्पप्रमाणात प्रदूषण कमी करतात, परंतु खर्च आणि देखभाल आव्हानांमुळे संपूर्ण शहरांसाठी अव्यवहार्य आहेत. हे म्हणजे आंघोळीच्या टॉवेलने एखादी मोठी नदी कोरडे करण्याचा प्रयत्न करण्यासारखे आहे. कृत्रिम पाऊस हाही निश्चितपणे दीर्घकालीन उपाय नाही.

आयुर्मानात ५.३ वर्षे घट

स्वतंत्र विचारगट ग्रीनपीस इंडियाच्या मते देशातील ९९ टक्क्यांहून अधिक लोकसंख्या पीएम २.५ पेक्षा जास्त डब्ल्यूएचओ मानकांपेक्षा जास्त हवेत श्वास घेते.

६२ टक्के गर्भवती महिला आणि ५६ टक्के लोकसंख्या सर्वाधिक प्रदूषित भागात राहतात.

सूक्ष्म कण वायू प्रदूषण भारतात सरासरी आयुर्मान ५.३ वर्षे आणि दिल्लीत ११ वर्षांपर्यंत कमी करते.

स्वच्छ हवेसाठी अमेरिकेला लागली ५० ते ६० वर्षे

दिल्लीत वायू प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी किती वेळ लागेल, असे विचारले असता त्यांनी अमेरिकेचे उदाहरण दिले.

अमेरिकेने १९६० च्या दशकात स्वच्छ वायू कायदा लागू केला आणि अलीकडेच देशाने चांगली मानली जाणारी हवेची गुणवत्ता विकसित केली आहे. येथपर्यंत येण्यासाठी ५० वर्षे लागली.

ही तात्कालिक समस्या नाही. हे काही एका कलमाच्या किंवा कायद्याच्या फटक्याने सोडवली जाणार नाही, असे पेल्टियर म्हणाले.

टॅग्स :pollutionप्रदूषण