शहरं
Join us  
Trending Stories
1
एकटे PM मोदीच आठवड्याला १०० तास काम करतात; '७० तास'वरून ट्रोल झालेल्या नारायण मूर्तींचं प्रशस्तीपत्रक
2
गुहेत राहणाऱ्या रशियन महिलेने कसे कमावले पैसे, भारतात स्थायिक होण्याचे कारणही सांगितले
3
धक्कादायक...! डोनाल्ड ट्रम्प यांना भारतात पाठवायचंय 'मांसाहारी दूध', सरकारचा स्पष्ट नकार; जाणून घ्या काय आहे हा संपूर्ण प्रकार?
4
"दीपक काटे चांगले काम करेल म्हटलं होतं, पण..."; गायकवाडांवरील हल्ल्याचा मंत्री बावनकुळेंनी केला निषेध
5
ऑस्कर पुरस्कार विजेते सत्यजित रे यांचे बांग्लादेशातील घर पाडले; भारताने दिलेली दुरुस्तीची ऑफर
6
राहुल गांधी पंतप्रधान होणार हे तुम्हाला माहितीये का?; उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्याला फटकारलं, प्रकरण काय?
7
रात्रीच्या अंधारातही हल्ला करू शकणारे अमेरिकेतून येणार अपाचे हेलिकॉप्टर; पाक सीमेवर होणार तैनात
8
टॉवेल-बनियान घालून विरोधक विधानभवनात; अनोख्या आंदोलनाने वेधले साऱ्यांचे लक्ष, सत्ताधारीही हसले
9
IND vs ENG 3rd Test: आयसीसीचा इंग्लंडला डबल दणका, लॉर्ड्स कसोटी जिंकूनही संघाचा मोठा तोटा! 
10
हॉट मॉडेल, राजघराण्याशी संबंध, रवी शास्त्रींसोबत दिसलेली ही महिला आहे तरी कोण?
11
निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला मिळाला नवा भिडू; एकनाथ शिंदेंनी भाजपाला शह देण्यासाठी आखली रणनीती?
12
८ वर्षांत पहिल्यांदाच GST मध्ये होणार बदल! PMO नं प्रस्तावाला दिली मंजुरी; तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
13
"खून झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना..."; महादेव मुंडे हत्या प्रकरण, सुप्रिया सुळेंची संतप्त पोस्ट
14
महात्मा गांधींच्या ९४ वर्षे जुन्या चित्राला लिलावात मिळाले १.७ कोटी, जाणून घ्या त्यात काय खास आहे?
15
विमानांच्या इंजिनांचे आयुष्य किती असते? एअर इंडियाच्या विमानाला होती अशी इंजिने, जी...
16
५ मुलांची आई अन् १३ वर्षांचा संसार; २४ वर्षांच्या मुलाच्या प्रेमात पडली आणि जीव गमावला! नेमकं काय झालं?
17
पाकिस्तानात हायव्हॉल्टेज ड्रामा! देशात राजकीय खळबळ; फिल्ड मार्शल मुनीर बनणार राष्ट्रपती?
18
'पंचायत' फेम जितेंद्र कुमारची 'मिर्झापूर' सिनेमात एन्ट्री, 'या' अभिनेत्याच्या जागी दिसणार
19
Khuldabad Rename: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबादचे नाव बदलून रत्नापूर करण्याची मागणी!
20
गरमा गरम समोसे, गोड गोड जिलेबी की यम्मी पिझ्झा... आरोग्यासाठी काय आहे सर्वात घातक?

सीरम इन्स्टिट्यूटचे अधिकारी म्हणाले, "केंद्र सरकारला लसींच्या कमतरतेबद्दल माहिती होती, तरीही..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2021 10:47 IST

Coronavirus Vaccine : WHO च्या मार्गदर्शक सूचनांवर विचार केल्याशिवा. सर्व वयोगटातील लोकांच्या लसीकरणाला मान्यता, SII च्या अधिकाऱ्यांचं मत.

ठळक मुद्देWHO च्या मार्गदर्शक सूचनांवर विचार केल्या सर्व वयोगटातील लोकांच्या लसीकरणाला मान्यता, SII च्या अधिकाऱ्यांचं मत.सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाकडून करण्यात येत आहे कोविशिल्डचं उत्पादन.

देशात कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेनं हाहाकार माजवला आहे. कोरोनावर  (Coronavirus नियंत्रण मिळवण्यासाठी देशात सध्या मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम (Vaccination Drive in India) हाती घेण्यात आली आहे. दरम्यान १ मे पासून देशात १८ वर्षांवरील सर्वांच्या लसीकरणाला परवानगी देण्यात आली आहे. यादरम्यान सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे एक्सिक्युटिव्हा डायरेक्टर सुरेश जाधव यांनी शुक्रवारी मोठं वक्तव्य केलं. “केंद्र सरकारनं लसीच्या साठ्याबद्दल माहिती न घेता तसंच जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मार्गदर्शक सूचनांवर विचार केल्याशिवाय अनेक वयोगटातील लोकांच्या लसीकरणाला परवानगी दिली,” अशी माहितीही त्यांनी दिली. हील हेल्थद्वारे आयोजित करण्यात आलेल्या ई समिटमध्ये बोलताना जाधव यांनी हे वक्तव्य केलं. “देशानं जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक सूचनांचं पालन करायला हवं. त्याच्यानुसार लसीकरण केलं गेलं पाहिजे,” असं जाधव यांनी स्पष्ट केलं.

लस उपलब्ध नाही याची माहिती“सुरूवातीला ३० कोटी लोकांचं लसीकरण होणार होतं. ज्यासाठी ६० कोटी लसीच्या डोसची आवश्यकता होती. परंतु ते लक्ष्य गाठण्यापूर्वीच सरकारनं ४५ वर्षे आणि त्यानंतर १८ वर्षाच्या वरच्या लोकांच्या लसीकरणाला परवानगी दिली. लस उपलब्ध नाही हे माहित असूनदेखील सरकारनं मंजुरी दिली,” असंही ते म्हणाले. “ही सर्वात मोठी शिकवण होती. आम्हाला उत्पादनाची उपलब्धता लक्षात घ्यायला हवी होती. तसंच त्यादृष्टीनं वापर करायला हवा. लसीकरण आवश्यकच आहे. परंतु लस घेतल्यानंतरही लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे त्यांनी सावध राहिलं पाहिजे आणि कोरोनाच्या मार्गदर्शक सूचनांचं पालनही केलं पाहिजे,” असंही त्यांनी स्पष्ट केलं. “लसीच्या निवडीबद्दल सांगायचं झालं तर सीडीसी आणि एनआयएच डेटानुसार जी लस उपलब्ध आहे ती घेता येऊ शकते. फक्त त्याला नियममकाद्वारे परवानगी दिली गेली असली पाहिजे. कोणती लस अधिक प्रभावी आहे किंवा नाही हे सांगणं घाईचं ठरेल,” असंही ते म्हणाले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसIndiaभारतGovernmentसरकार